AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पान सिंह तोमर’ फेम सेलिब्रिटीचं वयाच्या ६२ व्या वर्षी निधन; दुपारी होणार अंत्यसंस्कार

वयाच्या ६२ व्या वर्षी ‘पान सिंह तोमर’ फेम सेलिब्रिटीचं निधन; गंभीर आजाराने होते त्रस्त

‘पान सिंह तोमर’ फेम सेलिब्रिटीचं वयाच्या ६२ व्या वर्षी निधन; दुपारी होणार अंत्यसंस्कार
‘पान सिंह तोमर’ फेम सेलिब्रिटीचं वयाच्या ६२ व्या वर्षी निधन; दुपारी होणार अंत्यसंस्कार
| Updated on: Jan 13, 2023 | 8:41 AM
Share

Sanjay Chouhan Passed Away: ‘पान सिंह तोमर’ आणि ‘आय एम कलाम’ यांसारख्या सिनेमांचं लेखण करणाऱ्या संजय चौहान (Sanjay Chouhan) यांचं निधन झालं आहे. वयाच्या ६२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून संजय चौहान किडनीच्या त्रासाने त्रस्त होते. अनेक सिनेमांचं लेखण केलेल्या कलाकाराचं अचानक निधन झाल्यामुळे कलाविश्वाला मोठा धक्का बसला आहे. संजय चौहान यांनी तिग्मांशु धूलिया यांच्यासोबत ‘साहेब बीवी गँगस्टर’ या सिनेमाचं देखील लेखण केलं होतं. (Indian screenwriter in Hindi cinema)

संजय चौहान यांच्या कुटुंबात त्यांची पत्नी सरीता आणि मुलगी सारा आहे. संजय चौहान यांनी अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. शिवाय त्यांच्या कामाची पोचपावती देखील त्यांना मिळाली. २०११ साली प्रदर्शित झालेल्या ‘आय एम कलाम’ सिनेमाला फिल्मफेअर अवॉर्डने सन्मानित देखील करण्यात आलं होतं.

‘आय एम कलाम’ सिनेमासोबत संजन चौहान यांच्या ‘मैंने गांधी को नहीं मारा’ आणि ‘धूप’ या दोन सिनेमांचं देखील प्रचंड कौतुक झालं. संजय चौहान यांच्या निधनाने बॉलिवूडचं मोठं नुकसान झालं आहे असं म्हणायला हरकत नाही. सध्या अनेक सेलिब्रिटी संजय चौहाण यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून श्रद्धांजली वाहत आहेत.

संजय यांनी दिल्लीतून पत्रकार म्हणून आपल्या कामगिरीची सुरुवात केली. त्यानंतर १९९० साली संजय यांनी सोनी टीव्हीवरील क्राईमवर आधारित ‘भंवर’ सीरिजचं लेखण केल्यानंतर मुंबईत आले. मुंबईत आल्यानंतर संजय यांनी कधीच मागे वळून पाहिलं नाही.

मुंबईत आल्यानंतर सुधीर मिश्रा यांच्या योगदानाने २००३ साली प्रदर्शित झालेल्या ‘हजारों ख्वाहिशें ऐसी’ सिनेमासाठी संजय यांनी डायलॉग लिहिले. आपल्य कामामुळे कायम चर्चेत राहिलेले संजय यांच्यावर आज अंत्यसंस्कार होणार आहे. शुक्रवारी दुपारी 12.30 वाजता मुंबईच्या ओशिवारा स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.