AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Aishwarya Rai – Abhishek Bachchan खरोखरच घटस्फोट घेणार?, त्या गोष्टीमुळे चर्चांना उधाण; काल असं काय घडलं?

ऐश्वर्या राय बच्चनच्या 51 व्या वाढदिवशी कुटुंबातील सदस्यांनी केलेल्या दुर्लक्षामुळे बच्चन कुटुंबातील वाद पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. अभिषेक आणि अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर शुभेच्छा न दिल्याने घटस्फोटाच्या अफवांना बळ मिळाले आहे. ऐश्वर्याचे चित्रपटांपासूनचे अंतर आणि कुटुंबातील दुरावा, याची बरीच चर्चा आहे.

Aishwarya Rai - Abhishek Bachchan खरोखरच घटस्फोट घेणार?, त्या गोष्टीमुळे चर्चांना उधाण; काल असं काय घडलं?
Aishwarya Rai and Abhishek Bachchan (1)Image Credit source: Instagram
| Updated on: Nov 02, 2024 | 12:48 PM
Share

बॉलिवूडमध्ये बच्चन कुटुंबाचा बराच बोलबाला आहे. मात्र सध्या ही फॅमिली त्यांच्यातील वादामुळे चर्चेत आहे. रिपोर्ट्सनुसार अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिचा पती , अभिनेता अभिषेक बच्चन यांच्यात काहीही आलबेल सून ते दोघ घटस्फोट घेणार असल्याचेही वृत्त आहे . काही महिन्यांपूर्वी अनंत -राधिकाच्या लग्नात अभिषेकने संपूर्ण बच्चन कुटुंबासह एंट्री घेतली, मात्र त्यांच्यासोबत ऐश्वर्या – आराध्या कुठेच दिसल्या नाहीत. बऱ्याच वेळाने त्या दोघींनी वेगळी एंट्री केली, तेव्हा तर त्यांच्यातील वादाच्या चर्चांना आणखीनच उधाण आले. काही रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या सध्या बच्चन कुटुंबासोबत न राहता मुलगी आराध्या आणि तिची आई अशा तिघी राहतात. केबीसीमध्ये अमिताभ बच्चन यांच्या वाढदविसाच्या सोहळ्यामध्ये ऐश्वर्याचा उल्लेख नव्हता, तसेच काही वेळा चाहत्यांशी बोलताना अमिताभ हे घरच्यांबद्दल सांगतात मात्र तेव्हाही ते आराध्या किंवा ऐश्वर्या कोणाचंच नाव घेताना दिसत नाहीत.

या सगळ्यावरून एकंदरच बच्चन कुटुंबातील तणाव सर्वांना दिसत असून काल तर त्यावर एका प्रकारे शिक्कामोर्तबच झालं. सध्या सर्वजण सोशल मीडियावर पोस्ट करतात, वाढदिवसाच्या शुभेच्छाही तिथे दिल्या जातात. काल ( 1 नोव्हेंबर) ऐश्वर्या राय हिचा 51 वा वाढदिवस होता. लाखो चाहते, तसेच सेलिब्रिटींनीही तिला शुभेच्छा दिल्या.पण ऐश्वर्याचा पती अभिषेक, सासरे अणिताभ किंवा बच्चन कुटुंबातील इतर कोणीच तिला विश केलं नाही, ना सोशल मीडियावर पोस्ट टाकली. त्यामुळेच आता ऐश्वर्याच्या चाहत्यांनी अटकळ बांधायला सुरूवात केली असून अभिषेक-ऐश्वर्याच्या नात्यातील तणावाबद्दल उघडउघड चर्चा होत आहे.

अफवा खऱ्या ठरणार का ?

अभिषेक आणि अमिताभ बच्चन हे काही खूप खाजगी आहेत, सोशल मीडिया वापरत नाहीत असं तर नाहीये. दोघेही सोशल मीडियावर बरेच ॲक्टिव्ह असतात आणि त्यांच्या अकाउंटवर वेळोवेळी त्यांच्या आयुष्याशी आणि चित्रपटांशी संबंधित गोष्टी शेअर करत असतात. यापूर्वी त्यांनी दरवेळेस ऐश्वर्याला तिच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. पण यावेळेस प्रकरण वेगळंच आहे. यावेळी मात्र अभिषेक आणि अमिताभ यांनी ऐश्वर्याला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत.

ऐश्वर्याचंही तसंच काहीसं आहे. दरवेळेस अभिषेकचा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी ती सोशल मीडियावर त्याला सपोर्ट करायची. पण सध्या चित्र बदललं आहे. ‘आय वाँट टू टॉक’ या आगामी चित्रपटात अभिषेक दिसणार आहे, पण ऐश्वर्याने त्याच्या सपोर्टसाठी कोणतीही पोस्ट केलेली नाही. पण अभिषेकची बहीण श्वेता नंदा ही मात्र त्याला सपोर्ट करताना दिसली.

गेल्या वर्षी उशीरा केलं होतं विश

तसं पहायला गेलं तर , गेल्या वर्षी देखील अभिषेक बच्चनने ऐश्वर्या रायला सोशल मीडियावर वाढदिवसाच्या शुभेच्छा खूप उशीरा दिल्या होत्या. त्याने ऐश्वर्याचा फोटो टाकला आणि खाली लिहिले – वाढदिवसाच्या शुभेच्छा. या मेसेजमध्ये त्यांचे पत्नीवरचे नितांत प्रेम कुठेही दिसत नव्हते. पण यावेळेस तर एक पोस्टही नाही, अभिषेकने ऐश्वर्याला शुभेच्छाच दिल्या नाहीत.

चित्रपटांपासून दूर ऐश्वर्या

सध्या ऐश्वर्या रायही चित्रपटांपासून दूर आहे. यावर्षी तिचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. ती शेवटची तामिळ चित्रपट ‘पोनियिन सेल्वन’मध्ये दिसली होती. वेळोवेळी ती सोशल इव्हेंट्समध्ये फक्त ती मुलगी आराध्यासोबत दिसते.

ऐश्वर्याने केल होतं सासऱ्यांना विश

या वादाची बरीच चर्चा असली तरी ऐश्वर्याने तिचं सुनेचं कर्तव्य चोखपणे पार पाडल्याचं वेळोवेळी दिसलं. 11 ऑक्टोबरला अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस असतो, त्यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही ऐश्वर्याने त्यांना सोशल मीडियावरून विश केलं. तिने अमिताभ आणि आराध्या यांचा एक गोड फोटो पोस्ट करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. कौन बनेगा करोडपतीमधील व्हिडीओत बच्चन कुटुंबियांनीही अमिताभ यांना शुभेच्छा दिल्या. मात्र त्यात ऐश्वर्या कुठेच दिसली नव्हती.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा