AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘सैयारा’ फेम अभिनेता दिवाळखोरीत, मुलाच्या शाळेबाहेर विकला भाजीपाला, केली शेती

'स्टुडंट ऑफ द इअर 2' या चित्रपटानंतर हा अभिनेता शेतीकडे वळला. परंतु शेतीतही त्याला यश मिळालं नाही. पाऊस आणि पुरामुळे शेतीचं पूर्ण नुकसान झालं होतं. त्यानंतर या अभिनेत्याच्या डोक्यावर खूप कर्ज होतं.

'सैयारा' फेम अभिनेता दिवाळखोरीत, मुलाच्या शाळेबाहेर विकला भाजीपाला, केली शेती
अभिनेता राजेश कुमारImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 03, 2025 | 9:52 AM
Share

‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या चित्रपटात रोसेशची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेला अभिनेता राजेश कुमारने ‘सैयारा’ या चित्रपटातून दमदार पुनरागमन केलंय. अहान पांडे आणि अनित पड्डा यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत जगभरात 400 कोटी रुपयांहून अधिकचा गल्ला जमवला आहे. याच चित्रपटामुळे राजेशला मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. लॉकडाऊननंतर तो अत्यंत कठीण परिस्थितीला सामोरं गेला. त्याच्यावर दोन कोटी रुपयांचं कर्ज होतं आणि त्याच्या बँक खात्यात फक्त 2500 रुपये शिल्लक होते. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत राजेश त्याच्या आर्थिक अडचणींबद्दल मोकळेपणे व्यक्त झाला.

2019 मध्ये राजेशने अभिनयक्षेत्र सोडून शेती करण्याचा आश्चर्यकारक निर्णय घेतला होता. त्यासाठी त्याने पालघरमध्ये 20 एकर जमीन भाडेतत्त्वावर घेतली होती. शेतीबद्दल राजेश खूप सकारात्मक होता आणि त्यातून बराच नफा कमावणार अशी त्याला आशा होती. परंतु पाऊस आणि खराब हवामानामुळे त्याच्या सर्व स्वप्नांवर पाणी फेरलं. राजेशने लावलेली 15000 झाडं नष्ट झाली. यामुळे त्याला मोठा आर्थिक फटका बसला होता. “त्या परिसरात आधी कधीच पूर आला नव्हता, परंतु त्यावर्षी जोरदार पाऊस झाला आणि त्यामुळे माझ्या संपूर्ण शेतीचं नुकसान झालं होतं”, असं तो म्हणाला.

राजेशच्या आयुष्यात एकानंतर एक आव्हानं येतच होती. कोविड महामारीमुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आली होती. त्यानंतर शेती करणंही कठीण झालं होतं. अशा परिस्थितीत त्याच्याकडचे सर्व बचतीचे पैसेही संपुष्टात आले होते. कमाईचा कोणताही मार्ग त्याच्यासमोर उरला नव्हता. दिवळखोरीत असलेल्या राजेशच्या बँक खात्यात फक्त 2500 रुपये होते आणि त्यामुळे तो मुलांच्याही गरजा भागवू शकत नव्हता. अखेर राजेशने त्याच्या मुलाच्या शाळेबाहेर एक छोटं दुकान उघडलं होतं. परंतु त्यानंतरही त्याच्या आर्थिक समस्या संपल्या नव्हत्या. आता राजेश शेती आणि इतर छोटे-मोठे व्यवसाय सोडून अभियन क्षेत्राकडे परतला आहे. आर्थिक संकटाच्या काळात कुटुंबाने खूप साथ दिल्याचं त्याने सांगितलं. ‘सैय्यारा’ या चित्रपटाने त्याने अभिनेत्री अनित पड्डाच्या वडिलांची भूमिका साकारली आहे.  राजेशने ‘मिसेस अँड मिस्टर शर्मा अलाहाबादवाले’, ‘बा बहु और बेबी’ यांसारख्या मालिकांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.

Follow Us
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं सर्वात मोठं विधान,
ठाकरेंच्या गटात फटाफुटीच्या चर्चांदरम्यान खासदाराचं मोठं विधान, मी दिल्लीला...
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात...
हे काय? भाजप नेत्याने चालवली बस, स्टेअरिंग हातात घेताच मोठा अपघात... पहा VIDEO
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकड
ठाकरेंचे खासदार तळ्यात की मळ्यात आदित्य ठाकरेंच्या त्या विधानची सगळीकडे चर्चा!
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला
उद्धव ठाकरेंचा आमदारांना थेट आदेश, खासदार बंडखोरीच्या चर्चेनंतर घेतला मोठा निर्णय, 22 तारखेला...
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच
पुन्हा 14 जून! सुशांतने जीवन संपवलं त्याच दिवशी संचिता गेली... भावानेच केला धक्कादायक खुलासा
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच
खासदारांनी साथ सोडली की नाही? उद्धव ठाकरेंच्या प्रतिक्रियेवरून सगळंच समजलं, पहा...
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं?Video
पहिले कानाखाली मारली, नंतर कॉलर खेचली, अभिजीत दिपकेसोबत काय घडलं? पहिला Video समोर
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले
ठाकरे गटात फूट की अफवा?; संजय राऊतांनी दिलं सर्वात मोठं उत्तर, म्हणाले....
खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत...
मोठी बातमी! खासदार संजय देशमुखांचा ठाकरेंना फोन; प्रतापराव जाधवांच्या भेटीबाबत सांगितलं अन्... काय घडलं?
ठाकरे गटाला मोठा धक्का? फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!
Sudhir Mungantiwar On Thackeray | ठाकरे गटाला मोठा धक्का? खासदारांच्या फुटीच्या चर्चेत मुनगंटीवारांचे मोठे विधान!