AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mangesh Desai: ‘ईश्वराच्या कृपेने आम्ही सुखरुप आहोत’; गाडीच्या अपघातानंतर मंगेश देसाई यांची पोस्ट

मंगेश हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत कर्जतला जात असताना हा अपघात झाला होता. वाशीतल्या (Vashi) कोकण भवनजवळ त्यांच्या गाडीचा हा अपघात झाला होता आणि सुदैवाने त्यातत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.

Mangesh Desai: 'ईश्वराच्या कृपेने आम्ही सुखरुप आहोत'; गाडीच्या अपघातानंतर मंगेश देसाई यांची पोस्ट
मंगेश देसाई यांच्या गाडीचे फोटोImage Credit source: Tv9
| Edited By: | Updated on: Jul 11, 2022 | 10:03 AM
Share

अभिनेता आणि निर्माता मंगेश देसाई (Mangesh Desai) यांच्या गाडीचा रविवारी अपघात (Car Accident) झाला. मंगेश हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत कर्जतला जात असताना हा अपघात झाला होता. वाशीतल्या (Vashi) कोकण भवनजवळ त्यांच्या गाडीचा हा अपघात झाला होता आणि सुदैवाने त्यातत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. परंतु मंगेश यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं आहे. अचानक ब्रेक लागल्यामुळे हा अपघात झाल्याचं कळतंय. यामध्ये कोणालाही दुखापत झाली नाही. या अपघाताचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी मंगेश देसाई यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली. त्यानंतर त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित आपण सुखरुप असल्याची माहिती दिली.

‘आज झालेल्या अपघातामध्ये फक्त गाडीचं नुकसान झालं आहे, ईश्वराच्या कृपेने आम्ही सुखरुप आहोत. काळजी नसावी. धन्यवाद,’ अशी पोस्ट त्यांनी लिहिली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये मंगेश देसाईंच्या गाडीचं नुकसान झाल्याचं पहायला मिळालं. आपण सुखरुप असल्याची पोस्ट लिहिताच त्यावर नेटकऱ्यांनी त्यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं.

मंगेश देसाई यांची पोस्ट-

रंगभूमी, चित्रपट आणि टीव्ही मालिका या तीनही माध्यमांमध्ये सशक्त अभिनेता म्हणून मंगेश देसाई यांनी आपलं स्थान निर्माण केलं. इतकी वर्षे अभिनय केल्यानंतर मंगेश देसाईंनी निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं. साहिल मोशन ही निर्मिती संस्था त्यांनी स्थापन केली असून ‘धर्मवीर’ या सुपरहिट चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली. ‘एक अलबेला’, ‘खेळ मांडला’सारखे संवेदनशील चित्रपट, क्राईम पेट्रोलसह विविध मालिकांमध्ये मंगेश यांनी अभिनेता म्हणून आपला ठसा उमटवला आहे. विनोदी अभिनेता म्हणून त्यांची ओळख आहेच पण अभिनेता म्हणून असलेल्या ओळखीच्या पलीकडे जाऊन त्यांनी निर्माता म्हणून ‘धर्मवीर’ या चित्रपटातूनही कामाची छाप पाडली. चित्रपट निर्मितीविषयी ते म्हणाले होते की, “एवढी वर्षे अभिनय केल्यानंतर काहीतरी वेगळं करून पाहायची इच्छा होती. त्यामुळे आता चित्रपट निर्मितीमध्ये पाऊल टाकलं आहे.”

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.