मुंबई : ‘मै एक मां हु और मा के कोई सपने नई होते’. अश्विनी अय्यर-तिवारी दिग्दर्शित ‘पंगा’ सिनेमातील हा संवाद घर-संसारात रमल्यामुळे आपल्या स्वप्नांना तिलांजली देणाऱ्या प्रत्येक स्त्रीला आपलासा वाटेल (Panga Movie Review). संसारात रमल्यामुळे कित्येक स्त्रियांना आपली महत्त्वाकांक्षा, स्वप्न सोडून द्यावी लागतात. पण तुमच्यात जिद्द आणि महत्त्वाकांक्षा असेल, तर ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला वयाच बंधन नसतं. त्या स्वप्नांना तुम्ही जिद्दीच्या जोरावर केव्हाही गवसणी घालू शकतात, यश मिळवू शकतात. हेच अश्विनी अय्यर-तिवारीनं ‘पंगा’मध्ये दाखवलं आहे. चुल आणि मुल या प्रपंचात ज्या महिला आपल्या स्वप्नांना मुरड घालतात त्या सगळ्यांसाठी ‘पंगा’ एक उत्तम उदाहरण आहे. बॉलिवूडमध्य़े आतापर्यंत अनेक स्पोर्ट्स ड्रामा आलेत, पण ‘पंगा’नं त्यापुढे जाऊन विचार केल्यामुळे हा सिनेमा इतरांपेक्षा वेगळा ठरतो (Panga Movie Review).