AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 16 विजेता एमसी स्टॅनला शोनंतर ‘या’ एका व्यक्तीशी ठेवायचं नाही कोणतंच नातं

हा शो जिंकल्यानंतर एमसी स्टॅनने पहिल्यांदाच त्याच्या यशाचा मंत्र सांगितला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने जिंकण्यामागची कारणं उलगडून सांगितली.

Bigg Boss 16 विजेता एमसी स्टॅनला शोनंतर 'या' एका व्यक्तीशी ठेवायचं नाही कोणतंच नातं
Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 14, 2023 | 3:35 PM
Share

मुंबई: प्रसिद्ध रॅपर आणि परफॉर्मर एमसी स्टॅन याने ‘बिग बॉस 16’चं विजेतेपद जिंकत प्रेक्षकांना आश्चर्याचा मोठा धक्का दिला. हा शो जिंकल्यानंतर एमसी स्टॅनने पहिल्यांदाच त्याच्या यशाचा मंत्र सांगितला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्याने जिंकण्यामागची कारणं उलगडून सांगितली. “शोमध्ये मी खरा वागलो. मी जसा आहे तसाच राहिलो आणि विनाकारण कोणाशी भांडणं केली नाही. त्यामुळेच मला प्रेक्षकांना जोडून ठेवता आलं”, असं त्याने सांगितलं. ग्रँड फिनालेमध्ये प्रियांका चहर चौधरी, एमसी स्टॅन, शालीन भनोट, अर्चना गौतम आणि शिव ठाकरे या पाच जणांमध्ये चुरस रंगली होती. त्यात रॅपर एमसी स्टॅनने बाजी मारली.

उशिरा गेम कळला

बिग बॉसच्या सुरुवातीच्या एपिसोड्समध्ये एमसी स्टॅनला शो सोडून जायचं होतं. त्याविषयी बोलताना तो म्हणाला, “मला शोमध्ये घडत असलेल्या बऱ्याच गोष्टी कळत नव्हत्या. मी कधीच इतके कॅमेरे पाहिले नव्हते. बिग बॉसमध्ये सकाळी लोक का नाचतात आणि विचित्र पद्धतीने एखाद्या गोष्टीसाठी का लढतात, हेच मला कळत नव्हतं. मात्र हळूहळू मी पुढे जात होतो आणि माझ्या परीने मी पूर्ण प्रयत्न केले.”

शिवसोबतची खास मैत्री

बिग बॉसच्या घरात स्टॅनची शिव ठाकरेसोबत खूप चांगली मैत्री झाली होती. “शिव आणि मी हे स्वप्न पाहिलं होतं की टॉप 2 मध्ये आम्हा दोघांना राहायचं आहे. त्यामुळे शेवटपर्यंत आम्ही सोबत राहिलो याचा मला आनंद आहे”, अशीही भावना त्याने व्यक्त केली.

बिग बॉसचा शो संपला असला तरी त्यातील स्पर्धकांची एकमेकांशी झालेली मैत्री कायम राहणार आहे. अब्दु रोझिक, साजिद खान, शिव ठाकरे, सुंबुल तौकिर खान आणि निमृत कौर यांच्या मी नेहमीच संपर्कात राहीन, असं स्टॅनने सांगितलं. मात्र बिग बॉसमधल्या एका व्यक्तीसोबत एमसी स्टॅनला कोणतंच नातं ठेवायचं नाही.

एका व्यक्तीशी कोणताच संपर्क ठेवणार नाही

“मला अर्चना गौतमशी कोणताच संपर्क ठेवायचा नाही. तिचा स्वभाव मिनिटा-मिनिटाला बदलतो. मंडलीशिवाय इतर कोणत्या स्पर्धकांशी माझा फारसा संपर्क येईल असं वाटत नाही”, असंही त्याने स्पष्ट केलं.

बिग बॉस 16 चा विजेता घोषित झाल्यानंतर माध्यमांशी बोलताना एसमी स्टॅन म्हणाला, “मला मनापासून वाईट वाटलं. पण कदाचित हा शो व्यक्तिमत्त्वावर आधारित होता. त्याने त्याची बाजू लोकांना दाखवली आणि मी बाजू प्रेक्षकांसमोर ठेवली. खूप कमी अंतराने तो हरला, आता त्यावर मी तरी काय करू शकतो.”

Follow Us
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा...
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा....
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन.
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल.
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन.
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट...
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट....
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात.
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय....
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय.....
मोटागावकरचा सर्वात धक्कादायक कांड, 2022 पासूनच पेपरफुटीची तयारी...
मोटागावकरचा सर्वात धक्कादायक कांड, 2022 पासूनच पेपरफुटीची तयारी....
पवारांकडून मोदींचं कौतुक, आता फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले....
पवारांकडून मोदींचं कौतुक, आता फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले.....
मोठी घोषणा! राज्यातील150 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या, मुख्यमंत्री...
मोठी घोषणा! राज्यातील150 कोटींच्या करारावर स्वाक्षऱ्या, मुख्यमंत्री....