AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss OTT Grand Finale : ‘बिग बॉस ओटीटी’ची सांगता होणार, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहू शकता महाअंतिम सोहळा…

बिग बॉसचे ओटीटी व्हर्जन अर्थात ‘बिग बॉस ओटीटी’ (Bigg Boss OTT) आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. बिग बॉस ओटीटीचा ग्रँड फिनाले आज म्हणजेच शनिवारी होणार आहे. करण जोहरने होस्ट केलेल्या या शोची ट्रॉफी आज शमिता शेट्टी, राकेश बापट, दिव्या अग्रवाल, निशांत भट्ट आणि प्रतीक सहजपाल यांच्यापैकी एक पटकावणार आहे.

Bigg Boss OTT Grand Finale : ‘बिग बॉस ओटीटी’ची सांगता होणार, जाणून घ्या कधी आणि कुठे पाहू शकता महाअंतिम सोहळा...
Bigg Boss OTT
| Edited By: | Updated on: Sep 18, 2021 | 11:41 AM
Share

मुंबई : बिग बॉसचे ओटीटी व्हर्जन अर्थात ‘बिग बॉस ओटीटी’ (Bigg Boss OTT) आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. बिग बॉस ओटीटीचा ग्रँड फिनाले आज म्हणजेच शनिवारी होणार आहे. करण जोहरने होस्ट केलेल्या या शोची ट्रॉफी आज शमिता शेट्टी, राकेश बापट, दिव्या अग्रवाल, निशांत भट्ट आणि प्रतीक सहजपाल यांच्यापैकी एक पटकावणार आहे. बॉलिवूडची स्टार जोडी जिनीलिया आणि रितेश देशमुख बिग बॉस ओटीटीच्या या ग्रँड फिनालेमध्ये दिसणार आहेत.

ग्रँड फिनालेच्या एक दिवस आधी, कॉमेडियन भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया शोमध्ये बिग बॉस ओटीटी घरात दाखल झाले आहेत. त्यांनी बीबी ओटीटी पुरस्कारांचे आयोजन केले. फायनलिस्टना टास्क दरम्यान त्यांच्या बिग बॉस ओटीटी आठवणी पुन्हा पाहण्याची संधी मिळाली. या टास्क दरम्यान त्याला एक फोटो सुरक्षित ठेवावा लागला, तर दुसरा कट करावा लागला. त्यांच्या सुंदर आठवणी पाहून स्पर्धक खूप भावूक झाले होते.

बिग बॉस ओटीटीचा ग्रँड फिनाले तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकता?

बिग बॉस ओटीटी ग्रँड फिनालेची वेळ काय आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रत्येकजण उत्सुक आहे. ‘बिग बॉस ओटीटी’ ग्रँड फिनालेची वेळ संध्याकाळी 7 वाजता आहे. बिग बॉसचे दर्शक या शोचे थेट प्रक्षेपण वूट अॅपवर पाहू शकतात. हा शो फक्त Viacom च्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असणार आहे.

फिनाले नाईटमध्ये पहिले पाच स्पर्धक आपले सर्वोत्तम सादरीकरण करणार आहेत. एवढेच नाही तर माजी स्पर्धक देखील या शोमध्ये दिसतील, ज्यामुळे ही संध्याकाळ अधिक रंगीबेरंगी होईल. असे म्हटले जातेय की, बिग बॉस ओटीटीचे माजी स्पर्धक ग्रँड फिनालेच्या स्टेजवर आपले नृत्य कौशल्य दाखवू शकतात. बिग बॉस ओटीटीचा ग्रँड फिनाले पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.

कोण जिंकेल ट्रॉफी?

‘बिग बॉस ओटीटी’चे टॉप 5 स्पर्धक म्हणजे शमिता शेट्टी, राकेश बापट, दिव्या अग्रवाल, प्रतीक सहजपाल आणि निशांत भट्ट आहेत. आता प्रश्न हा आहे की, या पाच स्पर्धकांपैकी कोण आज बिग बॉस ओटीटी ट्रॉफी आपल्या घरी घेऊन जाणार आहे? जर, तुम्ही सुरुवातीपासूनच शो बघितला तर शमिता शेट्टी आणि प्रतीक सहजपाल या ट्रॉफीचे मुख्य दावेदार म्हणून पाहिले जात आहेत. मात्र, दिव्या अग्रवालची फॅन फॉलोइंगही खूप जास्त आहे, त्यामुळे दिव्या अग्रवालच्या जिंकण्याची अनेक शक्यता आहे. दुसरीकडे, जर आपण राकेश बापट आणि निशांत भट्ट यांच्याबद्दल बोललो, तर असे वाटते की ते ही ट्रॉफी मिळवण्यापासून वंचित राहू शकतात. मात्र, आता ठोस असे काही सांगता येणार नाही.

हेही वाचा :

आता लवकरच होणार ‘लग्नकल्लोळ’, अभिनेत्री मयुरी देशमुखचा नवा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला!

Samantha New Film : घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान समंथाने स्वीकारला नवा चित्रपट, ब्रेक घेण्याचा निर्णय केला रद्द?

Follow Us
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?
सकाळी 9 वाजेपर्यंत तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये किती टक्के मतदान?.
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल
स्वतःवरच गुन्हा दाखल करणार? राऊतांचा भाजप सरकारला सवाल.
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?
पवार कुटुंबातील हे दोन तरुण नेते एकमेकांविरोधात लढणार?.
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?
अजित पवार विमान अपघात प्रकरणात नवा ट्विस्ट; जय पवारांचे ते विधान काय?.
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध
खरगेंच्या त्या वक्तव्यावरून राजकारण तापलं; फडणवीसांचा निषेध.
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्...
वाल्मिक कराड गँगची कारागृहातही दहशत! थेट कैद्यालाच मारलं अन्....
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात..
कोकणात भयंकर घडलं, भर समुद्रात नौका बुडाली, कोट्यवधीचं नुकसान; अपघात...
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,
उष्णतेचा कहर! उष्माघाताने शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू,.
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल
आता सगळ्याच IT कंपन्या रडारवर, नाशिकच्या प्रकरणानंतर सरकारचं मोठं पाऊल.
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी
ठाण्यात पाणीटंचाईचा फटका; वाहन धुणाऱ्या सेंटर्सवर 10 जूनपर्यंत बंदी.