AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rani Mukerji: ‘…तेव्हा एकटीच संघर्ष करत होती’, ‘ती’ परिस्थिती ओढवल्यानंतर घाबरली राणी मुखर्जी

प्रसिद्धी आणि ओळख असली तर एखाद्या गोष्टीची भीती प्रत्येकाला वाटते; राणी मुखर्जी देखील 'त्या' क्षणी घाबरली... अखेर अभिनेत्रीने व्यक्त केली मनातील भीती

Rani Mukerji: '...तेव्हा एकटीच संघर्ष करत होती', 'ती' परिस्थिती ओढवल्यानंतर घाबरली राणी मुखर्जी
| Updated on: Mar 29, 2023 | 10:20 AM
Share

मुंबई : अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukerji) आतापर्यंत अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण सध्या राणी ‘मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे’ सिनेमामुळे तुफान चर्चेत आहे. सत्य घटनेवर अधारित सिनेमा असल्यामुळे विश्लेषकांकडून सिनेमाचं कौतुक होत आहे. पण बॉक्स ऑफिसवर सिनेमा समाधन कारक कामगिरी करताना दिसत आहे. ‘मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे’ सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर राणीने एका मुलाखतीत अनेक खुलासे केले आहेत. मुलाखतीत राणीने अशी एक गोष्ट सांगितली, जिची अभिनेत्रीला सिनेमा प्रदर्शित होण्याआधी भीती वाटत होती. सध्या अभिनेत्री राणी मुखर्जी नुकताच झालेल्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आली आहे.

राणी मुखर्जी म्हणते, ‘सिनेमा चांगला असेल तर कथेला प्रेक्षक नक्की भेटतील यावर माझा विश्वास आहे. मग तो सिनेमा कोणत्याही जेनरचा असो… आमच्या सिनेमापुढे अनेक अव्हाने होती. कारण एक नवीन शब्द सध्या तुफान चर्चेत आहे आणि तो म्हणजे ओटीटी कटेंट… या गोष्टीची मला प्रचंड भीती वाटत होती. मला असं सिनेमाचा अनुभव चित्रपटगृहात जावूनच घेतला जावू शकतो…’

पुढे राणी म्हणाली, ‘मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी टीकाचा सामना करावा लागला. मोठ्या संख्येत लोक सिनेमाला ओटीटी कटेंट असल्याचे सांगत होते. ही गोष्ट खरंच भीतीदायक होती. कारण विरोधकांमध्ये जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा तुम्ही फक्त आणि फक्त प्रार्थना करु शकता… मी देखील फक्त प्रार्थना करत होती. अखेर आम्ही प्रेक्षकांना दाखवून दिलं…’

‘मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे’ सिनेमा सागरिका चक्रवर्ती यांच्यावर आधारित आहे. नॉर्वे प्रशासनाच्या नियंत्रणातून आपल्या मुलांना मुक्त करण्यासाठी ती एकटीच संघर्ष करते. राणी मुखर्जी हिने मुलांसाठी झटणाऱ्या आईची कथा मोठ्या पडद्यावर मांडली आहे. सिनेमात राणी शिवाय नीना गुप्ता, अनिर्बन भट्टाचार्य आणि जिम सरभ यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

राणी मुखर्जी हिने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. एक काळ असा होता जेव्हा फक्त आणि फक्त राणी मुखर्जी हिच्या अभिनयाची आणि सौंदर्याची चर्चा असायची. बॉलिवूडच्या अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांसोबत अभिनेत्रीने काम केलं आहे.

राणीच्या नवीन सिनेमांची चक्चा आता तर रंगलेलीच असते, पण अभिनेत्री तिच्या जुन्या सिनेमांमुळे देखील ओळखली जाते. आता राणी तिच्या ‘मिसेज चटर्जी वर्सेज नॉर्वे’ सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमा येत्या दिवसांत बॉक्स ऑफिसवर किती रुपयांपर्यंत मजल मारतो पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.