AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“माझा अक्षय खन्नावर राग… त्यांच्याशी बोलावंसं वाटलं नाही”, छावाच्या सेटवरील संतोष जुवेकरचा अनुभव

छावा चित्रपटाच्या सेटवर संतोष जुवेकर अक्षय खन्नाशी एकही शब्द बोलला नाही, हे त्यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. तो म्हणाली की, " मला त्याच्याकडे बघावसंही वाटत नव्हतं", पण नेमकं असं काय कारण होतं ज्यामुळे संतोषने अक्षय खन्नाशी न बोलण्याचा निर्णय घेतला होता.

माझा अक्षय खन्नावर राग... त्यांच्याशी बोलावंसं वाटलं नाही, छावाच्या सेटवरील संतोष जुवेकरचा अनुभव
| Updated on: Mar 03, 2025 | 2:27 PM
Share

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ या चित्रपटाने सर्व रेकॉर्ड ब्रेक केले आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून त्याविषयी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात अभिनेता विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराज, रश्मिका मंदाना ही महाराणी येसुबाई आणि अक्षय खन्ना हा मुघल शासक औरंगजेबच्या भूमिकेत आहे. दरम्यान हा चित्रपट आता 500 कोटींच्या घरात पोहोचला आहे. प्रेक्षकांनी भरभरून या चित्रपटाला प्रेम दिलं आहे. विकी कौशलची तर कौतुक करताना प्रेक्षक थकत नाहीयेत. चित्रपटातील सर्वच कलाकारांनी उत्तम काम केलं आहे. पण विकीनंतर कोणी भाव खाऊन गेलं तर तो अक्षय खन्ना आहे. अक्षय खन्नाच्या भूमिकेनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

विकी आणि अक्षय खन्ना एकमेकांशी बोललेच नव्हते

चित्रपटाचं शुटींग होईपर्यंत विकी आणि अक्षय खन्ना हे एकमेकांशी बोललेच नाही हे तर त्यांनी अनेक मुलाखतीदरम्यान सांगितलं आहे. याबद्दल विकीला विचारलं असता तो म्हणाली की, “ज्या पद्धतीचे आम्हा दोघांचे सीन्स होते, ते पाहून आम्ही बाजूबाजूला खुर्चीवर बसून चहा-कॉफी पिऊन मग शूटिंगसाठी जाऊ शकत नव्हतो. आम्हा दोघांकडून हे सहजरित्या झालंसुद्धा नव्हतं. शूटिंगदरम्यान आम्ही एकमेकांशी काहीच बोललो नाही.शुटींगमध्ये तो औरंगजेब होता आणि मी छत्रपती संभाजी महाराज” असं म्हणत विकीने हे न बोलण्याचं गुपित उघड केलं होतं.

रायाची भूमिका करणारा संतोष जुवेकरही अक्षय खन्नाशी बोलला नाही

विकी आणि अक्षय खन्नाचं एकमेकांशी न बोलणं हा एक चित्रपटाचा भाग होता किंवा त्यांच्या पात्रासाठी ते केलं होतं. पण चित्रपटाच्या शुटींगदरम्यान अजून एक अभिनेता असा तोही अक्षय खन्नासोबत बोलला नाही. हा अभिनेता म्हणजे संतोष जुवेकर. संतोषने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत संपूर्ण शूटिंगमध्ये अक्षय खन्नासोबत बोलला नसल्याचा खुलासा केला. विकी कौशलच्या छावा सिनेमाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या सिनेमात रायाजीची भूमिका साकारून संतोष जुवेकरनेही प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली.

कोणत्याही मुघल पात्राशी संतोष का बोलला नाही?

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत संतोषने संपूर्ण शूटिंगमध्ये अक्षय खन्नासोबत बोललोही नसल्याचा खुलासा केला. याचं कारण सांगत तो म्हणाला, “सिनेमात ज्यांनी मुघलांच्या भूमिका साकारल्या त्या कोणाशीच मी बोललो नाही. संपूर्ण शूटिंगमध्ये मी तरी त्या कोणत्याही पात्राशी बोललो नाही. औरंगजेबाच्या भूमिकेत असलेल्या अक्षय खन्नाच्या काही सीन्सचं शूटिंग सुरू असताना मी लक्ष्मण सरांना भेटायला गेलो होतो. मी सरांना भेटलो आणि निघालो. बाजूला अक्षय खन्ना बसला होता. पण, मी त्याच्याकडे बघितलंही नाही.” असं म्हणत त्याने तो किस्सा सांगितला.

“मी त्यांचा द्वेष करत नाही पण….”

पण त्याने असं का केलं हे सांगताना तो म्हणाला की, “मी बघूच शकत नव्हतो त्याच्याकडे. माझा काही अक्षय खन्नावर राग नाही. त्याने उत्तमच काम केलं आहे. पण, माहीत नाही का त्यांच्याशी बोलावंसंच मला वाटलं नाही. मी त्यांचा द्वेष करत नाही. पण, मी सेटवर त्यांच्याशी एक शब्दही बोललो नाही”. असं म्हणत त्याने न बोलण्याचं कारणही सांगितलं.

महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.