AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकटी बाई म्हणजे जोखिम; बुरसटलेल्या विचारांचा सामना ‘अरुंधती’ कसा करणार?

देशमुख कुटुंबीयांकडून चारित्र्यावर चिखलफेक झाल्यानंतर अरुंधतीने (Arundhati) कायमस्वरुपी घर सोडलं. पण एकटं राहण्याच्या या प्रवासात तिच्यासमोर आणखी किती अडथळे येणार?

एकटी बाई म्हणजे जोखिम; बुरसटलेल्या विचारांचा सामना 'अरुंधती' कसा करणार?
Madhurani Prabhulkar
| Updated on: Feb 25, 2022 | 10:56 AM
Share

आपल्या समाजात अजूनही घटस्फोटीत स्त्रीकडे किंवा एकट्या बाईकडे बघण्याचा लोकांचा दृष्टीकोन हा संकुचितच आहे असं म्हणावं लागेल. एकटं राहण्याचा निर्णय घेणं हे आधीच स्त्रीसाठी अवघड असतं आणि तो निर्णय घेतल्यानंतरही तिला इतरांकडून अपेक्षित अशी साथ मिळत नाही. ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत सध्या अरुंधतीसुद्धा अशाच घटनांचा सामना करतेय. देशमुख कुटुंबीयांकडून तिच्या चारित्र्यावर चिखलफेक झाल्यानंतर अरुंधतीने (Arundhati) ते घर कायमस्वरुपी सोडलं. घर सोडल्यानंतर तिने आता स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. बरीच वर्षे पतीसोबत, सासू-सासऱ्यांची सेवा करत, मुलाबाळांचा सांभाळ करत राहणाऱ्या अरुंधतीला असा निर्णय घेण्यासाठी बराच धीर लागला. पण जुन्या अरुंधतीसारखं सर्वकाही सहन करत बसण्यापेक्षा तिने वेगळं राहण्याचा निर्धार केला, हाच तिच्यातील मोठा बदल प्रेक्षकांना मालिकेत पहायला मिळत आहे. (Marathi Serial)

‘एकटी बाई म्हणजे जोखिम’ देशमुखांचं घर सोडल्यानंतर अरुंधती काही दिवस तिच्या आईकडे राहायला आली आहे. स्वतंत्र राहण्यासाठी तिने घराची शोधाशोध सुरू केली आहे. मालिकेच्या शुक्रवारच्या भागात अरुंधतीचा हाच संघर्ष प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. अरुंधती एकटीच आहे, म्हणून घरमालकीण तिला भाड्याने घर देण्यास नकार देते. एकटी बाई म्हणजे जोखिम असते, असं ती अरुंधतीला म्हणते. आपल्याला आता पावलोपावली अशा समस्यांचा सामना करावाच लागणार, याची कल्पना तिला कदाचित आली असावी. म्हणूनच तिने बिनधास्तपणे घरमालकिणीच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिली. अरुंधती आता यातून कसा मार्ग काढणार, हे प्रेक्षकांना मालिकेच्या आगामी भागात पहायला मिळेल. दुसरीकडे विमलला अरुंधतीसोबत घडलेल्या घटनेची माहिती मिळते. अरुंधतीला दिलेली वाईट वागणूक तिलाही सहन होत नाही.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

‘आई कुठे काय करते’ या मालिकेचं कथानक आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अरुंधती तिच्यासमोर आलेल्या अडचणींचा सामना कसा करेल, त्यात आशुतोष तिची काही मदत करू शकेल का, अनिरुद्ध आणि कांचन देशमुख यांना त्यांची चूक समजेल का, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं या मालिकेच्या पुढील भागांत प्रेक्षकांना मिळतील.

संबंधित बातम्या: ‘आपण बरं अन् आपलं काम बरं’ अशी मंडळी घातक ठरतात? अनघामुळे देशमुखांचं घर पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर?

संबंधित बातम्या: आई कुठे काय करते: देशमुखांसमोर आशुतोष देणार प्रेमाची कबुली; काय असेल अरुंधतीची प्रतिक्रिया?

संबंधित बातम्या: आई कुठे काय करते: अरुंधतीने सोडला तिचा घरावरचा हक्क; कांचन देशमुखांवर भडकले नेटकरी

Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक