AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्राची ‘मर्लिन मनरो’ आणि ‘सौंदर्याचा अॅटम बॉम्ब’, पद्मा चव्हाणचा अचानक मृत्यू कसा झाला?

मराठी बरोबरच हिंदी सिनेमातही पद्मा यांनी आपली छाप पाडली. "आदमी", "बिन बादल बरसात" आणि "कश्मीर की कली"मध्ये शम्मी कपूर, शर्मिला टागोर, प्राण यांच्यासोबत त्यांनी भूमिका केल्या. पण त्यांचा शेवट हा अतिशय वाईट होता.

महाराष्ट्राची 'मर्लिन मनरो' आणि 'सौंदर्याचा अॅटम बॉम्ब', पद्मा चव्हाणचा अचानक मृत्यू कसा झाला?
padma chavanImage Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 20, 2025 | 7:51 PM
Share

मराठी सिनेसृष्टीत “महाराष्ट्राची मर्लिन मनरो” किंवा “सौंदर्याचा अॅटम बॉम्ब” अशी उपाधी मिळवणाऱ्या अभिनेत्री म्हणजे पद्मा चव्हाण. आचार्य अत्रे यांनी “लाखात अशी देखणी” या नाटकातील तिच्या अभिनयाने प्रभावित होऊन तिला हा किताब दिला होता. निखळ सौंदर्य आणि बोलके डोळे असलेल्या पद्मा यांनी मराठी चित्रपट आणि नाटकांमध्ये अनेक संस्मरणीय भूमिका साकारल्या.

मूळच्या कोल्हापूरच्या सरदार घराण्यातील कॅप्टन अण्णासाहेब चव्हाण यांच्या त्या कन्या होत्या. प्राथमिक शिक्षणानंतर त्यांनी अभिनयाच्या ओढीने शिक्षण सोडले आणि चंदेरी दुनियेत पदार्पण केले. जन्मजात आकर्षक व्यक्तिमत्व आणि सुरेख चेहर्‍यामुळे त्यांना फार संघर्ष करावा लागला नाही. वयाच्या अवघ्या १५व्या वर्षी, १९५९ मध्ये भालजी पेंढारकर यांच्या “आकाशगंगा” या चित्रपटातून त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले.

“नवऱ्याची धमाल तर बायकोची कमाल”, “माझी बायको माझी मेव्हणी” मधील रसिका, “लग्नाची बेदी” मधील रश्मी अशा भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून गेल्या. त्यांनी “अवघाची संसार”, “जोतीबाचा नवस”, “संगत जडली तुझी न माझी”, “बोट लावीन तिथे गुदगुल्या”, “लाखात अशी देखणी” अशा सुमारे २८ मराठी चित्रपटांमध्ये काम केले. १९६६ मध्ये दिग्दर्शक कमलाकर तोरणे यांच्याशी त्यांचे लग्न झाले.

मराठी बरोबरच हिंदी सिनेमातही पद्मा यांनी आपली छाप पाडली. “आदमी”, “बिन बादल बरसात” आणि “कश्मीर की कली”मध्ये शम्मी कपूर, शर्मिला टागोर, प्राण यांच्यासोबत त्यांनी भूमिका केल्या. बऱ्याचदा निगेटिव्ह भूमिका साकारल्या. मराठीत “या सुखांनो या” आणि “आराम हराम है” या चित्रपटांसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार मिळाले होते. कारकीर्दीच्या शिखरावर असतानाच त्यांचे खाजगी आयुष्य मात्र बिनधास्त आणि वादग्रस्त राहिले.

पद्मा यांचे बंडखोर लेखक चंद्रकांत खोत यांच्याशी जवळचे संबंध होते, असे म्हटले जायचे. खोत यांनी तर पद्मा यांच्याशी लग्न झाल्याचा दावा केला होता. मात्र नंतर दोघांमध्ये गंभीर वाद निर्माण झाले. हा वाद इतका टोकाला गेला की पद्मा यांनी चंद्रकांत खोत यांच्यावर फसवणुकीचा खटला दाखल केला. हा खटला कोर्टात १०-११ वर्षे रखडला. दुर्दैवाने, खटला सुरू असतानाच १२ सप्टेंबर १९९६ रोजी पद्मा चव्हाण यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने मराठी सिनेसृष्टीने एक अतुलनीय सौंदर्य आणि अभिनयाची देणगी गमावली. आजही त्यांच्या भूमिका आणि सौंदर्याच्या चर्चा होतात, पण त्यांच्या आयुष्यातील शेवटचे दिवस मात्र वाद आणि दुर्घटनेच्या सावलीत संपले.

Follow Us
वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला,
Sachin ahir Worli | वरळीत पुन्हा आम्ही... ठाकरे गटातील बड्या नेत्याचा सचिन अहिरांना टोला, 'त्या' विधानाची सर्वत्र चर्चा
तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
Devendra Fadanvis | तिरंगा रॅलीत मुख्यमंत्री फडणवीसांनी गायले देशभक्ती गीत, पहा व्हिडीओ
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला
मोठी बातमी! आदित्य ठाकरे तातडीने आयुक्त अश्विनी भिडेंच्या भेटीला, थेट मुख्यमंत्र्यावर आरोप, 16 एकर जागा...
वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात...
ST Bus | वळणाचा अंदाज चुकला अन् दोन ST बस आमनेसामने! रायगडमध्ये अपघात, सुदैवाने जीवितहानी टळली
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP...
दूध भेसळ प्रकरणी मोठी कारवाई! 15 जणांची तातडीने धरपकड, NCP नेत्याच्या कुटुंबियाचाही समावेश
राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! तटकरेंच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार
Sunil Tatkare | राष्ट्रवादीत पुन्हा खळबळ! सुनील तटकरे यांच्या विरोधात थेट निवडणूक आयोगात तक्रार; नियुक्तीवरच सवाल
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या...
ठाकरे गटातील नगरसेविकेचं तळ्यात मळ्यात? राजुल पाटील शिंदे गटाच्या कार्यक्रमाला, ठाकरे गटाकडून थेट...
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा
रेवती सुळेंच्या लग्नानंतर आता दिल्ली रिसेप्शनची चर्चा; बड्या नेत्यांची उपस्थिती?
छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! VIDEO पाहून तुम्हीही...
Karjat | छत्रीचा माईक घेऊन शाळकरी मुली बनल्या रिपोर्टर! कर्जतच्या रस्त्यांची पोलखोल; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल…
एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही!
Laxaman Hake | एक माणूस रोज मंत्र्यांना शिव्या देतो, सरकार एक शब्दही बोलत नाही! लक्ष्मण हाके भडकले; OBC आरक्षणावरून सरकारलाही घेरलं