AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Makarand Deshpande: “तुम्ही जे म्हणाल ती हेडलाइन बनू शकत असेल तर..”; मकरंद देशपांडेंचा सेलिब्रिटींना सल्ला

मकरंद देशपांडे (Makarand Deshpande) हे लवकरच 'शूरवीर' (Shoorveer) या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या सीरिजमध्ये ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची भूमिका साकारणार आहेत.

Makarand Deshpande: तुम्ही जे म्हणाल ती हेडलाइन बनू शकत असेल तर..; मकरंद देशपांडेंचा सेलिब्रिटींना सल्ला
Makarand DeshpandeImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Jul 12, 2022 | 9:56 AM
Share

अभिनेते मकरंद देशपांडे (Makarand Deshpande) हे लवकरच ‘शूरवीर’ (Shoorveer) या वेब सीरिजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या सीरिजमध्ये ते राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराची भूमिका साकारणार आहेत. यानिमित्त नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ते अभिनय आणि कलाकारांविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. अशा देशभक्तीपर चित्रपट किंवा सीरिजचा त्यांच्या खऱ्या आयुष्यावर काय प्रभाव पडतो याबद्दलही ते बोलले. यासोबतच जातीय तेढ (communal tension) निर्माण होणाऱ्या वातावरणात एखाद्या सेलिब्रिटीने किंवा सामान्य व्यक्तीने कोणती जबाबदारी पेलली पाहिजे, याबद्दलही त्यांनी सांगितलं.

‘हिंदुस्तान टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, “आपण विवेकबुद्धीने वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण कुठल्या तरी एका बाजूने नाही तर कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाजूने आहोत, हे लक्षात घेतलं पाहिजे. देश जो काही निर्णय घेईल, त्या निर्णयाच्या पाठीशी आपण उभं राहायला हवं. अशा काळात काहीही प्रक्षोभक केलं नाही तर समस्या आपोआप मिटते. आपण जे बोलतो ते हेडलाईन बनू शकतं अशी ताकद जर आपल्यात असेल तर असं विधान आपण करू नये. हेडलाईन हे नेहमीच चांगल्या कारणासाठी नसतात, अनेकदा ते विध्वंसकही असतात. कायदा आणि सुव्यवस्था काय करू शकतं यावर आपण विश्वास ठेवण्याचा प्रयत्न करूयात. आपण शांततेसाठी काम केलं पाहिजे. हम सब एक है, एक ही रहेंगे. हम हिंदुस्तानी हैं, हिंदुस्तानी रहेंगे”, असं ते म्हणाले.

पहा व्हिडीओ-

‘शूरवीर’ या वेब सीरिजविषयी बोलताना त्यांनी पुढे सांगितलं, “ट्रेलरमध्ये तिन्ही दल एकत्र येत असल्याचं दाखवण्यात आलं आहे, जे खूप खास आहे. कारवाई करण्यात ते वेळ वाया घालवत नाहीत आणि ते कोणत्याही मर्यादेपर्यंत जाऊ शकतात. कथा आणि देशभक्ती व्यतिरिक्त लोकांना यातील सिनेमॅटोग्राफी पाहणंदेखील आवडेल. मी त्याला मॅग्नम ओपस म्हणतो. यात लढाऊ विमानं आहेत. जेव्हा तुम्ही RRR सारखा चित्रपट पाहता तेव्हा तुम्ही ते त्याच्या स्केलसाठी पाहता. या सीरिजच्या बाबतीतही हीच गोष्ट आहे.”

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.