AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

म्हातारपण दिसून येतंय.. म्हणणाऱ्यांना सलमान खानने दिलं सडेतोड उत्तर

काही दिवसांपूर्वी सलमान खानचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या होत्या. म्हातारपण सलमानच्या चेहऱ्यावर दिसू लागलंय, असं अनेकांनी म्हटलं होतं. त्यावर आता सलमानने उत्तर दिलं आहे.

म्हातारपण दिसून येतंय.. म्हणणाऱ्यांना सलमान खानने दिलं सडेतोड उत्तर
Salman KhanImage Credit source: Instagram
| Updated on: Mar 24, 2025 | 8:46 AM
Share

सोशल मीडिया आणि ट्रोलिंग हे जणू समीकरणच बनलं आहे. सेलिब्रिटींना या ट्रोलिंगचा खूप फटका बसतो. त्यांच्या एखाद्या फोटो किंवा व्हिडीओवर नेटकरी नकारात्मक कमेंट्सचा वर्षावच करू लागतात. या ट्रोलिंगवर काही सेलिब्रिटी सडेतोड उत्तर देतात. तर काहीजण त्याकडे दुर्लक्ष करणं पसंत करतात. मात्र बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करणारा नाही, हे नुकत्याच एका कार्यक्रमात दिसून आलं. त्याच्या आगामी ‘सिकंदर’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. यासाठी मुंबईत मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या ट्रेलर लाँचला सलमानसोबतच त्याचे वडील सलीम खान, सहअभिनेत्री रश्मिका मंदाना, सत्यराज, काजल अग्रवाल, शर्मन जोशी, दिग्दर्शक ए. आर. मुरुगादोस आणि निर्माता साजिया नाडियादवाला उपस्थित होते.

‘सिकंदर’चा ट्रेलर लाँच झाल्यानंतर सलमान आणि इतर कलाकार हे विविध प्रश्नांची उत्तर देण्यासाठी सज्ज झाले. त्यावेळी त्याच्या एका व्हायरल फोटोचा विषय उपस्थित झाला. सलमानने त्याच्या कुटुंबीयांसाठी आणि जवळच्या मित्रमैत्रिणींसाठी ‘सिकंदर’च्या स्क्रीनिंगचं आयोजन केलं होतं. तेव्हाचा हा फोटो होता. यावेळी पापाराझींनी सलमानचे जे क्लोज अप फोटो क्लिक केले, त्यात त्याचं वय दिसून येत होतं. यावरून नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. ‘सलमान म्हातारा झालाय’, ‘सलमानच्या चेहऱ्यावर म्हातारपण दिसू लागलंय’ असे कमेंट्स त्यावर होते. अशा ट्रोलर्सना आता सलमानने उत्तर दिलं आहे.

‘सिकंदर’चा दमदार ट्रेलर पाहिल्यानंतर सूत्रसंचालकाने सलमानला त्याची ऊर्जा आणि स्क्रीनवर दिसलेला टवटवीत चेहरा, यामागचं रहस्य विचारलं. त्यावर उत्तर देताना सलमान म्हणाला, “अधून मधून कधी-कधी अशी गडबड होत असते. पाच – सात रात्र झोपलो नाही की आणि मग सोशल मीडियावाले हात धुवून मागे लागतात. अशा वेळी त्यांना दाखवावं लागतं की मी अजूनही इथे आहे.”

‘सिकंदर’ या चित्रपटात सलमानसोबत दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. सलमान आणि रश्मिका यांच्या वयात 31 वर्षांचं अंतर असून चित्रपटात तिने त्याच्या प्रेयसीची भूमिका साकारली आहे. या अंतराबद्दल प्रश्न विचारला असता सलमान पुढे म्हणाला, “जर हिरोइनला काही समस्या नाही, हिरोइनच्या वडिलांना काही समस्या नाही, उद्या जेव्हा तिचं लग्न होईल, मुलं होतील आणि तेव्हासुद्धा आम्ही एकत्र काम करू. पतीची परवानगी तर मिळेलच ना?” हे ऐकल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकतो. सलमानचा ‘सिकंदर’ हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर येत्या 30 मार्च रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा
गुंड बंडू आंदेकरला तिकीट दिलं तर....; कोमकरच्या आईने दिला टोकाचा इशारा.
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की...
अजितदादांचा भल्या पहाटे दौरा अन् त्यात घडलं असं काही की....
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा
काँग्रेस-वंचित आघाडी झाल्यास आमचाच महापौर; विजय वडेट्टीवार यांचा दावा.
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती
भाजपकडून धंगेकरांची कोंडी? मुलगा अपक्ष निवडणूक लढणार; सुत्रांची माहिती.
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य
त्यांचा आणि आमचा काडीचाही संबंध नाही! अशोक चव्हाणांचं मोठं वक्तव्य.
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?
ठाकरे बंधूंकडून पवारांच्या राष्ट्रवादीला फक्त 16 जागांचा प्रस्ताव?.
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा
प्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आज लोकलचं वेळापत्रक बघूनचं घराबाहेर पडा.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.