AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘चूक केली, आता मूव्ह ऑन..’; दलजीत कौरच्या पतीची पोस्ट चर्चेत

'इस प्यार को क्या नाम दूँ' या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दलजीत कौर तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. दलजीतने पती निखिल पटेलवर बरेच आरोप केल्यानंतर आता त्याने आपली बाजू मांडली आहे.

'चूक केली, आता मूव्ह ऑन..'; दलजीत कौरच्या पतीची पोस्ट चर्चेत
दलजीत कौर, निखिल पटेलImage Credit source: Instagram
| Updated on: Dec 29, 2024 | 3:30 PM
Share

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दलजीत कौरच्या वैवाहिक आयुष्यात गेल्या काही महिन्यांपासून समस्या सुरू आहेत. दलजीतने गेल्या वर्षी मार्च महिन्यात केन्यातील बिझनेसमन निखिल पटेलशी तिने दुसरं लग्न केलं होतं. मात्र लग्नाच्या दहा महिन्यांतच ती पतीला सोडून भारतात परतली. भारतात आल्यानंतर दलजीत आणि निखिलच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलं. सुरुवातीला तिने याविषयी मौन बाळगणं पसंत केलं. मात्र गेल्या काही दिवसांपासून ती सोशल मीडियावर विविध पोस्ट लिहित पतीवर विवाहबाह्य संबंधाचा आरोप करताना दिसली. इतकंच नव्हे तर निखिलने लग्नाला मान्यता देण्यास नकार दिल्याचंही तिने म्हटलंय. दलजीतच्या या सर्व आरोपांवर निखिलने एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टीकरण दिलं. त्यानंतर आता त्याच्या सोशल मीडियावरील एका पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.

निखिलने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली आहे. ‘एक पाऊल उचलण्यास घाबरून बसण्यापेक्षा झेप घेणं आणि चूक करणं अधिक चांगलं आहे,’ असं या पोस्टमध्ये लिहिलं आहे. हीच पोस्ट शेअर करत निखिलने त्याच्या चुकांमधून शिकल्याचं म्हटलंय. ‘100 टक्के.. मी अशाच पद्धतीने वागतो. चुका करा, ठीक आहे. त्यातून शिका आणि पुढे चला’, असं निखिलने या पोस्टवर लिहिलं आहे.

निखिल पटेलची पोस्ट-

‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत निखिल म्हणाला होता, “यावर्षी जानेवारी महिन्यात दलजीतने मुलाला घेऊन भारतात जाण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आम्ही तिथेच विभक्त झालो. आमच्या या मिश्र कुटुंबाचा पाया तितका मजबूत बनू शकला नाही जितकी आम्हाला अपेक्षा होती. दलजीतला केन्यामध्ये राहायला जमत नव्हतं.”

दलजीतसोबतच्या लग्नाबद्दल निखिलने पुढे सांगितलं, “मार्च 2023 मध्ये आम्ही मुंबईत भारतीय विवाहपद्धतीनुसार लग्न केलं. या विवाहाला सांस्कृतिक मान्यता असली तरी ते कायदेशीररित्या बंधनकारक नाही. त्या सोहळ्याचा हेतू हाच होता की दलजीत माझ्यासोबत केन्याला शिफ्ट होणार असल्याचं आश्वासन तिच्या कुटुंबाला मिळावं. आमच्या अनेक प्रयत्नांनंतरही दलजीतसाठी केन्यामध्ये राहणं खूप आव्हानात्मक झालं होतं. तिला भारतातील तिच्या करिअरची आणि आयुष्याची खूप आठवण येत होती. त्यामुळे वैवाहिक आयुष्यातील ही गुंतागुंत वाढतच गेली.”

Follow Us
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!
भारत - न्यूझीलंडच्या टीम टी 20 च्या फायनलमध्ये भिडणार!.
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही
आंबा बागायतदारांना जास्तीत जास्त मदत देणार; नितेश राणे यांची ग्वाही.
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य
पुलाला दादांचं नाव देण्याची मागणी, तसा निर्णय घेऊ; फडणवीसांचं वक्तव्य.
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी
उड्डाणपुलाला अजितदादांचे नाव देण्याची मागणी द्यावं; मोहोळ यांची मागणी.
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण
पुलाच्या लोकार्पणावेळी फडणवीसांना अजितदादांची आठवण.
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक
अजित दादांनी पुण्यासाठी जी स्वप्न पाहिलीत ती...; सुनेत्रा पवार भावुक.
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
ममता बॅनर्जी माझ्या धाकट्या बहिणीसारख्या - राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू.
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात
साताऱ्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेला सुरुवात.
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!
रत्नागिरीत घरगुती गॅसचा तुटवडा; युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम!.
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
पुणे विद्यापीठ चौकातील उड्डाणपुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन.