AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

म्हणजे नक्कीच घटस्फोट झालाय..; ‘केबीसी’मधील तो व्हिडीओ पाहून ऐश्वर्या-अभिषेकच्या नात्याविषयी चर्चांना उधाण

गेल्या काही महिन्यांपासून ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. आता नुकत्याच पार पडलेल्या 'केबीसी'च्या एपिसोडनंतर पुन्हा एकदा या घटस्फोटाची चर्चा होऊ लागली आहे.

म्हणजे नक्कीच घटस्फोट झालाय..; 'केबीसी'मधील तो व्हिडीओ पाहून ऐश्वर्या-अभिषेकच्या नात्याविषयी चर्चांना उधाण
अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, अभिषेक बच्चनImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 14, 2024 | 9:03 AM
Share

बॉलिवूडचे महानायक अर्थात अभिनेते अमिताभ बच्चन यांनी 11 ऑक्टोबर रोजी 82 वा वाढदिवस साजरा केला. गेल्या अनेक वर्षांप्रमाणे यावर्षीही ‘कौन बनेगा करोडपती’च्या सेटवर बिग बींचा वाढदिवस साजरा करण्यात आला. या एपिसोडमध्ये आमिर खान आणि त्याचा मुलगा जुनैद हे दोघं खास पाहुणे म्हणून उपस्थित होते. या एपिसोडमध्ये बिग बी आणि प्रेक्षकांना एक व्हिडीओ दाखवण्यात आला. या व्हिडीओमध्ये बच्चन कुटुंबीयसुद्धा त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसले. पत्नी जया बच्चन, मुलगी श्वेता बच्चन नंदा, मुलगा अभिषेक बच्चन, नातू अगस्त्य नंदा आणि नात नव्या नवेली नंदा हे सर्वजण या व्हिडीओमध्ये बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसले. यासोबतच नात आराध्याचेही काही फोटो त्यात दाखवण्यात आले. मात्र या सर्वांत बिग बींची सून ऐश्वर्या राय कुठेच दिसली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा अभिषेक आणि ऐश्वर्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

‘केबीसी’मध्ये दाखवलेल्या व्हिडीओत जरी ऐश्वर्या दिसली नसली तरी तिने सोशल मीडियाद्वारे त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ऐश्वर्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आराध्यासोबतचा बिग बींचा फोटो शेअर केला. त्यावर तिने लिहिलं, ‘वाढदिवसाच्या शुभेच्छा पा-दादाजी.’ ऐश्वर्याची ही पोस्ट ‘रेडिट’वर व्हायरल झाली. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘केबीसी’मधील बिग बींच्या बर्थडे सेलिब्रेशनमधून ऐश्वर्याला का वगळण्यात आलं, असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे.

एका युजरने लिहिलं, ‘जर कोणी आजचा केबीसीचा एपिसोड पाहिला असेल तर त्यातून ऐश्वर्या-अभिषेकचा घटस्फोट झाल्याचं स्पष्टपणे जाणवतंय. केबीसीमध्ये हे सिद्ध झालंय. बिग बींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या प्रत्येकाचा क्लिप दाखवण्यात आला, पण त्यात ऐश्वर्या कुठेच नव्हती. नव्या, अगस्त्य यांनीसुद्धा शुभेच्छा दिल्या, पण आराध्याचे फक्त फोटो दाखवण्यात आले. ऐश्वर्याचं तर कुठे नावंसुद्धा नव्हतं. जर गोष्टी ठीक असत्या तर त्यांनी त्यांच्या सुनेला अशा पद्धतीने वगळलं नसतं.’

अभिषेक आणि ऐश्वर्याने 2007 मध्ये लग्नगाठ बांधली. त्यानंतर 2011 मध्ये ऐश्वर्याने मुलीला जन्म दिला. गेल्या काही महिन्यांपासून या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं आहे. मात्र त्यावर अद्याप कोणीच प्रतिक्रिया दिली नाही. ऐश्वर्या आणि अभिषेकला बऱ्याच काळापासून एकत्र पाहिलं गेलं नाही. अंबानींच्या लग्नालाही ते दोघं वेगवेगळे आले, म्हणून या चर्चांना आणखी हवा मिळाली.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.