AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raja Shivaji : ‘राजा शिवाजी’बद्दल अशी चर्चा…, ‘या’ दाव्यावर अखेर रितेशने सोडलं मौन

Raja Shivaji : अभिनेता रितेश देशमुख स्टारर 'राजा शिवाजी' सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. सिनेमाबद्दल अनेक दावे केले जात आहेत, ज्यावर अखेर रितेश याने मौन सोडलं आहे.

Raja Shivaji : 'राजा शिवाजी'बद्दल अशी चर्चा..., 'या' दाव्यावर अखेर रितेशने सोडलं मौन
Riteish Deshmukh
| Updated on: May 10, 2026 | 1:03 PM
Share

Raja Shivaji : अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शित आणि स्टारर ‘राजा शिवाजी’ सिनेमा 1 मे रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. गेल्या 10 दिवसांपासून सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करताना दिसत आहे. हिंदी भाषेच्या तुलनेत मराठी भाषेतील सिनेमाला प्रेक्षकांनी अधिक पसंती दिली. एकीकडे सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाई करताना दिसत आहे तर, दुसरीकडे सिनेमाबद्दल अनेक चर्चा देखील सध्या सोशल मीडिया आणि चाहत्यांमध्ये रंगल्या आहे. सिनेमाचा बजेट 100 कोटींचा आहे… अशी चर्चा सर्वत्र सुरु आहे. यावर अखेर रितेश याने मौन सोडलं आहे.

नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत रितेश याने ‘राजा शिवाजी’ सिनेमाच्या बजेटबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. रितेश म्हणाला, ‘सिनेमाच्या बजेटबद्दल फक्त निर्मात्यांना माहिती असतं… तर प्रेक्षकांनी फक्त सिनेमाचा आनंद घ्यायला हवा… त्यांनी आकड्यांचा अधिक विचार करायला नको…’

‘जेव्हा आम्ही लहानपणी अमिताभ बच्चन यांचा ‘शोले’ पाहायला जायचो तेव्हा कधीच सिनेमाचा बजेट विचारला नाही. आम्ही फक्त मोठ्या पडद्याचा आनंद घ्यायला जायचो… पण आता सिनेमाची कमाई आणि कलाकारांचं मानधन यावर अधिक चर्चा होऊ लागली आहे. कुठेतरी याचं कारण इंडस्ट्री देखील आहे…’ रितेश याच्या म्हणण्यानुसार, ‘प्रेक्षकांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट सिनेमातून आलेला अनुभव असला पाहिजे, सिनेमाचा बजेट नाही…’ एवढंच नाही तर, सिनेमाच्या यशाबद्दल देखील अभिनेत्याने मोठं वक्तव्य केलं आहे. ‘राजा शिवाजी सिनेमा मराठी सिनेविश्वासाठी मोठा रेकॉर्ड ठरत आहे… येत्या काळात दुसऱ्या मराठी सिनेमांनी देखील हा रेकॉर्ड मोडला पाहिजे…’ असं देखील रितेश म्हणाला.

सिनेमाच्या बजेटवर अभिषेक बच्चन याचं मोठं वक्तव्य

मुलाखतीत अभिषेक बच्चन म्हणाला, ‘हॉलिवूड सिनेमांमध्ये VFX वर तब्बल 5 हजार कोटींपेक्षा अधिक पैसे खर्च केले जातात. भारतीय सिनेमांकडे तितका बजेट नसतो… भारतीय दिग्दर्शक फार कमी कालावधीत सिनेमा तयार करतात आणि प्रेक्षकांना चांगल्यात चांगलं देण्याचा प्रयत्न करतात. VFX ला योग्य न्याय देण्यासाठी फक्त पैसा नाही तर, वेळ देखील फार लागतो.. असं देखील अभिनेता म्हाणाला.

Follow Us
ओमराजे आणि जगजितसिंह पाटीलांमध्ये Cold War? दोन पोस्ट अन् दोन्हीमध्ये
ओमराजे आणि जगजितसिंह पाटीलांमध्ये Cold War? दोन पोस्ट अन् दोन्हीमध्ये शिंदेंचा फोटो, पुढे...
अजित पवारांनी उद्घाटन केलेलं NCP कार्यालय तुटणार?
मोठा झटका! अजित पवारांनी उद्घाटन केलेलं NCP कार्यालय तुटणार? नगरविकास विभागाचा मोठा निर्णय!
आता आमदारही फुटणार? ठाकरेंच्या सेनेचा बडा नेता धरणार महायुतीची वाट
मोठी घडामोड! खासदारांनंतर आता आमदारही फुटणार? ठाकरेंच्या सेनेचा बडा नेता धरणार महायुतीची वाट
मोठी बतामी! ठाकरेंच्या खासदारांनंतर आता राष्ट्रवादीचे... शरद पवारांनी
मोठी बतामी! ठाकरेंच्या खासदारांनंतर आता राष्ट्रवादीचे... शरद पवारांनी एका वाक्यातच सांगितलं, आमचा...
एकीचा संदेश, पण 24 आमदार गायब! महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय घडल
MVA Meeting | एकीचा संदेश, पण 24 आमदार गायब! महाविकास आघाडीच्या बैठकीत नेमकं काय घडलं?
5 जणांना मारलं, बॉम्ब... राऊतांचा संजय दिना पाटलांवर लेटर बॉम्ब...
मोठी बातमी! 5 जणांना मारलं, बॉम्ब... राऊतांचा संजय दिना पाटलांवर लेटर बॉम्ब; थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार
दिल्ली ते मुंबई...ऑपरेशन टायगरचा मास्टरमाइंड कोण?
Operation Tiger | दिल्ली ते मुंबई...ऑपरेशन टायगरचा मास्टरमाइंड कोण?; खासदारांच्या प्रवेशामागे भाजपच्या त्या सर्वात मोठ्या नेत्याची शिष्टाई मोलाची
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोप
तुकाराम मुंढेंच्या बदलीचा घाट अन् 250 कोटींचा खेळ, आव्हाड यांच्या आरोपांनी खळबळ!
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटा
ठाकरे गट नेते आणि लोकसभा अध्याक्षाच्या भेटीत नेमकं काय घडलं? 35 मिनिटांच्या चर्चेत... पहिली प्रतिक्रिया समोर
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी
मोठी बातमी! संपूर्ण घटनेमध्ये कंपनीचा हात नाही तर... आयटी कंपनी धर्मांतरण प्रकरणी मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले?