AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानी कलाकारांवरुन दिलजीतला आधी पाठिंबा, मग नसीरुद्दीन शाह यांनी अचानक अशी कृती का केली?

दिलजीत दोसांझच्या 'सरदार जी 3' या चित्रपटावरून मोठा वाद सुरू आहे. यामध्ये पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरसोबत काम केल्याबद्दल दिलजीतवर जोरदार टीका होत आहे. यादरम्यान नसीरुद्दीन शाह यांनी दिलजीतची बाजू घेतली होती. परंतु त्यांनी तो पोस्ट आता डिलिट केला आहे.

पाकिस्तानी कलाकारांवरुन दिलजीतला आधी पाठिंबा, मग नसीरुद्दीन शाह यांनी अचानक अशी कृती का केली?
हानिया आमिर- दिलजीत दोसांझ आणि नसीरुद्दीन शाहImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 01, 2025 | 9:18 AM
Share

पाकिस्तानी अभिनेत्री हानिया आमिरसोबत भारतीय गायक आणि अभिनेता दिलजित दोसांझने ‘सरदार जी 3’ या चित्रपटात काम केल्याने जोरदार टीका झाली. या टीकेच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी त्याची बाजू घेतली होती. दिलजीतला पाठिंबा देणारी एक पोस्ट त्यांनी फेसबुकवर लिहिली होती. माझा दिलजीतला खंबीर पाठिंबा आहे, असं त्यांनी लिहिलं होतं. परंतु आता यावरून त्यांनी यू-टर्न घेतल्याचं दिसतंय. कारण नसीरुद्दीन यांनी दिलजीतसाठी लिहिलेली ती पोस्ट आता फेसबुकवर दिसत नाही. ‘फेसबुकवरील ही पोस्ट आता अस्तित्त्वात नाही. कदाचित ती काढून टाकण्यात आली असावी किंवा पोस्टच्या प्रायव्हसी सेटिंगमध्ये काही बदल केला असावा’, असा मेसेज त्यावर दिसत आहे. त्यामुळे नसीरुद्दीन यांनी त्यांची पोस्ट डिलिट केली असावी, असंही म्हटलं जात आहे.

काय होती नसीरुद्दीन शाह यांची पोस्ट?

‘मी दिलजीतसोबत खंबीरपणे उभा आहे. जुमला पार्टीचं घाणेरड्या कारस्थानाचं विभाग त्याच्यावर निशाणा साधण्याच्या संधीची वाटच पाहत होतं. अखेर ती संधी मिळाली, असं त्यांना वाटतंय. चित्रपटातील कास्टिंगसाठी तो जबाबदार नव्हता, दिग्दर्शक होता. परंतु त्यांना कोणीच ओळखत नाही आणि दिलजीतला संपूर्ण जग ओळखतं. त्याने कास्टचा स्वीकार केला कारण त्याच्या डोक्यात कोणतंही विष नाही,’ असं त्यांनी लिहिलं होतं. ‘या गुंडांना भारत आणि पाकिस्तानातील लोकांमधील वैयक्तिक संवाद संपवायचा आहे. माझे जवळचे नातेवाईक आणि काही प्रिय मित्र तिथे आहेत. कोणीही मला त्यांना भेटण्यापासून किंवा जेव्हा मला वाटेल तेव्हा त्यांच्याप्रती प्रेम व्यक्त करण्यापासून कोणी रोखू शकत नाही. ‘पाकिस्तानात जा’ असं म्हणणाऱ्यांना माझं उत्तर असेल की ‘कैलाशला जा’’, अशा शब्दांत त्यांनी सुनावलं होतं.

नसीरुद्दीन शाह यांच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. पहलगाममधील दहशवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांसोबत काम न करण्याची भूमिका अधिक तीव्र करण्यात आली होती. तरीही दिलजीतने हानियासोबत काम केल्याने, त्यावर जोरदार टीका होत असताना नसीरुद्दीन यांनी त्याची बाजू घेतल्याने नेटकरी भडकले होते. ‘ज्या देशात राहता, जिथे कमावता.. त्याच देशाशी तुम्ही प्रामाणिक राहू शकत नाही’, अशी टीका नेटकऱ्यांनी केली होती.

एप्रिलमधील पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातली. त्यानंतरही हानिया आमिरचा चित्रपटात समावेश असल्याने भारतात दिलजीतच्या या चित्रपटावरच बंदी घालण्याची मागणी होत आहे. अनेक कलाकारांनी दिलजीतवर टीका केली. तर काहींनी त्याचं समर्थनही केलं.

चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु
चंद्रपूरमध्ये भाजपची ठाकरेंच्या सेनेला ऑफर? महापौर कोणाचा; चर्चा सुरु.
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?
बारामतीत होणारी पोटनिवडणूक एकतर्फी? संजय शिरसाट नेमकं काय म्हणाले?.
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा
PF Withdrawal Update : खोटं बोलून PF काढताय? लगेच थांबा.
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO
नवी मुंबईत मद्यधुंद इनोवा चालकाची वाहनांना धडक | VIDEO.
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ
जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील पनवेल टोल नाक्यावर गोंधळ.
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत
रहेजाच्या ऑफिसची तोडफोड; वंचितचे कार्यकर्ते अटकेत.
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित
संघाच्या शाखेत राजकारण होत नाही! मोहन भागवतांनी स्पष्टच सांगित.
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर
फडणवीसांकडून मेक इन इंडिया व औद्योगिक विकासावर भर.
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला
भारताची अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर जाणार! फडणवीसांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न
कार्यक्रमाला सलमान खान आला म्हणून काय बिघडलं? संजय शिरसाट यांचा प्रश्न.