AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रचंड लोकप्रिय सीरिज, 3 भागांनी चाहत्यांना लावलं प्रचंड वेड, 1-2 नाही तर 11 कलाकारांचे बदलले नशीब, चौथा भाग लवकरच…

8.4 रेटिंग असणारी प्रचंड लोकप्रिय वेब सीरिज, जिने बनवला होता नवीन रेकॉर्ड, 3 सीझन नंतरही चाहत्यांमध्ये चौथ्या सीझनबाबत प्रचंड उत्सुकता. ज्यामध्ये 1-2 नाही तर 11 कलाकारांचे बदलले नशीब.

प्रचंड लोकप्रिय सीरिज, 3 भागांनी चाहत्यांना लावलं प्रचंड वेड, 1-2 नाही तर 11 कलाकारांचे बदलले नशीब, चौथा भाग लवकरच...
Image Credit source: Social media
| Updated on: Mar 22, 2026 | 7:54 AM
Share

ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर सध्या विविध प्रकारच्या वेब सीरिज आणि चित्रपटांचा अक्षरशः पूर आला आहे. Netflix आणि Amazon Prime Video यांसारख्या प्लॅटफॉर्म्सनी अलीकडे अनेक नव्या सीरिज आणि चित्रपटांची घोषणा केली आहे. तसेच काही लोकप्रिय सीरिजच्या सिक्वेल्सचीही घोषणा करण्यात आली आहे. मात्र, या सर्वांमध्ये एक अशी सीरिज आहे, जिने ओटीटीवर एक वेगळाच ट्रेंड निर्माण केला आणि प्रेक्षकांच्या मनावर कायमस्वरूपी छाप सोडली.

ही क्राइम थ्रिलर सीरिज म्हणजे ‘मिर्जापुर’. दमदार कथा, वास्तववादी पात्रं आणि टोकदार संवाद यांच्या जोरावर या सीरिजने प्रचंड लोकप्रियता मिळवली. सेक्रेड गेम्स नंतर सर्वाधिक चर्चेत आलेल्या सीरिजमध्ये ‘मिर्जापुर’चा समावेश होतो. या सीरिजचे आतापर्यंत तीन सीझन प्रदर्शित झाले असून चौथ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

सर्वात लोकप्रिय क्राईम थ्रिलर सीरिज

‘मिर्जापुर’चा पहिला सीझन 2018 मध्ये प्रदर्शित झाला. गेल्या काही वर्षांत या सिरीजने 8.4 अशी IMDb रेटिंग मिळवत आपली लोकप्रियता टिकवून ठेवली आहे. ग्रामीण पार्श्वभूमी, स्थानिक बोलीभाषा आणि वास्तववादी गुन्हेगारी विश्व यांचा संगम या सीरिजमध्ये पाहायला मिळतो. या सीरिजने सिद्ध करून दाखवले की, ग्रामीण आणि प्रादेशिक विषयांवर आधारित कंटेंटही मोठ्या प्रमाणात यशस्वी होऊ शकतो.

या सीरिजनंतर ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारित पंचायत, रक्तांचल, दुपहिया आणि मिट्टी यांसारख्या अनेक सीरिज प्रेक्षकांसमोर आल्या. तसेच उत्तर प्रदेश आणि बिहारच्या पार्श्वभूमीवर आधारित खाकी आणि जामताड़ा यांसारख्या सीरिजही लोकप्रिय ठरल्या.

मिर्जापुरमधील कलाकार

‘मिर्जापुर’ने अनेक कलाकारांचे करिअर बदलून टाकले. पंकज त्रिपाठी यांनी साकारलेला ‘कालीन भैया’ ही भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेली आयकॉनिक भूमिका आहे. त्याचप्रमाणे दिव्येंदु शर्माला ‘मुन्ना भैया’ या भूमिकेमुळे मोठी लोकप्रियता मिळाली.

विक्रांत मैसीला ‘बबलू पंडित’च्या भूमिकेतून आपली वेगळी छाप पाडली तर अली फजल ‘गुड्डू पंडित’ म्हणून घराघरात पोहोचला. श्रेया पिलगांवकर (स्वीटी गुप्ता) आणि श्वेता त्रिपाठी (गोलू गुप्ता) यांनीही प्रेक्षकांची मनं जिंकली.

याशिवाय अभिषेक बनर्जी यांनी ‘कंपाउंडर’च्या भूमिकेतून वेगळी ओळख निर्माण केली. पुढे त्यांनी पाताल लोक मधील ‘हथौडा त्यागी’ या भूमिकेमुळे अधिक प्रसिद्धी मिळवली. रसिका दुग्गलने ‘बीना त्रिपाठी’ची भूमिका साकारत प्रभाव टाकला. दुसऱ्या सीझनमध्ये अंजुम शर्मा (शरद शुक्ला) ची एंट्री झाली, ज्यामुळे कथेला नवे वळण मिळाले. तसेच इशा तलवार यांनी ‘माधुरी यादव’च्या भूमिकेतून प्रेक्षकांचे लक्ष वेधले.

Follow Us
'चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,'...काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?
'चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,'...काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?.
राऊत यांचे आरोप बिनबुडाचे, माझं खातं खरात कसे चालवणार? - दीपक केसरकर
राऊत यांचे आरोप बिनबुडाचे, माझं खातं खरात कसे चालवणार? - दीपक केसरकर.
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण.
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त.
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड.
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?.
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?.
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे.
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?.