AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ फेम अभिनेत्याचं झोपेतच निधन, 48 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi : 'क्योंकि सास भी कभी बहू थी' फेम अभिनेत्याचं निधन, बायको आणि दोन चिमुकल्या मुलांना सोडून 48 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास... निधनाचं कारण धक्कादायक

'क्योंकि सास भी कभी बहू थी' फेम अभिनेत्याचं झोपेतच निधन, 48 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
| Updated on: Sep 08, 2024 | 3:12 PM
Share

टीव्ही विश्वातून एक धक्कादायक बतमी समोर येत आहे. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेतील एका प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्याचं निधन झालं आहे. वयाच्या 48 व्या वर्षी अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला आहे. अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता विकास सेठी आहे. अभिनेत्याच्या निधनाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याने बायको आणि जुळ्या मुलांना सोडून वयाच्या 48 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेत्याच्या निधनामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते आणि सेलिब्रिटी देखील श्रद्धांजली वाहत आहे.

विकास सेठी याच्या निधनामुळे टीव्ही विश्वात शोककळा पसरली आहे. 2002 पासून विकास घरा-घरात प्रसिद्ध होता. अभिनेत्याने ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘कहीं तो होगा’, ‘कसौटी जिंदगी की’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं. आता अभिनेत्याच्या निधनामुळे कुटुंबिय, चाहते आणि मित्रांना मोठा धक्का बसला आहे.

View this post on Instagram

A post shared by Vikas Sethi (@vikass.sethi)

रिपोर्टनुसार, 8 सप्टेंबर, रविवारी विकास याचं निधन झालं. झोपेच अभिनेत्याचं निधन झाल्याची माहिती मिळत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या निधनाची चर्चा रंगली आहे. पण अद्यापही विकास सेठी याच्या कुटुंबियांकडून कोणतं अधिकृत वक्तव्य समोर आलेलं नाही.

विकास सेठी कायम सोशल मीडियावर सक्रिय असायचा. अभिनेता कायम पत्नी आणि जुळ्या मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करायचा. अभिनेत्याने शेवटची पोस्ट 12 मे रोजी केली होती. ज्यामध्ये अभिनेता त्याच्या आईसोबत दिसला.

View this post on Instagram

A post shared by Vikas Sethi (@vikass.sethi)

विकास सेठी याचं निधन झालं आहे. अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे. अभिनेत्याच्या निधनावर चाहते कमेंट करत दुःख व्यक्त करत आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘ही फेक बातमी तर नाही ना?’, दुसरा नेटकरी म्हणाला ‘फार लवकर निधन झालं. दोन मुलं आहेत त्याला…’ तर अनेक जण अभिनेत्याला नक्की काय झालं होतं? असा प्रश्न विचारत आहेत.

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.