AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

खासदारकीमुळे काय नुकसान होतय? त्यावर कंगना रनौत पहिल्यांदाच मोकळेपणाने बोलल्या

Kangana Ranaut: खासदारकीमुळे कंगना रनौत यांचं होतंय नुकसान? कोणत्या अडचणींचा करावा लागतोय सामना... कंगना रनौत पहिल्यांदाच मोकळेपणाने बोलल्या, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त कंगना यांच्या वक्तव्याची चर्चा...

खासदारकीमुळे काय नुकसान होतय? त्यावर कंगना रनौत पहिल्यांदाच मोकळेपणाने बोलल्या
Updated on: Aug 13, 2024 | 11:21 AM
Share

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत आता फक्त अभिनेत्री राहिलेल्या नाहीत, राजकारणात देखील त्यांनी स्वतःचं भक्कम स्थान निर्माण केलं आहे. हिमाचल येथील मंडी मतदार संघातून कंगना खासदार म्हणून निवडून आल्या आहे. त्यामुळे कंगना यांना आता सिनेमा आणि राजकारण यांच्यामध्ये वेळ मॅनेज करणं प्रचंड कठीण झालं आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत कंगना यांनी खासदार झाल्यानंतर समोर येणाऱ्या आव्हानांबद्दल मोठा खुलासा केला नाही. खासदार होणं हे खूप मागणीचं काम आहे… असं देखील कंगना म्हणाल्या.

खऱ्या आयुष्यात अभिनेत्री आणि खासदार अशा दोन्ही भूमिका साकारणाऱ्या कंगना रनौत म्हणाल्या, ‘एक खासदार असणं फार मागणीचं काम आहे. विशेषतः माझ्या मतदारसंघात. कारण आमच्या येथे आता पूर आला आहे. त्यामुळे मी प्रत्येक ठिकाणी उपस्थित आहे. हिमाचल जाऊन पाहायचं आहे की सर्व काही नियंत्रणात आहे की नाही…’

कंगाना यांच्या मतदार संघात आलेल्या पुरामुळे अभिनेत्रीचं वेळापत्रक आणखी व्यस्त झालं आहे. कंगना यांनी चित्रपटसृष्टीतील वचनबद्धतेसह खासदार म्हणून स्वतःच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागत आहेत. अभिनेत्रीच्या राजकीय कारकिर्दीचा सिनेमांवर झालेला परिणाम स्पष्टपणे दिसून येत आहे. वाढलेल्या जबाबदाऱ्यांमुळे आगामी सिनेमांवर परिणाम होत आहे… असं देखील कंगना म्हणाल्या.

कंगना रनौत पुढे म्हणाल्या, ‘माझ्या आगामी सिनेमांवर प्रभाव पडत आहे. पुढील प्रोजेक्ट्स प्रतीक्षेत आहेत. मी शुटिंग सुरु करत नाहीये. आता सध्या आयुष्यात अनेक गोष्टी घडत आहेत..’ सांगायचं झालं तर, कंगना रनौत स्टारर ‘तनू वेड्स मनू’ सिनेमाच्या तिसऱ्या भागाच्या प्रतीक्षेत चाहते आहेत. सिनेमाच्या दोन्ही भागांमध्ये कंगना यांनी दमदार भूमिका साकारली होती.

सिनेमाते दिग्दर्शक आनंद एल राय यांनी ‘तनू वेड्स मनू’ सिनेमाच्या तिसऱ्या भागाबद्दल मोठी अपडेट दिली होती. ‘तिसऱ्या भागाची कथा अद्याप ठरलेली नाही. तनू वेड्स मनू रिटर्न्समध्ये दत्तो नावाची भूमिका प्रेक्षकांच्या भेटीस आली. या सर्व भूमिका तिसऱ्या भागाची मागणी करत आहेत. चांगली कथा हाती लागल्यानंतर नक्की तिसऱ्या भागाचा विचार करु…’ असं देखील दिग्दर्शक म्हणाले.

कंगना रनौत स्टारर ‘इमरजेन्सी’ सिनेमा

कंगना रनौत स्टाकक ‘इमरजेन्सी’ सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. सिनेमाचा ट्रेलर 14 ऑगस्ट 2024 मध्ये प्रदर्शित होणार आहे. सिनेमा 6 सप्टेंबर 2024 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सिनेमात दिवंगत अभिनेते सतीश कौशिक मुख्य भूमिकेत आहेत. तर श्रेयस तळपदे, महिमा चौधरी यांच्यासोबत अनेक सेलिब्रिटी मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्...
महादेव मुंडेंच्या पत्नीचा खळबळजनक आरोप, थेट कराडचं घेतलं नाव अन्....
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार
जिथे वडिलांनी लोकप्रतिनिधित्व केलं, तिथेच गवईंचा सत्कार.
सत्कार सोहळ्यात फडणवीसांकडून सरन्यायाधीश गवईंचे कौतुक
सत्कार सोहळ्यात फडणवीसांकडून सरन्यायाधीश गवईंचे कौतुक.
आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?पोलिसांच्या कारवाईवर अविनाश जाधव भडकले
आम्ही आतंकवादी आहोत की दहशतवादी?पोलिसांच्या कारवाईवर अविनाश जाधव भडकले.
अविनाश जाधवांची धडाकेबाज एन्ट्री अन् कार्यकर्त्यांचा जल्लोष
अविनाश जाधवांची धडाकेबाज एन्ट्री अन् कार्यकर्त्यांचा जल्लोष.
गोपनीय खात्यात लपवल, मध्यरात्री जे घडल ते अविनाश जाधवांनी सारं सांगितल
गोपनीय खात्यात लपवल, मध्यरात्री जे घडल ते अविनाश जाधवांनी सारं सांगितल.
त्यांना चपलेने मारलं पाहिजे..; राजन विचारेंची सरनाईकांवर आगपाखड
त्यांना चपलेने मारलं पाहिजे..; राजन विचारेंची सरनाईकांवर आगपाखड.
मोठी बातमी; पोलीस नमले, अविनाश जाधवांना सोडलं; बाहेर येताच म्हणाले...
मोठी बातमी; पोलीस नमले, अविनाश जाधवांना सोडलं; बाहेर येताच म्हणाले....
सरनाईकांच्या अंगावर बाटली फेकली, संघर्षाचं वातावरण अन् घोषणाबाजी
सरनाईकांच्या अंगावर बाटली फेकली, संघर्षाचं वातावरण अन् घोषणाबाजी.
MNS: ही सरकारची दडपशाही, अविनाशला सोडा, अन्यथा...संदीप देशपांडे आक्रमक
MNS: ही सरकारची दडपशाही, अविनाशला सोडा, अन्यथा...संदीप देशपांडे आक्रमक.