AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रजनीकांत यांच्या ‘या’ चित्रपटाने पहिल्याच दिवशी वसूल केलेले संपूर्ण बजेट, चित्रपटाने रचला होता इतिहास

रजनीकांता यांच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच पहिल्याच दिवशी चित्रपटाचे बजेट वसूल केले होते. चित्रपटाने केली होती प्रचंड कमाई.

रजनीकांत यांच्या 'या' चित्रपटाने पहिल्याच दिवशी वसूल केलेले संपूर्ण बजेट, चित्रपटाने रचला होता इतिहास
| Updated on: Jun 30, 2026 | 5:25 PM
Share

भारतीय चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार रजनीकांत यांनी गेली पाच दशके आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. वयाची 75 वर्षे ओलांडल्यानंतरही ते आजही प्रमुख भूमिकांमध्ये झळकत असून त्यांच्या प्रत्येक चित्रपटाची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता असते. 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कुली’ या चित्रपटानंतर आता त्यांच्या आगामी चित्रपटांची चाहत्यांना आतुरता लागली आहे.

रजनीकांत हे केवळ दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात लोकप्रिय अभिनेते नाहीत तर सर्वाधिक मानधन घेणाऱ्या कलाकारांपैकीही एक आहेत. त्यांच्या कारकिर्दीत अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर विक्रमी कमाई केली आहे. त्यापैकी 2016 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कबाली’ या चित्रपटाने तर प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी आपल्या निर्मिती खर्चाची भरपाई करून इतिहास रचला होता.

2016 मध्ये प्रदर्शित झाला होता ‘कबाली’

1975 मध्ये अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या रजनीकांत यांनी तमिळ चित्रपटांपासून ते हिंदी चित्रपटसृष्टीपर्यंत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. 22 जुलै 2016 रोजी प्रदर्शित झालेला ‘कबाली’ हा त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात गाजलेल्या चित्रपटांपैकी एक मानला जातो.

या चित्रपटात त्यांनी कबाली ही दमदार भूमिका साकारली होती. त्यांच्या स्टायलिश लूक, अॅक्शन आणि प्रभावी अभिनयामुळे चित्रपटाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला. प्रदर्शनापूर्वीच या चित्रपटाची मोठी चर्चा रंगली होती.

पहिल्याच दिवशी वसूल केला 90 कोटींचा खर्च

‘कबाली’चा निर्मिती खर्च सुमारे 90 कोटी रुपये होता. मात्र, प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी या चित्रपटाने जगभरातून 90.50 कोटी रुपयांची कमाई करत आपला संपूर्ण खर्च वसूल केला. कोणत्याही भारतीय चित्रपटासाठी हा अत्यंत उल्लेखनीय टप्पा मानला जातो. रजनीकांत यांच्या प्रचंड स्टारडममुळे आणि चित्रपटाभोवती निर्माण झालेल्या उत्सुकतेमुळे थिएटरमध्ये प्रेक्षकांची मोठी गर्दी झाली होती.

2016 मधील सर्वाधिक कमाई करणारा दक्षिण भारतीय चित्रपट

‘कबाली’चे दिग्दर्शन पा. रंजीत यांनी केले होते, तर निर्मिती कलैपुली एस. थानू यांनी केली होती. चित्रपटात रजनीकांत यांच्यासोबत राधिका आपटे, धनशिका, अट्टकाठी दिनेश आणि विन्स्टन चाओ यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा