AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Udayanraje Bhosale : छावा चित्रपट, शिर्के कुटुंबाबद्दल खासदार उदयनराजेंनी स्पष्ट केली आपली भूमिका

Udayanraje Bhosale : सध्या सगळीकडे गाजत असलेल्या छावा चित्रपटात दाखवलय शिर्केंनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिलय. त्या मुद्यावर आणि सिनमॅटिक लिबर्टी या विषयावर खासदार उदयनराजे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे काही महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत.

Udayanraje Bhosale : छावा चित्रपट, शिर्के कुटुंबाबद्दल खासदार उदयनराजेंनी स्पष्ट केली आपली भूमिका
Udayanraje BhosaleImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Mar 07, 2025 | 12:21 PM
Share

“छत्रपती शिवाजी महाराजांचा शासन मान्य अधिकृत इतिहास महाराष्ट्र शासनाने खंड स्वरुपात प्रसिद्ध करावा. त्यामुळे होणारे सारखे वादविवाद संपुष्टात येतील. कोणाला सिनेमा काढायचा असेल, सीरियल बनवायची असेल, सिनमॅटिक लिबर्टी म्हणतो, त्याच्यावर सुद्धा कायदा आला पाहिजे” अशी मागणी साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी केली. “कुठलीतरी कांदबरी काल्पनिक स्वरुपात लिहितात, अशी अनेक कुटुंब, घराणी या महाराष्ट्रात, देशात आहेत, ज्या लोकांनी आपलं आयुष्य वेचलय. काल्पनिक आधारावर जेव्हा तुम्ही चित्रपट रिलीज करता, हे करण्याआधी इतिहासकांची एक कमिटी बनवा” अशी मागणी उदयनराजे यांनी पत्रकार परिषद घेऊन केली.

“चित्रपटाच स्क्रिप्ट त्या समितीसमोर गेलं पाहिजे. ती समिती अभ्यास करेल. काल्पनिक आधारावर जे होतं, त्यातून तेढ निर्माण होते. संपूर्ण शिर्के कुटुंबातले बरेच लोक आले होते. छावा चित्रपटात दाखवलय शिर्केंनी छत्रपती संभाजी महाराजांना पकडून दिलय. पण अशी इतिहासात कुठेही नोंद नाही. तसं असतं तर सोयरिक झाली असती का?” असं उदयनराजे म्हणाले.

‘त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो’

“ते म्हणत होते की, आज आम्ही कुठेही गेलो तरी लोक त्या नजरेने बघतात. आज लोक वेगवेगळ्या व्यवसायात, प्रोफेशनमध्ये असतील प्रत्येकावर गदा येते. त्यांच्याकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन निर्माण होतो. समाजात तेढ निर्माण करण्याच काम हे जे लोक करतात, त्यासाठी याच अधिवेशनात कायदा आणा” अशी मागणी उदयनराजे यांनी केली. “मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता सर्वपक्षीय नेते यांनी याच अधिवेशनात कायदा पारित करुन दाखवावा. अन्यथा लोकांचा तुमच्यावरील विश्वास उडेल” असं उदयनराजे म्हणाले.

‘कायदा करुन शिकार करा’

“दंगली होतात, कारण नसताना लोक मृत्यूमुखी पडतात, हे थांबवण्याचं काम सत्ताधाऱ्यांचच नाही, महाराष्ट्रातील सगळ्यांचच आहे. महाराष्ट्रात चालू अधिवेशनात विशेष कायदा पास करावा ही माझी विनंती आहे. असं केलं नाही, तर सारखा गोंधळ सुरु राहिलं. सभागृहातील शोर आता बंद करा आणि कायदा करुन शिकार करा” असं उदयनराजे म्हणाले.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.