AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रजनीकांत यांच्या ‘या’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी वसूल केलेले संपूर्ण बजेट, चित्रपटाने रचला होता इतिहास

रजनीकांता यांच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच पहिल्याच दिवशी चित्रपटाचे बजेट वसूल केले होते. चित्रपटाने केली होती प्रचंड कमाई.

रजनीकांत यांच्या 'या' चित्रपटाने पहिल्याच दिवशी वसूल केलेले संपूर्ण बजेट, चित्रपटाने रचला होता इतिहास
| Updated on: Jun 30, 2026 | 5:25 PM
Share

भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांनी गेली पाच दशके आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. वयाची 75 वर्षे ओलांडल्यानंतरही ते आजही प्रमुख भूमिकांमध्ये झळकत असून त्यांच्या प्रत्येक चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असते. 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कुली’ या चित्रपटानंतर आता त्यांच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना आतुरता लागली आहे.

रजनीकांत हे केवळ दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेते नाहीत तर सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकीही एक आहेत. त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे. त्यापैकी 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कबाली’ या चित्रपटाने तर प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी आपल्या निर्मिती खर्चाची भरपाई करून इतिहास रचला होता.

2016 मध्ये प्रदर्शित झाला होता ‘कबाली’

1975 मध्ये अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या रजनीकांत यांनी तमिळ चित्रपटांपासून ते हिंदी चित्रपटसृष्टीपर्यंत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. 22 जुलै 2016 रोजी प्रदर्शित झालेला ‘कबाली’ हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात गाजलेल्या चित्रपटांपैकी एक मानला जातो.

या चित्रपटात त्यांनी कबाली ही दमदार भूमिका साकारली होती. त्यांच्या स्टायलिश लूक, अॅक्शन आणि प्रभावी अभिनयामुळे चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाची मोठी चर्चा रंगली होती.

पहिल्याच दिवशी वसूल केला 90 कोटींचा खर्च

‘कबाली’चा निर्मिती खर्च सुमारे 90 कोटी रुपये होता. मात्र, प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जगभरातून 90.50 कोटी रुपयांची कमाई करत आपला संपूर्ण खर्च वसूल केला. कोणत्याही भारतीय चित्रपटासाठी हा अत्यंत उल्लेखनीय टप्पा मानला जातो. रजनीकांत यांच्या प्रचंड स्टारडममुळे आणि चित्रपटाभोवती निर्माण झालेल्या उत्सुकतेमुळे थिएटरमध्ये प्रेक्षकांची मोठी गर्दी झाली होती.

2016 मधील सर्वाधिक कमाई करणारा दक्षिण भारतीय चित्रपट

‘कबाली’चे दिग्दर्शन पा. रंजीत यांनी केले होते, तर निर्मिती कलैपुली एस. थानू यांनी केली होती. चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबत राधिका आपटे, धनशिका, अट्टकाठी दिनेश आणि विन्स्टन चाओ यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.

Follow Us
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात
मोठी बातमी! महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? अनेक बडे नेते काँग्रेसच्या संपर्कात; विजय वडेट्टीवारांचा मोठा दावा
शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी
मुंबईत भीषण दुर्घटना! शाळेच्या बसवर भलेमोठं झाड कोसळलं; अनेक विद्यार्थी जखमी, बचावकार्य युद्धपातळीवर सुरू
अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! अजून अनेक मोठे चेहरे आमच्या संपर्कात; सचिन अहिरांच्या प्रवेशानंतर शिंदे गटातील नेत्याचा मोठा दावा
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही?
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी केवळ अर्ज भरलाय, पक्षप्रवेश केलेला नाही? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
Sachin Ahir | सोबत असलो तर चांगले, नाहीतर नालायक?; शिंदे गटात जाताच सचिन अहिरांचा ठाकरेंवर पलटवार
पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला
Eknath Shinde | पत्रकार परिषदेच्या पहिल्या वाक्यातच शिंदे म्हणाले 'असं काही' अन् पिकला हशा... सचिन अहिरदेखील... पहा व्हिडीओ
जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; राऊतांची पहिली प्रतिक्रिया
Sanjay Raut Post | जे कधीच नव्हते आमचे, त्यांची वाट का पहावी?; सचिन अहिरांच्या निर्णयानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक... राणेंची बोचरी टीका
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना झोप येणार नाही, पुढची निवडणूक....सचिन अहिर यांच्या निर्णयानंतर नितेश राणेंची बोचरी टीका
यात काही धक्का बसला असं नाही कारण... सचिन आहिर याच्या पक्षप्रवेशाआधीच
यात काही धक्का बसला असं नाही, कारण... सचिन आहिर याच्या पक्षप्रवेशाआधीच आदित्य ठाकरेंचं मोठं विधान, थेट कारवाई...
शिंदे सेनेतून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करताच सचिन अहिर थेट...
शिंदे सेनेतून उपसभापती पदासाठी अर्ज दाखल करताच सचिन अहिर थेट... राज्यातील राजकारणात मोठं घडतंय?