AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मायरा वायकुळला ट्रोल करणाऱ्यांना वडिलांचं सडेतोड उत्तर, म्हणाले “कोणत्याच मुलाला..”

चिमुकली मायरा वायकुळ सध्या 'नाच गं घुमा' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोशल मीडियावर स्टार असलेल्या मायराला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतोय. तिच्या बोलण्या-वागण्यावरून टीका-टिप्पणी करणाऱ्यांना मायराच्या वडिलांनी उत्तर दिलं आहे.

मायरा वायकुळला ट्रोल करणाऱ्यांना वडिलांचं सडेतोड उत्तर, म्हणाले कोणत्याच मुलाला..
मायरा वायकुळ आणि तिचे आईवडीलImage Credit source: Instagram
| Updated on: May 06, 2024 | 10:46 AM
Share

मायरा वायकुळ.. हे नाव आज सोशल मीडियावर खूप प्रसिद्ध आहे. अवघ्या सात वर्षांची मुलगी मायरा तिच्या विविध व्हिडीओंमुळे नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते. सोशल मीडियावरून स्टार झालेल्या मायराने आधी मालिकेत काम केलं. त्यानंतर आता ती ‘नाच गं घुमा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त मायराने काही मुलाखती दिल्या आहेत. मात्र या मुलाखतींमध्ये ती ज्याप्रकारे बोलते किंवा उत्तर देते, त्यावरून काहींनी तिला ट्रोल केलंय. केवळ मायराच नाही तर तिच्या आईवडिलांवरही टीका केली जात आहे. या ट्रोलिंगवर मायराचे वडील गौरव वायकुळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सोशल मीडियावर मायराचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्राम रिल्स, डान्सचे व्हिडीओज यांमुळे ती लोकप्रिय झाली. चिमुकल्या मायराचं अभिनय आणि तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव पाहून नेटकरी थक्क होतात. मायराचं सोशल मीडिया अकाऊंट तिची आई श्वेता वायकुळ सांभाळते. मात्र कमी वयात मायराचं मोठ्यांसारखं बोलणं, वागणं पाहून नेटकरी तिच्या आईवडिलांना ट्रोल करू लागले आहे. मायराचं बालपण तिच्यापासून हिरावून घेत असल्याचाही टीका अनेकांनी केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गौरव वायकुळ यांनी त्यावर उत्तर दिलं आहे.

ते म्हणाले, “मला त्या नकारात्मकतेने काहीच फरक पडत नाही. कारण सोशल मीडियावर हजारो कमेंट्स असतात. त्यापैकी 10 नकारात्मक, टीका करणाऱ्या असतात. त्यामुळे माझ्यासाठी उर्वरित सकारात्मक आणि कौतुक करणारे कमेंट्स महत्त्वाच्या आहेत. प्रत्येत व्यक्तीला त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे. पण मायराच नाही तर कोणत्याही लहान मुलाबद्दल अशा पद्धतीने मत बनवणं चुकीचं आहे. कारण त्या गोष्टी मुलांनी वाचल्या तर त्याचा काय परिणाम होईल, याची आपल्यालाही कल्पना नसेल. मायराला या सर्व गोष्टींपासून लांब कसं ठेवायचं हे मला आणि माझी पत्नी श्वेताला माहित आहे. त्यामुळे आम्ही तिच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहोत.”

मायराच्या बोलण्याविषयी ते पुढे म्हणाले, “कसं बोलावं किंवा कसं वागावं याचं आम्ही तिला खास प्रशिक्षण दिलं नाही. ती लहान मुलांसारखी ओघाने बोलून जाते. तिला कोणीच काही शिकवलेलं नाही, किंवा सांगितलेलंही नाही. तिचं ती करतेय. त्यामुळे आपण सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रीत करावं असं मला वाटतं. लोक काय बोलतात म्हणून आपण तिला थांबवू नये असं मला वाटतं. याने तिच्यातील प्रतिभेला फटका बसेल. आम्ही तिला कधीच कोणत्या कामासाठी बळजबरी करत नाही. ती हो म्हणाली तरच आम्ही पुढे जातो.”

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.