AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानबद्दलच्या वक्तव्यानंतर सिद्धूंना सोडावा लागला कपिलचा शो; आता म्हणाले “सरदारच पाहिजे..”

नवज्योत सिंग सिद्धू हे तब्बल पाच वर्षांनंतर कॉमेडी कपिल शर्माच्या शोमध्ये परतले आहेत. कपिलच्या शोच्या आगामी भागाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये नवज्योत सिंग सिद्धू हे पुन्हा एकदा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मधल्या त्यांच्या प्रमुख पाहुण्यांच्या खुर्चीवर बसलेले दिसून येत आहेत.

पाकिस्तानबद्दलच्या वक्तव्यानंतर सिद्धूंना सोडावा लागला कपिलचा शो; आता म्हणाले सरदारच पाहिजे..
Archana Puran Singh and Navjot Singh SidhuImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 14, 2024 | 10:00 AM
Share

पाच वर्षांनंतर नवज्योत सिंग सिद्धू हे कॉमेडियन कपिल शर्माच्या शोवर परतले आहेत. नुकताच या एपिसोडचा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेल्या पाच वर्षांपासून या शोमध्ये अभिनेत्री अर्चना पूरण सिंह प्रमुख पाहुणी म्हणून दिसली. मात्र आता अचानक तिच्या खुर्चीवर नवज्योत सिंग सिद्धू यांना पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या एपिसोडचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

या खास एपिसोडमध्ये नवज्योत सिंग सिद्धू हे त्यांची पत्नी आणि क्रिकेटर हरभजन सिंग यांच्यासोबत पोहोचले होते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या क्लिपमध्ये सिद्धू त्यांच्याच अंदाजात कपिलला म्हणतात, “अब मोटरसायकल नहीं, कार चाहिये, अबे ऑडियन्स सारी कह रही है की सरदार चाहिए (आता मोटरसायकल नको, कार पाहिजे, प्रेक्षक म्हणतायत की आता त्यांना सरदार पाहिजे). आपण शोमध्ये परत यावं अशी मागणी प्रेक्षकांकडून होत असल्याचं त्यांनी म्हटलंय. हे ऐकल्यानंतर कपिल जोरात हसतो. या व्हिडीओवर कमेंट करणाऱ्यांनीही ‘सिद्धूंना परत आणा’ अशी मागणी केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Netflix India (@netflix_in)

2013 मध्ये कलर्स टीव्हीवर जेव्हापासून कपिल शर्माचा कॉमेडी शो सुरू झाला, तेव्हापासून नवज्योत सिंग सिद्धू या शोचा भाग होते. मात्र 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यावरून केलेल्या वादग्रस्त टिप्पणीमुळे त्यांना हा शो सोडावा लागला होता. त्यावेळी सिद्धू म्हणाले होते, “हे (दहशतवादी हल्ला) भ्याड आणि घृणास्पद कृत्य आहे आणि मी त्याचा तीव्र निषेध करतो. हिंसा नेहमीच निषेधार्ह असते आणि ज्यांनी ती केली त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. पण मूठभर लोकांसाठी तुम्ही संपूर्ण देशाला दोष देऊ शकता का? एखाद्या व्यक्तीला तुम्ही दोष देऊ शकता का?” सिद्धूंच्या या वक्तव्याचे सोशल मीडियावर तीव्र पडसाद उमटले होते. अनेकांनी त्यावेळी ‘द कपिल शर्मा शो’वर बंदी आणण्याची मागणी केली होती. ‘बॉयकॉट सिद्धू’ असा हॅशटॅग ट्रेंड झाला होता. या वादानंतर कपिल शर्माच्या शोमध्ये सिद्धूंची जागा अर्चना पुरण सिंगने घेतली.

Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.