AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बजेट पेक्षा 650 टक्के अधिक कमाई करणारा चित्रपट, 69 वर्षांपूर्वी झालेला प्रदर्शित, कोणीच मोडू शकलं नाही रेकॉर्ड

1957 मध्ये प्रदर्शित झालेला नरगिस दत्तच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केली होती रेकॉर्ड ब्रेक कमाई. बजेट पेक्षा 650 टक्के अधिक कमावलेला नफा. आजही या चित्रपटाचा कोणी मोडू शकलं नाही रेकॉर्ड.

बजेट पेक्षा 650 टक्के अधिक कमाई करणारा चित्रपट, 69 वर्षांपूर्वी झालेला प्रदर्शित, कोणीच मोडू शकलं नाही रेकॉर्ड
| Updated on: May 14, 2026 | 6:53 PM
Share

Nargis Dutt : भारतीय चित्रपटसृष्टीत अनेक सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर विक्रम रचले. आजच्या काळात 500 कोटी, 1000 कोटींच्या कमाईवर चित्रपटाचं यश ठरतं. मात्र, तब्बल 69 वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटाने असा विक्रम केला, जो आजही अनेकांसाठी प्रेरणादायी मानला जातो. हा चित्रपट म्हणजे अभिनेत्री नरगिस दत्त यांचा गाजलेला चित्रपट Mother India.

1957 साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने त्या काळात बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. आईच्या संघर्षाची कथा मांडणारा हा चित्रपट भारतीय चित्रपटांच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या चित्रपटांपैकी एक मानला जातो. इतकंच नाही तर आजही ‘मदर इंडिया’सारखा प्रभावी आणि भावनिक चित्रपट पुन्हा निर्माण झाला नाही असं अनेक चित्रपट प्रेमी सांगतात.

सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट

या चित्रपटाचं दिग्दर्शन प्रसिद्ध दिग्दर्शक महबूब खान यांनी केलं होतं. चित्रपटात नरगिस दत्त यांच्यासोबत राजकुमार आणि सुनील दत्त यांनीही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. ग्रामीण भारत, दारिद्र्य, आईचं ममत्व आणि संघर्ष यांचा संगम या चित्रपटात प्रभावीपणे दाखवण्यात आला होता.

‘मदर इंडिया’ त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक ठरला होता. रिपोर्टनुसार, हा चित्रपट जवळपास 60 लाख रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. मात्र, बॉक्स ऑफिसवर त्याने तब्बल 4.5 कोटी रुपयांची कमाई केली होती. त्या काळातील ही रक्कम प्रचंड मोठी मानली जात होती. चित्रपटाच्या निर्मात्यांना जवळपास 650 टक्के नफा झाला होता. त्यामुळे हा चित्रपट 1957 मधील सर्वात फायदेशीर चित्रपट ठरला.

काय होती चित्रपटाची कथा?

चित्रपटाच्या कथेबद्दल बोलायचं झाल्यास, यात एका गरीब आईची कथा दाखवण्यात आली आहे. अनेक संकटं, गरिबी आणि सामाजिक अडचणींना सामोरं जात ती आपल्या मुलांचं संगोपन करते. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी ती शेतात कष्ट करते, हालअपेष्टा सहन करते आणि आयुष्याशी झुंज देत राहते. आईच्या त्यागाची आणि जिद्दीची ही कथा प्रेक्षकांच्या मनाला भिडली होती.

आजही ‘मदर इंडिया’ हा भारतीय सिनेमातील क्लासिक चित्रपट मानला जातो. या चित्रपटाला IMDb वर 10 पैकी 7.8 रेटिंग मिळालं आहे. इतक्या वर्षांनंतरही या चित्रपटाची लोकप्रियता कायम असून भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अजरामर कलाकृती म्हणून त्याचं नाव घेतलं जातं.

Follow Us
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त...
मुख्यमंत्र्यांनी PUC संपलेली बाईक चालवली? वर्षा गायकवडांच्या संतप्त....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी.....
मोदींच्या आवाहनावर पवारांचा मोठा सवाल; म्हणाले, निर्णय घेण्यासाठी......
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद
आर्थिक आणीबाणी टाळायची असेल तर...मोदींच्या काटकसरीच्या आवाहनानंतर शरद.
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह...
विश्वास नाही बसणार! तरूणीनेच केलं भयंकर कांड, स्वतःचेच आक्षेपार्ह....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की.....
गडकरी बसमध्ये, पण मागे 40 गाड्यांचा ताफा; पेट्रोल बचतीचा संदेश की......
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,
मोठा राडा! घरोघरी जाऊन केल्या जाणाऱ्या कथित धर्मांतरणाचा कट उधळला,.
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू
लग्न होऊन फक्त 20 दिवस, उष्माघाताने नवविवाहितेचा दुर्दैवी मृत्यू.
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश...
मोदींच्या बचत मिशनला राज्याचा प्रतिसाद; फडणवीसांकडून काटकसरीचे आदेश....
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर...
मृतदेहाला पेटीत तरी ठेवा... अडीच महिन्याच्या नातीचा मृतदेह मांडीवर....
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री...
10 दिवसांच्या सस्पेन्सनंतर नाव फाइनल! कोण आहे केरळमच्या मुख्यमंत्री....