AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shehnaaz Gill | “आओ और जाओ, दफा हो जाओ”; प्रेमात झालेल्या फसवणुकीनंतर शहनाजने व्यक्त केलं दु:ख

बिग बॉसच्या घरात शहनाज आणि सिद्धार्थ शुक्लाची जवळीक प्रेक्षकांना पहायला मिळाली. घरातून बाहेर पडल्यानंतर हे दोघं अनेकदा एकत्र दिसले होते. मात्र माध्यमांसमोर रिलेशनशिपची कबुली दोघांनी कधीच दिली नव्हती.

Shehnaaz Gill | आओ और जाओ, दफा हो जाओ; प्रेमात झालेल्या फसवणुकीनंतर शहनाजने व्यक्त केलं दु:ख
Shehnaaz Gill Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 04, 2023 | 2:30 PM
Share

मुंबई : पंजाबची कतरिना कैफ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री शहनाज गिल ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धक म्हणून सहभागी झाल्यानंतर प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचली. बिग बॉसच्या घरात तिचं नाव अभिनेता सिद्धार्थ शुक्लाशी जोडलं गेलं होतं. चाहत्यांनी या दोघांच्या जोडीला ‘सिदनाज’ असं नाव दिलं होतं. मात्र सिद्धार्थच्या निधनानंतर शहनाज पूर्णपणे खचली होती. काही महिने ती माध्यमांपासून आणि सोशल मीडियापासून दूर होती. सिद्धार्थच्या निधनाच्या दु:खातून सावरल्यानंतर शहनाजने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत शहनाज प्रेम आणि रिलेशनशिप यांविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. प्रेमात फसवणूक झाल्याचा खुलासादेखील तिने केला.

‘इन्स्टंट बॉलिवूड’ला दिलेल्या मुलाखतीत शहनाजला विचारण्यात आलं की तिचा कधी प्रेमभंग झाला का? त्यावर ती म्हणाली, “मी आजपर्यंत प्रेमात कोणाची फसवणूक केली नाही. पण स्पष्ट बोलायचं झाल्यास, सर्वांनी माझी फसवणूक केली. समोरच्याच व्यक्तीने मला सोडलं. ज्यावेळी तुमच्या पार्टनरची नजर दुसऱ्या किंवा तिसऱ्या व्यक्तीवर असते, तेव्हा आपण एक पाऊल मागेच येतो. धोका दिल्यावर निघून जा.. आता मी हाच विचार करते की जर तुम्हाला यायचं असेल तर या, जायचं असेल तर जा. खड्ड्यात जा.”

बिग बॉसच्या घरात शहनाज आणि सिद्धार्थ शुक्लाची जवळीक प्रेक्षकांना पहायला मिळाली. घरातून बाहेर पडल्यानंतर हे दोघं अनेकदा एकत्र दिसले होते. मात्र माध्यमांसमोर रिलेशनशिपची कबुली दोघांनी कधीच दिली नव्हती. ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सलमानने सर्वांसमोर शहनाजला तिच्या आयुष्यात पुढे जाण्याचा सल्ला दिला होता. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान डान्सर आणि कोरिओग्राफर राघव जुयालसोबत शहनाजचं नाव जोडलं गेलं होतं.

अफेअरच्या चर्चांवर खुद्द राघवने उत्तर दिलं होतं. ‘डीएनए’ला दिलेल्या मुलाखतीत राघव म्हणाला होता, “इंटरनेटवरील गोष्टी माझ्यापर्यंत पोहोचत नाहीत. जोपर्यंत मी स्वत: ते पाहत नाही किंवा ऐकत नाही, तोपर्यंत ते खरं आहे की खोटं ते मला माहीत नाही. मी इथे चित्रपटासाठी आलो आहे आणि मला लोकांनी एक अभिनेता, डान्सर आणि सूत्रसंचालक म्हणून ओळखावं अशीच माझी इच्छा आहे. मी कामातून व्यक्त होतो. बाकी या सर्व गोष्टी (डेटिंगच्या चर्चा) असो किंवा नसो.. आणि हे सर्व शक्यच नाही. कारण माझ्याकडे तेवढा वेळच नाही. मी डबल शिफ्टमध्ये काम करतो. सध्या माझी परिस्थिती अशी आहे की या सर्व गोष्टींसाठी माझ्याकडे वेळच नाही.”

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.