मनोज जरांगे पाटलांच्या व्यक्तीमत्वाचं वर्णन करणारं ‘मर्दमावळा’ धडाकेबाज गाणं रिलीज
Maratha Andolak Manoj Jarange Patil Sangharshyoddha Movie : मनोज जरांगे पाटील यांच्या जीवनावर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला; 'मर्दमावळा' गाणं पाहिलंत का? 'संघर्षयोद्धा' सिनेमा कधी रिलीज होणार? कोणकोणते कलाकार या सिनेमात आहेत? वाचा सविस्तर...
मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी लढा देत आहे. आमरण उपोषण करत त्यांनी सरकारला धारेवर धरलं. त्यांच्या आंदोलनाने आणि वारंवार केलेल्या आरक्षणाच्या मागणी महाराष्ट्रभर त्यांच्या नावाची चर्चा झाली. ओबीसीमधून मराठा समाजारा आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील आजही लढा देत आहेत. त्यांच्यासोबत मराठा समाजही उभा राहिल्याचं अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं. त्यांच्या या संघर्षावर आधारित एक सिनेमा येतो आहे. ‘संघर्षयोद्धा’ चित्रपट येत्या 26 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातील गाणं आता रिलीज झालं आहे. मनोज जरांगे पाटलांच्या व्यक्तीमत्वाचं वर्णन करणारं ‘मर्दमावळा’ धडाकेबाज गाणं नुकतंच रिलीज झालं आहे.
‘मर्दमावळा…’ गाणं रिलीज
‘संघर्षयोद्धा’ चित्रपटाचा टीझर काही दिवसांआधी रिलीज झाला. ‘उधळीन मी…’ या सुप्रसिद्ध गायक अजय गोगावले यांच्या आवाजातील गाण्याला रसिक प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. आता या चित्रपटातलं ‘मर्दमावळा…’ हे धडाकेबाज गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. गायक दिव्य कुमार यांनी ‘मर्दमावळा…’ हे गाण स्वरबद्ध करण्यात आल आहे. येत्या 26 एप्रिल रोजी ‘संघर्षयोद्धा : मनोज जरांगे पाटील’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
कलाकार कोण-कोण आहेत?
‘संघर्षयोद्धा’ या चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची भूमिका अभिनेता रोहन पाटील यांने साकारली आहे. या चित्रपटात अभिनेता संदीप पाठक, सागर कारंडे, अरबाज शेख, अभिनेते मोहन जोशी, श्रीनिवास पोकळे, संजय कुलकर्णी, अभिनेत्री सुरभी हांडे, माधवी जुवेकर, विजय मिश्रा, विनीत भोंडे, सुनील गोडबोले, माधव अभ्यंकर, सोमनाथ अवघडे , किशोर चौगुले , सिद्धेश्वर झाडबुके, उर्मिला डांगे यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत.
दिग्दर्शन कुणी केलं?
शिवाजी दोलताडे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. याआधी त्यांनी धुमस, मुसंडी, मजनू आदी चित्रपटांसाठी म्हणून दिग्दर्शक काम पाहिलं आहे. सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताडे यांनी चित्रपटाच्या निर्मितीसह चित्रपटाचं लेखनही केलं आहे. सहनिर्माते रामदास मेदगे, जान्हवी मनोज तांबे, दत्तात्रय लोहकरे कार्तिक दोलताडे , नर्मदा सिनेव्हिजन्स हे आहेत. तर डॉ.सुधीर निकम यांनी संवाद आणि पटकथा लिहिली आहे.