Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सध्याची परिस्थिती पाहता..; पंतप्रधान मोदींबद्दल श्रेयस तळपदेचं वक्तव्य चर्चेत

अभिनेता श्रेयस तळपदे नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत लोकसभा निवडणुकींविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. यावेळी त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचं तोंडभरून कौतुक केलं. त्याचप्रमाणे तेच पुन्हा जिंकून येतील, असा विश्वास व्यक्त केला.

सध्याची परिस्थिती पाहता..; पंतप्रधान मोदींबद्दल श्रेयस तळपदेचं वक्तव्य चर्चेत
PM Narendra Modi and Shreyas TalpadeImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: May 16, 2024 | 9:41 AM

सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. या निवडणुकीसाठी भाजपपासून काँग्रेसपर्यंत अनेक पक्षांचे प्रतिनिधी रिंगणात उभे आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेता श्रेयस तळपदेनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं आहे. श्रेयससोबतच ‘पुष्पा’ फेम अभिनेत्री रश्मिका मंदाना हिनेसुद्धा गेल्या दहा वर्षांत देशाचा बराच विकास झाल्याचं म्हटलंय. “पंतप्रधान मोदी हे गेल्या दहा वर्षांपासून देशासाठी काम करत आहेत आणि ते सर्वांत आधी देशाचा विचार करतात, म्हणून लोकांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे”, असं श्रेयस म्हणाला. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता नरेंद्र मोदी हे पुन्हा एकदा निवडणूक जिंकतील आणि पुन्हा देशाचा पंतप्रधान होतील, असाही विश्वास त्याने व्यक्त केला आहे.

श्रेयसकडून मोदींचं कौतुक

‘लोकमत फिल्मी’ला दिलेल्या या मुलाखतीत श्रेयस पुढे म्हणाला, “सध्याच्या राजकीय परिस्थितीत मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं खूप कौतुक करतो. कारण गेल्या दहा वर्षांपासून ते आपल्या देशासाठी काम करत आहेत. ते आधी देशाचा विचार करतात. म्हणूनच लोकांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आताच्या परिस्थितीत नरेंद्र मोदी हेच निवडणूक जिंकतील आणि पुन्हा पंतप्रधानांच्या खुर्चीवर बसतील.”

श्रेयस तळपदेला काही महिन्यांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. याविषयी तो म्हणाला, “मी या थिअरीला नकार देणार नाही की कोविड 19 विरोधातील व्हॅक्सीन घेतल्यानंतर मला थकवा जाणवत होता. व्हॅक्सीनचा काही प्रमाणात शरीरावर परिणाम झाला असेल. आपल्याला माहितच नाही की आपल्या शरीरात काय गेलंय. आपण त्या प्रवाहात वाहत गेलो आणि कंपन्यांवर विश्वास केला. कोविड 19 च्या आधी मी अशा घटना ऐकल्या नव्हत्या.”

हे सुद्धा वाचा

काय म्हणाली रश्मिका मंदाना?

दुसरीकडे ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत रश्मिका मंदाना म्हणाली, “दोन तासांचा प्रवास आता फक्त वीस मिनिटांत केला जाऊ शकतो. हे ऐकून तुम्हालाही विश्वास बसणार नाही. हे शक्य होईल, याचा विचार तरी कोणी केला होता? आज नवी मुंबई ते मुंबईपर्यंत, गोवा ते मुंबईपर्यंत आणि बेंगळुरू ते मुंबईपर्यंतचा प्रवास खूप सोपा झाला आहे. याचं मला फार कौतुक वाटतं. गेल्या दहा वर्षांत या देशाचा खूप विकास झाला.”

आमची बदनामी थांबवा; खोक्याच्या बायकोच जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण
आमची बदनामी थांबवा; खोक्याच्या बायकोच जिल्हाधिकारी कार्यालयात उपोषण.
फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल
फहीम खानने पोलीसांशी घातली हुज्जत, व्हिडिओ व्हायरल.
कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत
कारागृह पोलीस भरतीसाठी 3 हजार मुलींची गर्दी; गोंधळ उडल्याने दुखापत.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार.
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका
औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाही; RSS ने स्पष्ट केली भूमिका.
गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र कितवा; फडणवीसांनी विधानसभेत थेट मांडले आकडे
गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र कितवा; फडणवीसांनी विधानसभेत थेट मांडले आकडे.
नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं
नागपूर पोलिसांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.
'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?
'औरंगजेब तुमचा बाप की तुम्ही त्याच्या खानदानातले',आव्हाड कोणावर भडकले?.
'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद
'अध्यक्ष महोदय, मी चॉकलेट नाही, कॅडबरी दिली', फडणवीसांचा मिश्किल विनोद.
लालपरीनं प्रवास करताय? प्रवास करताना एसटी बिघडली तरी नो टेन्शन कारण...
लालपरीनं प्रवास करताय? प्रवास करताना एसटी बिघडली तरी नो टेन्शन कारण....