AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahesh Babu: “महेश बाबूला तशी पत्नी हवी होती, त्याने स्पष्टच केलं होतं”; नम्रता शिरोडकरचा खुलासा

नम्रता शिरोडकरने सांगितलं महेश बाबूला कशी पत्नी हवी होती?

Mahesh Babu: महेश बाबूला तशी पत्नी हवी होती, त्याने स्पष्टच केलं होतं; नम्रता शिरोडकरचा खुलासा
Namrata Shirodkar and Mahesh BabuImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 21, 2022 | 10:13 AM
Share

हैदराबाद: साऊथ सुपरस्टार महेश बाबू फक्त त्याच्या अभिनयकौशल्यामुळेच नाही तर खासगी आयुष्यामुळेही अनेकदा चर्चेत असतो. महेश बाबूने 2005 मध्ये अभिनेत्री नम्रता शिरोडकरशी लग्न केलं. लग्नानंतर नम्रताने फिल्म इंडस्ट्रीला रामराम केला. आता 17 वर्षांनंतर तिने यामागचं कारण सांगितलंय. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नम्रताने लग्नानंतर अभिनयातील करिअर सोडण्यामागचं कारण सांगितलं.

“महेशला काम न करणारी पत्नी हवी होती, याबाबतीत तो स्पष्टच होता. मी जरी एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असते, तरी त्याने मला काम सोडायला सांगितलं असतं. अशा काही गोष्टी आहेत, ज्या आम्ही एकमेकांसाठी केल्या आहेत”, असं नम्रता म्हणाली.

याविषयी बोलताना नम्रता पुढे म्हणाली, “लग्नानंतर आधी आपण अपार्टमेंटमध्ये राहायचं, अशी अट मी घातली होती. कारण मी मुंबईची होते आणि मला मोठमोठ्या बंगल्यांची भीती वाटायची. त्यामुळे सुरुवातीला आम्ही दोघं अपार्टमेंटमध्ये राहू लागलो होतो. जर मी हैदराबादला येत असेन तर आधी आपण अपार्टमेंटमध्ये राहू, अशी माझी अट होती. त्याचप्रमाणे त्यानेही स्पष्ट केलं होतं की लग्नानंतर मी काम करू नये.”

नम्रताच्या सर्व चित्रपटांची शूटिंग पूर्ण होईपर्यंत महेश बाबू लग्नासाठी थांबला होता. जेणेकरून लग्नाआधीच तिने तिचे सर्व चित्रपट पूर्ण करून घ्यावेत. “या गोष्टींबद्दल आमच्यात खूपच स्पष्टता होती”, असं नम्रताने स्पष्ट केलं.

नम्रता आणि महेश बाबूची पहिली भेट 2000 मध्ये ‘वामसी’ या चित्रपटाच्या सेटवर झाली. त्यानंतर पाच वर्षांनी 2005 मध्ये दोघांनी लग्न केलं. लग्नानंतर नम्रताने चित्रपटसृष्टीपासून फारकत घेतली आणि कुटुंब सांभाळ्याकडे लक्ष केंद्रीत केलं.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.