AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

म्हणून शहनाज गिलने सलमान खानचा फोन नंबर केला ब्लॉक, अभिनेत्रीने सांगितला किस्सा …

Shehnaaz Gill : एकेकाळी पंजाबची कॅटरिना कैफ म्हणून मिरवणाऱ्या शहनाज गिलने आता स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती लौकरच किसी का भाई किसी की जान या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे. हा चित्रपट तिला कसा मिळाला या रंजक किस्सा तिने सांगितला.

म्हणून शहनाज गिलने सलमान खानचा फोन नंबर केला ब्लॉक, अभिनेत्रीने सांगितला किस्सा ...
Image Credit source: social media
| Updated on: Apr 14, 2023 | 2:10 PM
Share

मुंबई : बिग बॉसच्या 13 व्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून आल्यापासूनच शहनाज गिल (Shehnaaz gill) आणि सलमान खान (Salman khan) यांचा वेगळाच बॉंड आहे. त्यांचे एकमेकांशी चांगले संबंध आहेत. शहनाज आता सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ (kisi ka bhai kisi ki jaan) या आगामी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. सध्या शहनाज आणि सलमानसह संपूर्ण स्टारकास्ट चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. या संदर्भात टीम नुकतीच ‘द कपिल शर्मा शो’मध्ये पोहोचली होती. यादरम्यान शहनाजने एक खुलासा केला, जो ऐकून सगळेच हैराण झाले.

सलमान आणि शहनाजचा चांगला बाँड असला तरी तिने एकदा खुद्द सलमानचाच फोन नंबर ब्लॉक केला होता. हो, हे खरं आहे. कॉमेडी शोमध्ये कपिल शर्माशी संवाद साधताना खुद्द शहनाजनेच हा खुलासा केला. हा तेव्हाचा किस्सा आहे, जेव्हा सलमानने तिला ‘किसी का भाई किसी की जान’ चित्रपटामध्ये एक भूमिका ऑफर करण्यासाठी बोलावले होते.

Truecaller वर शहनाजने चेक केला नंबर

याबद्दल शहनाज म्हणाली, ” मी तेव्हा अमृतसरमध्ये होते. मी गुरुद्वारेत गेले होते, तेव्हा मला एका अनोळखी नंबरवरून (Unknown Number) कॉल येत होता. शहनाज म्हणाली की, मला तिला अनोळखी नंबर ब्लॉक करण्याची सवय आहे. त्यामुळे तो नंबर अनोळखी नंबर मी लगेच ब्लॉक केला. काही मिनिटांनंतर मला एक मेसेज आला की, सलमान तिला कॉल करण्याचा प्रयत्न करत आहे. यानंतरही त्यावर शहनाजचा विश्वास बसला नाही आणि तो नंबर तिने Truecaller ॲपवर चेक केला. आणि तो नंबर खरंच सलमान खानचा आहे, हे तिला समजलं. ”

त्यानंतर शहनाजने लगेचच सलमानचा नंबर अनब्लॉक करून त्याला परत कॉल केला. तेव्हा सलमानने तिला ‘ किसी का भाई किसी का जान’ चित्रपटात रोल ऑफर केला आणि अशा प्रकारे तिला बॉलिवूड डेब्यू प्रोजेक्ट मिळाला.

सलमानसोबत काम करताना नर्व्हस नव्हती शहनाज

दरम्यान काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला. तेव्हा शहनाजने सांगितले होते की, चित्रपटात काम करताना ती अजिबात नर्व्हस झाली नाही. ती म्हणाली, फायनल आऊटपुटमध्ये ती कशी दिसेल, ते पाहून तिला छान वाटलं. स्वत:ला मोठ्या पडद्यावर पाहून मला खूप छान वाटलं. तुम्हाला तर माहीत आहेच, माझं स्वत:वर किती प्रेम आहे ते ! त्यानंतर सलमान सर आणि बाकी सर्वांचा नंबर येतो.

किसी का भाई किसी का जान चित्रपटाची स्टार कास्ट

फरहाद सामजी दिग्दर्शित ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात सलमान खान, शहनाज गिल या दोघांसह पूजा हेगडे, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, राघव जुयाल, जस्सी गिल आणि जगपती बाबू यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. 21 एप्रिलला ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे.

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.