AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बिग बॉस 19: जेवणावरून सलमान खानचा राग अनावर; अन्न वाया घालवल्याबद्दल स्पर्धकांना चांगलंच झापलं

बिग बॉस 19 हा शो आता हळूहळू रंगताना पाहायला मिळत आहे. सलमान खानने 'वीकेंड का वार' च्या 7 सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये घरातील सदस्यांना त्यांच्या अन्न वाया घालवण्याबद्दल चांगलंच फटकारलं आहे.

बिग बॉस 19: जेवणावरून सलमान खानचा राग अनावर; अन्न वाया घालवल्याबद्दल स्पर्धकांना चांगलंच झापलं
salman khan anger bigg boss 19 over food waste Image Credit source: Instagram
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Sep 08, 2025 | 1:50 AM
Share

बिग बॉस 19 मध्ये आता नवनवीन ट्वीस्ट येत आहेत. प्रेक्षकही आता हा शो एन्जॉय करू लागले आहेत. पण स्पर्धक आणि प्रेक्षक सर्वात आतुरतेनं वाट पाहतातते विकेंड का वारची जो की शनिवार आणि रविवार सलमान खानसोबत असतो. प्रत्येक वीकेंड प्रेक्षकांसाठी खास असतो. 6 सप्टेंबरच्या विकेंड का वारमध्ये सलमान खानने घरच्यांची चांगलीच शाळा घेतली. प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून फटकारलं.

सलमान खानने घरच्यांना अन्नावरून चांगलंच झापलं 

त्यानंतर 7 सप्टेंबरच्या विकेंडच्या वारमध्ये देखील सलमान खानने घरच्यांना एका गोष्टीवरून चांगलंच झापलेलं पाहायला मिळालं. ते म्हणजे अन्न वाया घालवणे. घरातील सदस्यांचा जेवणाबद्दलचा बेफिकीर दृष्टिकोन न पटणारा होता ज्यासाठी सलमान खानने घरातील सर्व सदस्यांना फटकारलं.

एक चमचा पोहेही वाया घालवणे चुकीचे आहे

बिग बॉसचा प्रत्येक चाहता ‘वीकेंड का वार’ ची वाट पाहत असतो कारण संपूर्ण आठवड्यातील घटनांचा फिडबॅक या एपिसोड्समध्ये सलमान खानकडून ऐकायला मिळतो. 7 सप्टेंबरच्या एपिसोडच्या सुरुवातीला सलमान खानने घरातील सदस्यांशी त्यांच्या वागण्या-बोलण्याबद्दल आणि कामाबद्दल बोलले, पण अचानक त्याने घरात अन्न वाया घालवण्याबद्दलचा गंभीर मुद्दाही उपस्थित केला. सलमान म्हणाला की घरातील सदस्य दररोज जेवणाबद्दल तक्रार करतात, पण तरीही ते नीट जेवत नाहीत. त्याने विशेषतः फराहनाचे नाव घेतले आणि सांगितले की तिने एक चमचा पोहेही वाया घालवणे चुकीचे आहे.

सलमानला राग अनावर

शो दरम्यान सलमानचा राग पाहून इतर स्पर्धकही गप्प बसले. सलमान म्हणाला की, “बिग बॉसच्या घरात राहून जर सर्वात मोठा धडा शिकता येईल तर तो म्हणजे अन्नाचे महत्त्व समजून घेणे. बाहेर लाखो लोक आहेत ज्यांना दिवसाला दोन वेळचे जेवणही मिळत नाही आणि इथे लोक सहजपणे अन्न फेकून देतात. हे बरोबर नाही. अन्नचा अनादर होता कामा नये. आम्ही स्वत: जेवताना बोटेही चाटून-पुसून जेवण करतो. एकही कण वाया घालवत नाही.” तसेच सलमान खानने बोलताना उत्तराखंड आणि पंजाबमध्ये आलेल्या भयानक पुराचा देखील उल्लेख केला. तिथली अवस्था समजावून सांगितली तसेच. तिथल्या लोकांना मदत करणार असल्याचंही तो म्हणाला.

पूरग्रस्तांबद्दल काय म्हणाला सलमान?

पूरग्रस्त भागातील हजारो कुटुंबांनी आपली घरे गमावली आहेत आणि अनेक दिवसांपासून उपाशी आहेत आणि फक्त मदत साहित्यावर जगत आहेत. सलमानचे बोलणे ऐकल्यानंतर कुटुंबातील सदस्यांच्या चेहऱ्यावरही गंभीरता दिसून आली. सलमान म्हणाला की, “जेव्हा बाहेरील लोकांना उपाशी झोपावे लागते तेव्हा येथे घरात होणारी अन्नाची नासाडी पाहून मनाला खूप वेदना होतात. हे फक्त अन्न नाही तर एखाद्याचे जीवन आहे. तुम्ही याचे कौतुक करायला हवं, आभार मानायला हवे”

मदतीचे आवाहनही केले

सलमान खानने पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहनही केले आहे. तो म्हणाला की, “छोटीशी मदत देखील एखाद्याचे आयुष्य बदलू शकते. तसेच बिग बॉसचे व्यासपीठ केवळ मनोरंजनासाठी नाही तर ते समाजातील महत्त्वाचे प्रश्न पुढे आणण्याचे माध्यम आहे. त्यामुळे आम्ही देखील त्यांच्या मदतीसाठी प्रयत्न करणार आहोत”

Follow Us
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, शिवसेना ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, शिवसेना ठाकरे गटाच्या बंडखोर खासदारांबाबत सुप्रीम कोर्टातून मोठी बातमी

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय.

Uddhav Thackeray : अभिजीत दीपकेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उद्धव ठाकरेंनी घेतला अजून एक महत्वाचा निर्णय

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!.

VBA Maharashtra Bandh : डावे, बेस्ट संघटना ते कोचिंग क्लासेस, वंचितच्या ‘महाराष्ट्र बंद’ला नेमका कोणाचा पाठिंबा, प्रकाश आंबेडकरांनी A टू Z सांगितलं!

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?.

CJP Delhi Protest : आधी वांगचूक यांची भेट नंतर केंद्र सरकारचं मोठं पाऊल, CJP ची भेट घेणार; मागण्यांचं काय होणार?

मी जंतरमंतरवर कधीच जाणार नाही, तिथे देशद्रोही लोक..; प्रसिद्ध गीतकाराची रोखठोक भूमिका.

मी जंतरमंतरवर कधीच जाणार नाही, तिथे देशद्रोही लोक..; प्रसिद्ध गीतकाराची रोखठोक भूमिका

टीम इंडियात नेमकं चाललंय तरी काय? हर्षित राणा-वॉशिंग्टनला संधी देण्यासाठी नियमांची पायमल्ली!.

टीम इंडियात नेमकं चाललंय तरी काय? हर्षित राणा-वॉशिंग्टनला संधी देण्यासाठी नियमांची पायमल्ली!