AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shark Tank India 2: एकाला 102 कोटी, तर दुसऱ्याला 5 हजार कोटींचा फटका; ‘शार्क टँक इंडिया’च्या परीक्षकांचाच बिझनेस तोट्यात

दुसऱ्यांना बिझनेसची शिकवण देणाऱ्या 'शार्क टँक इंडिया'च्या परीक्षकांचा स्वत:चा बिझनेस मात्र तोट्यात; जाणून घ्या कोणाला बसला किती कोटींचा फटका?

Shark Tank India 2: एकाला 102 कोटी, तर दुसऱ्याला 5 हजार कोटींचा फटका; 'शार्क टँक इंडिया'च्या परीक्षकांचाच बिझनेस तोट्यात
Shark Tank India 2: एकाला 102 कोटी, तर दुसऱ्याला 5 हजार कोटींचा फटका; 'शार्क टँक इंडिया'च्या परीक्षकांचाच बिझनेस तोट्यातImage Credit source: Twitter
| Updated on: Jan 17, 2023 | 12:45 PM
Share

मुंबई: ‘शार्क टँक इंडिया’चा दुसरा सिझनसुद्धा पहिल्या सिझनप्रमाणेच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय. या नव्या सिझनमध्ये काही बदल करण्यात आल आहेत. शार्क टँक इंडियाच्या दुसऱ्या सिझनमध्ये ‘भारत पे’चा सहसंस्थापक अश्नीर ग्रोवर नाहीये. पहिल्या सिझनमधला तो सर्वाधिक चर्चेत असलेला चेहरा होता. त्यांची जागा आता ‘कार देखो’चा सीईओ अमित जैनने घेतली आहे. या शोला जरी रेटिंग चांगली मिळत असली तरी सोशल मीडियावर एक वेगळाच वाद सुरू झाला आहे. शार्क टँक इंडियाचे परीक्षक हे शो चालवण्याच्या लायकीचे नाहीत, असे कमेंट्स नेटकरी करत आहेत.

या चर्चेची सुरुवात लेखक अंकित उत्तम यांच्या पोस्टमुळे झाली. अंकित यांनी त्यांच्या लिंक्डइन अकाऊंटवर शार्क टँक इंडियाच्या परीक्षकांविषयी एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्याने या परीक्षकांच्या बिझनेसची पोलखोल केली आहे. फक्त एक परीक्षक सोडता शार्क टँक इंडिया 2 च्या बाकी सर्व परीक्षकांचा बिझनेस तोट्यात असल्याचं त्याने म्हटलं आहे. त्यांना शेकडो ते हजारो कोटी रुपयांचा नुकसान सहन करावा लागला आहे, असा खुलासा त्याने केला आहे.

अंकित यांनी शार्क टँक अमेरिकेशी शार्क टँक इंडियाची तुलना केली. ‘शार्क टँक अमेरिका’च्या परीक्षकांचा व्यवसाय चांगला नफा कमवत असल्याचं त्याने म्हटलंय. तर दुसरीकडे शार्क टँक इंडियाच्या परीक्षकांच्या कंपन्या तोट्यात आहेत. विनिता सिंहची शुगर कॉस्मेटिक्स, गजल अलघची ममाअर्थ, अश्नीर ग्रोवरचा भारत पे, अनुपम मित्तलचा शादी डॉटकॉम, पियुश बंसलचा लेन्सकार्ट आणि अमित जैनचा कारदेखो या कंपन्या तोट्यात असल्याचं अंकित यांनी म्हटलं आहे.

विनिता सिंहच्या शुगर कॉस्मेटिकला 2022 मध्ये 75 कोटी रुपयांचं नुकसान

गजल अलघच्या ममाअर्थला 14.44 कोटी रुपयांचा फायदा

मात्र 2021 मध्ये 1332 कोटी आणि 2020 मध्ये 428 कोटी रुपयांचं नुकसान

अश्नीर ग्रोवरच्या ‘भारत पे’चं 2022 मध्ये 5594 कोटी रुपयांचं नुकसान

अनुपम मित्तलच्या ‘शादी डॉटकॉम’ आणि ‘मकान डॉटकॉम’ या कंपन्या बुडाल्यात जमा

पियुश बंसलच्या ‘लेन्सकार्ट’ला 2022 मध्ये 102.3 कोटी रुपयांचा तोटा

अमित जैनच्या ‘कारदेखो’ कंपनीचा 246.5 कोटी रुपयांचा तोटा

अंकित यांच्या मते नमिता थापरच्या ‘एमक्योर फार्मा’ या कंपनीची स्थापना तिच्या वडिलांनी केली. या कंपनीत नमिता फक्त गादीवर बसली आहे. नमितावर त्यांनी घराणेशाहीची टिप्पणी केली आहे. यादरम्यान फक्त अमन गुप्ताच्या ‘बोट’ या कंपनीचाच फायदा झाला असल्याचंही त्याने स्पष्ट केलं आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.