AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“मला पश्चात्ताप..”; अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांवर मलायका स्पष्टच बोलली

मलायकाने 19 वर्षांच्या संसारानंतर अरबाज खानला घटस्फोट दिला. या दोघांना अरहान हा मुलगा आहे. त्यानंतर अर्जुन कपूरसोबतच्टया नात्यामुळे तिला बऱ्याचदा ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता.

मला पश्चात्ताप..; अर्जुन कपूरसोबतच्या ब्रेकअपच्या चर्चांवर मलायका स्पष्टच बोलली
Malaika Arora and Arjun KapoorImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 18, 2024 | 1:38 PM
Share

अभिनेत्री मलायका अरोरा तिच्या खासगी आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत येते. काही दिवसांपूर्वीच तिच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्याआधी बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत ब्रेकअप झाल्याच्या चर्चा होत्या. नेहमी एकमेकांसोबत दिसणारे अर्जुन आणि मलायका एका कार्यक्रमात समोर येऊनही एकमेकांना टाळताना दिसले होते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मलायकाने यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘ग्लोबल स्पा मॅगझिन’ला दिलेल्या मुलाखतीत मलायका तिच्या आयुष्यातील काही आव्हानात्मक परिस्थितींबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली.

जून महिन्यात अर्जुनच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनमध्ये मलायका कुठेच दिसली नव्हती. इतकंच नव्हे तर तिने त्याला शुभेच्छा देण्यासाठी सोशल मीडियावर पोस्टसुद्धा लिहिली नव्हती. यामुळे दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांना उधाण आलं होतं. यावर दोघांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र एकमेकांच्या खासगी आयुष्याचा आदर करत असल्याने परस्परसंमतीने ब्रेकअप केल्याची माहिती त्यांच्या जवळच्या व्यक्तीने दिली. म्हणूनच एका फॅशन शोदरम्यान मलायका आणि अर्जुन एकमेकांपासून दूर बसले होते.

View this post on Instagram

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor)

“स्वत:लाच खोलवर जाणून घेण्यास तुम्हाला कठीण परिस्थितीतही धैर्य मिळतं”, असं मलायका या मुलाखतीत म्हणाली. अशा परिस्थितीत कुटुंबीय आणि जवळच्या मित्रमैत्रिणींची खूप साथ मिळाल्याचंही तिने सांगितलं. “आयुष्यातील कठीण प्रसंगात मानसिक शांती आणि संयम राखण्या माझे कुटुंबीय, मित्रमैत्रिणी आणि कामसुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतात. मी खंबीर राहावी यासाठी माझ्या आजूबाजूची लोकं मला खूप मदत करतात. माझ्या मैत्रिणींशिवाय मी काहीच नाही. ते माझी काळजी घेतात, मला पाठिंबा देतात, प्रेरणा देतात. ते माझ्यासाठी सर्वस्व आहेत”, अशा शब्दांत मलायका व्यक्त झाली. अभिनेत्री करीना कपूर, करिश्मा कपूर आणि बहीण अमृता अरोरा या मलायकाच्या खास मैत्रिणी आहेत.

आयुष्यात अनेक आव्हानांचा सामना करूनही कोणत्याच गोष्टीचा पश्चात्ताप नसल्याचं तिने स्पष्ट केलं. “माझ्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात मी घेतलेल्या प्रत्येक निर्णयाने मला घडवलं आहे. मी कोणत्याच पश्चात्तापाशिवाय जगते आणि ज्याप्रकारे गोष्टी घडल्या त्यासाठी मी स्वत:ला नशीबवान समजते”, अशी प्रतिक्रिया तिने दिली.

मलायका आणि अर्जुन हे 2018 मध्ये एकमेकांना डेट करू लागले. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी सोशल मीडियावर त्यांच्या नात्याची जाहीर कबुली दिली होती. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या नात्यात दुरावा निर्माण झाल्याची जोरदार चर्चा आहे.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.