AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Holi Festival Song : ‘रंग बरसे’ होळी स्पेशल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, रवी भाटिया आणि काव्या किरण यांचं नवं गाणं प्रदर्शित

आगामी चित्रपट 'चौपार' चित्रपटातील 'रंग बरसे' (Rang Barase) हे गाणं प्रदर्शित झालं आहे. आगळ्या वेगळ्या अंदाजात हे गाणे प्रेक्षकांसमोर आलंय. यंदाचं म्हणजे 2022चं होळीचं गाणं म्हणून 'रंग बरसे' हे गाणं ओळखलं जातंय.

Holi Festival Song : 'रंग बरसे' होळी स्पेशल गाणं प्रेक्षकांच्या भेटीला, रवी भाटिया आणि काव्या किरण यांचं नवं गाणं प्रदर्शित
रंग बरसे- गाणं
| Edited By: | Updated on: Mar 18, 2022 | 4:31 PM
Share

मुंबई : होळीचा सण जवळ येताच चाहूल लागते ते होळीच्या गाण्यांची. गाण्यांवर थिरकत होळीचा सण साजरा करण्याचा आनंदच वेगळा म्हणायला हवा. यंदा होळी सणाच्या निमित्ताने असंच एका बहारदार गाणं सध्या रिलीज झालंय. आगामी चित्रपट ‘चौपार‘ चित्रपटातील ‘रंग बरसे(Rang Barase) हे गाणं प्रदर्शित झालं आहे. आगळ्या वेगळ्या अंदाजात हे गाणे प्रेक्षकांसमोर आलंय.  यंदाचं म्हणजे 2022चं होळीचं गाणं म्हणून ‘रंग बरसे’ हे गाणं ओळखलं जातंय. हे विविध रंगानी भरलेले गाणे रसिकांच्या मनातही रंग भरण्यास मदत करतंय. गाण्यात मुख्य भूमिकेत असणारे रवी (Ravi) आणि काव्याच्या (Kavya) लव्हेबल केमिस्ट्रीने गाण्याची रंगत आणखीनच वाढली आहे.  “मेरे गोरे बदन पे तुने जो मारी पिचकारी, लाल गुलाबी रंगों से मै भिग गयी हू सारी”, असे या गाण्याचे बोल आहेत.

या चित्रपटाचे आणि गाण्याचे दिग्दर्शक विजय बुटे असे म्हणतात की, ”नुकतेच आम्ही ‘चौपार’ चित्रपटामधील ‘रंग बरसे’ हे पहिले गाणे प्रदर्शित केले आहे. या चित्रपटात दोन राजघराण्यांमधील शत्रुत्वाची कहाणी मांडण्यात आली आहे. हा चित्रपटही होळी सणावर आधारित असल्याने, होळीचे औचित्य साधत या चित्रपटातील पहिले गाणे प्रदर्शित करण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि हे गाणं अनेकांच्या पसंतीला उतरतंय.”

या पुढे बोलताना ते असे म्हणाले की, “चित्रपटाचे चित्रीकरण एप्रिलमध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. आता चित्रपटाचे शूटिंग पुण्यात सुरू आहे. मला खात्री आहे की चित्रपटाची कथा आजवर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांपेक्षा नक्कीच निराळी आहे, त्यामुळे चित्रपट बघताना रसिक प्रेक्षकही खुर्ची सोडणार नाहीत.”

या चित्रपटाविषयी बोलताना, मुख्य भूमिकेत असलेला रवी म्हणाला, ”हा चित्रपट महाभारतातील ‘चौपार’ या गेमवर आधारित आहे. जुगाराच्या खेळामुळे शत्रुत्व कसे निर्माण होते आणि शेवटी त्याचे काय परिणाम होतात यावर हा चित्रपट आहे. दरम्यान, हा चित्रपट देखील एक प्रेमकथा असून त्यात अॅक्शन सीक्वेन्सचाही भरणा आहे. चित्रपटाची आगळीवेगळी कथा नक्कीच प्रेक्षकांना आवडेल याची आम्हाला खात्री आहे.” या पुढे तो असे म्हणाला, ”मी चित्रपटात राजवीर नामक एका प्रेमी युवकाची भूमिका साकारत आहे. चित्रपटात राजवीरला करावा लागणार संघर्ष पाहायला मिळणार आहे, मात्र संघर्ष आणि प्रेम या दोन बाजूंना त्याने कसे तोलले आहे हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.”

या चित्रपटाचे निर्माते शंतनू फुगे यांच्यासह चित्रपटाचे दिग्दर्शक विजय बुटे गेली 2 वर्षे चित्रपटावर काम करत आहेत. हा चित्रपट लवकरच रुपेरी पडद्यावर झळकण्यास सज्ज होणार आहे.

संबंधित बातम्या

Holi Festival 2022 : सोहेन खानची पर्यावरणपूरक होळी, मुलगा योहानसोबत खेळला पाण्याची होळी

Holi Festival : रंग बरसे… अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांची लग्नानंतरची पहिली होळी, पाहा फोटो…

Video: राज कपूर यांची होळी पार्टी कशी असायची? पहा नीतू कपूर यांनी शेअर केलेला हा खास व्हिडीओ

गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.