AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

5 वर्षांनंतर कपिल शर्माच्या शोमध्ये परतले नवज्योत सिंग सिद्धू; अर्चनाकडून नाराजी व्यक्त

तब्बल पाच वर्षांनंतर नवज्योत सिंग सिद्धू हे कपिल शर्माच्या शोवर परतले आहेत. पुलवामा हल्ल्यावरून केलेल्या कमेंटमुळे त्यांना हा शो सोडावा लागला होता. आता ते या शोमध्ये परत आले असून त्याचा टीझर नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आाल आहे.

5 वर्षांनंतर कपिल शर्माच्या शोमध्ये परतले नवज्योत सिंग सिद्धू; अर्चनाकडून नाराजी व्यक्त
Archana Puran Singh and Navjot Singh SidhuImage Credit source: Instagram
| Updated on: Nov 11, 2024 | 12:42 PM
Share

नवज्योत सिंग सिद्धू हे तब्बल पाच वर्षांनंतर कॉमेडी कपिल शर्माच्या शोमध्ये परतले आहेत. कपिलच्या शोच्या आगामी भागाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये नवज्योत सिंग सिद्धू हे पुन्हा एकदा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’मधल्या त्यांच्या प्रमुख पाहुण्यांच्या खुर्चीवर बसलेले दिसून येत आहेत. यामुळे इतक्या वर्षांपासून त्याच खुर्चीवर बसलेली अभिनेत्री अर्चना पुरण सिंग नाराज झाल्याचं पहायला मिळतंय. या टीझरमध्ये सिद्धू हे अर्चनाच्या खुर्चीवर बसलेले दिसतात आणि कॉमेडियन सुनील ग्रोवर सिद्धूंच्या वेशात त्यांच्या समोर येतो. सुनीलला आपल्याच वेशात पाहून सिद्धू म्हणतात की, “मीच खरा नवज्योत सिंग सिद्धू आहे.” यानंतर अर्चना पुरण सिंग फ्रेममध्ये येते आणि नाराज होऊन कपिलला सिद्धूंबद्दल विचारते. “कपिल, तू सरदार साहेबांना सांग की माझ्या खुर्चीवर उठा, कधीपासून ते कब्जा करून बसलेत.”

या एपिसोडमध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि क्रिकेटर हरभजन सिंगसुद्धा उपस्थित होते. या एपिसोडचा टीझर प्रदर्शित होताच नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट्सचा वर्षाव केला. ‘सरदारजी इज बॅक’, ‘आम्हाला तुमची खूप आठवण आली’, असे कमेंट्स नेटकऱ्यांनी केले आहेत. 2013 मध्ये कलर्स टीव्हीवर जेव्हापासून कपिल शर्माचा कॉमेडी शो सुरू झाला, तेव्हापासून नवज्योत सिंग सिद्धू या शोचा भाग होते. मात्र 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यावरून केलेल्या वादग्रस्त टिप्पणीमुळे त्यांना हा शो सोडावा लागला होता. त्यावेळी सिद्धू म्हणाले होते, “हे (दहशतवादी हल्ला) भ्याड आणि घृणास्पद कृत्य आहे आणि मी त्याचा तीव्र निषेध करतो. हिंसा नेहमीच निषेधार्ह असते आणि ज्यांनी ती केली त्यांना शिक्षा झालीच पाहिजे. पण मूठभर लोकांसाठी तुम्ही संपूर्ण देशाला दोष देऊ शकता का? एखाद्या व्यक्तीला तुम्ही दोष देऊ शकता का?”

नवज्योत सिंग सिद्धूंच्या या वक्तव्याचे सोशल मीडियावर तीव्र पडसाद उमटले होते. अनेकांनी त्यावेळी ‘द कपिल शर्मा शो’वर बंदी आणण्याची मागणी केली होती. ‘बॉयकॉट सिद्धू’ असा हॅशटॅग ट्रेंड झाला होता. या वादानंतर कपिल शर्माच्या शोमध्ये सिद्धूंची जागा अर्चना पुरण सिंगने घेतली. आता सिद्धू पाच वर्षांनंतर जरी कपिलच्या शोमध्ये परतले असले तरी ते फक्त एका आठवड्यापुरतेच आले आहेत.

Follow Us
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या.
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा.
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली.
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.