AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ranbir Kapoor | …. नाही तर रणबीर कपूर याची पत्नी असती जिया खान! नक्की झालं तरी काय?

रणबीर कपूर याची पत्नी असती जिया खान; फक्त तीन सिनेमात काम केल्यानंतर अभिनेत्रीने संपवलं स्वतःचं आयुष्य... तिच्या निधनाला १० वर्ष पूर्ण...

Ranbir Kapoor | .... नाही तर रणबीर कपूर याची पत्नी असती जिया खान! नक्की झालं तरी काय?
| Updated on: May 03, 2023 | 12:26 PM
Share

मुंबई : दिवंगत अभिनेत्री जिया खान हिने फार कमी वोळात बॉलिवूडमध्ये स्वतःचं स्थान भक्कम केलं. जियाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी होती. आज देखील अभिनेत्री तिच्या सिनेमांमुळे आणि सौंदर्यामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. फक्त ३ सिनेमांमध्ये काम केल्यानंतर अभिनेत्रीने स्वतःचं आयुष्य संपवलं. जियाच्या निधनामुळे सर्वत्र खळबळ माजली होती. आज जिया आपल्यात नसली तरी तिच्या आठवणी कायम चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. जिया हिचा जन्म न्यूयॉर्क याठिकाणी झाला होता. अभिनेत्रीचं शिक्षण लंडनमध्ये झालं. परदेशात शिक्षण झालेल्या जियाला अभिनेत्री म्हणून स्वतःची ओळख निर्माण करायची होती. त्यामुळे जिया मायानगरी मुंबई याठिकाणी आली.

मुंबईमध्ये आल्यानंतर अभिनेत्रीने स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केलं आणि बॉलिवूडच्या काही प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत जियाने स्क्रिन देखील शेअर केली. चाहते अभिनेत्रीला जिया या नावाने ओळखत असले तरी तिचं खरं नाव नफीसा रिझवी खान असं होतं. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी अभिनेत्रीने स्वतःचं नाव बदललं होतं. पण तिने पुन्हा नफीसा म्हणून ओळख निर्माण केली.

परदेशातून मोठी स्वप्न घेवून मुंबईमध्ये आलेल्या जिया खान हिने ३ जून २०१३ रोजी स्वतःचं आयुष्य संपवलं. जियाच्या निधनाची बातमी कळाल्यानंतर चाहत्यांसह बॉलिवूडला मोठा धक्का बसला. जियाच्या निधनानंतर संपूर्ण इंडस्ट्री थक्क झाली होती. स्वतःचं आयुष्य संपवण्यापूर्वी अभिनेत्री एक पत्र लिहीलं होतं. ज्यामध्ये रिलेशनशिनपमध्ये आनंदी नसल्याचं अभिनेत्रीने म्हटलं होतं.

अभिनेत्रीच्या निधानानंतर जियाच्या आईने लेकीचा बॉयफ्रेंड सूरज पंचोली याच्यावर गंभीर आरोप केले होते. ज्यामुळे सूरजला पोलिसांनी अटक देखील केली होती. पण अभिनेत्रीच्या निधनानंतर सूजर पंचोली याची १० वर्षांनी निर्दोष मुक्तता झाली. जियाने स्वतःची स्वप्न मागे ठेवत जगाचा निरोप घेतला.

जियाने महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘निशब्द’ सिनेमात काम केलं. अभिनेता आमिर खान याच्यासोबत ‘गजनी’ सिनेमात काम केल. शिवाय जिया अभिनेता अक्षय कुमार याच्या ‘हाउसफुल’ सिनेमात देखील झळकली. फार कोणाला माहिती नसेल पण अभिनेत्री तिच्या चौथ्या सिनेमात अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत स्क्रिन शेअर करणार होती.

जिया हिच्या चौथ्या सिनेमाचं नाव होतं ‘आप का साया…’ सिनेमात जिया रणबीर कपूर याच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार होती. पण सिनेमा कधीच पूर्ण होवू शकला नाही. नाही तर मोठ्या पडद्यावर जिया आणि रणबीर यांची जोडी प्रेक्षकांना पती – पत्नीच्या रुपात अनुभवता आली असती.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.