AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संसार मोडला, पतीने घराबाहेर काढलं, तरीही पूर्व पतीने दिली नाही साथ; म्हणाला “मी काय करू?”

अभिनेत्री आणि पूर्व पत्नी दलजीत कौरच्या आरोपांवर शालीन भनोतने प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या वर्षभरापासून शालीनने त्याच्या मुलाशी कोणताच संपर्क साधला नाही, असा आरोप दलजीतने केला होता. शालीन आणि दलजीत यांना जेडन हा मुलगा आहे.

संसार मोडला, पतीने घराबाहेर काढलं, तरीही पूर्व पतीने दिली नाही साथ; म्हणाला मी काय करू?
शालीन भनोत, दलजीत कौरImage Credit source: Instagram
| Updated on: Oct 31, 2024 | 2:07 PM
Share

‘इस प्यार को क्या नाम दूँ’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दलजीत कौर तिच्या खासगी आयुष्यामुळे सतत चर्चेत आहे. दलजीतने गेल्या वर्षी केन्यातील बिझनेसमन निखिल पटेलशी दुसरं लग्न केलं. लग्नानंतर ती मुलासोबत केन्यामध्ये राहू लागली. मात्र लग्नाच्या अवघ्या दहा महिन्यांतच ती मुलाला घेऊन भारतात परतली आणि त्यानंतर तिने निखिलवर विवाहबाह्य संबंधाचे आरोप केले. तर दुसरीकडे निखिलने दलजीतसोबतच्या लग्नाला मान्यता देण्यास नकार दिला. गेल्या काही महिन्यांपासून दलजीत त्याच्यावर विविध आरोप करत आहे. अशातच एका मुलाखतीत तिने पूर्व पती शालीन भनोतवरही काही आरोप केले होते. इतकं सगळं घडूनही शालीनने त्याच्या मुलाबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही, त्याने संपर्कच साधला नाही, असं दलजीत म्हणाली होती. यावर आता शालीनने प्रतिक्रिया दिली आहे.

‘टेली मसाला’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत शालीनला दलजीतच्या आरोपांविषयी प्रश्न विचारण्यात आला. तुझ्याबद्दल जे काही म्हटलं गेलं, ते तू वाचलंस का, असं त्याला विचारलं गेलं. त्यावर तो म्हणाला, “मी कधी शाळेत वाचलो नाही तर आता काय वाचणार? मी फक्त माझी स्क्रिप्ट वाचतो. आतासुद्धा मी तेच करतोय, खूपच रंजक आहे. मी गुगल करत नाही, काय करू मी? माझ्याबद्दल मला माहीत आहे, माझ्या आईवडिलांना माहीत आहे. त्यामुळे मी बाकी सर्व गोष्टी वाचत बसत नाही. मी फक्त खुश राहतो.” शालीनने दलजीतच्या आरोपांवर अप्रत्यक्षपणे असं उत्तर दिलं आहे.

दलजीतचे आरोप

“माझ्या पूर्व पतीसोबत गेल्या वर्षभरापासून माझा काहीच संपर्क नाही. कदाचित वर्षभराहून अधिक काळ उलटला असेल. त्यानेही कधीही आमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही. नऊ वर्षांपर्यंत मी त्याच्यासोबत खूप चांगल्याप्रकारे वागण्याचा प्रयत्न केला. जेव्हा जेव्हा त्याने मुलाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली, मी जेडनला त्याला भेटू दिलं होतं. कारण हे माझ्या मुलासाठी चांगलं असेल असा मी विचार केला. पण नंतर केन्यामध्ये आमच्यासोबत काय घडलं, त्याच्या मुलासोबत काय घडलं याविषयी त्याने जाणून घेण्याचाही प्रयत्न केला नाही. त्याच्याकडे माझा नंबरही असावा, पण त्याने आजवर कॉल किंवा मेसेज केला नाही”, असं दलजीतने म्हटलं होतं.

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.