AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ फेम अभिनेत्याचं झोपेतच निधन, 48 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi : 'क्योंकि सास भी कभी बहू थी' फेम अभिनेत्याचं निधन, बायको आणि दोन चिमुकल्या मुलांना सोडून 48 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास... निधनाचं कारण धक्कादायक

'क्योंकि सास भी कभी बहू थी' फेम अभिनेत्याचं झोपेतच निधन, 48 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
| Updated on: Sep 08, 2024 | 3:12 PM
Share

टीव्ही विश्वातून एक धक्कादायक बतमी समोर येत आहे. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिकेतील एका प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्याचं निधन झालं आहे. वयाच्या 48 व्या वर्षी अभिनेत्याने अखेरचा श्वास घेतला आहे. अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता विकास सेठी आहे. अभिनेत्याच्या निधनाने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अभिनेत्याने बायको आणि जुळ्या मुलांना सोडून वयाच्या 48 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे. अभिनेत्याच्या निधनामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहते आणि सेलिब्रिटी देखील श्रद्धांजली वाहत आहे.

विकास सेठी याच्या निधनामुळे टीव्ही विश्वात शोककळा पसरली आहे. 2002 पासून विकास घरा-घरात प्रसिद्ध होता. अभिनेत्याने ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’, ‘कहीं तो होगा’, ‘कसौटी जिंदगी की’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं. आता अभिनेत्याच्या निधनामुळे कुटुंबिय, चाहते आणि मित्रांना मोठा धक्का बसला आहे.

View this post on Instagram

A post shared by Vikas Sethi (@vikass.sethi)

रिपोर्टनुसार, 8 सप्टेंबर, रविवारी विकास याचं निधन झालं. झोपेच अभिनेत्याचं निधन झाल्याची माहिती मिळत आहे. सध्या सर्वत्र अभिनेत्याच्या निधनाची चर्चा रंगली आहे. पण अद्यापही विकास सेठी याच्या कुटुंबियांकडून कोणतं अधिकृत वक्तव्य समोर आलेलं नाही.

विकास सेठी कायम सोशल मीडियावर सक्रिय असायचा. अभिनेता कायम पत्नी आणि जुळ्या मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करायचा. अभिनेत्याने शेवटची पोस्ट 12 मे रोजी केली होती. ज्यामध्ये अभिनेता त्याच्या आईसोबत दिसला.

View this post on Instagram

A post shared by Vikas Sethi (@vikass.sethi)

विकास सेठी याचं निधन झालं आहे. अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती मिळत आहे. अभिनेत्याच्या निधनावर चाहते कमेंट करत दुःख व्यक्त करत आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘ही फेक बातमी तर नाही ना?’, दुसरा नेटकरी म्हणाला ‘फार लवकर निधन झालं. दोन मुलं आहेत त्याला…’ तर अनेक जण अभिनेत्याला नक्की काय झालं होतं? असा प्रश्न विचारत आहेत.

विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.