सुनील शेट्टीने रेड लाईट एरियातून 456 मुलींची सुटका केलेली तेव्हा…, कोणत्या देशातील होत्या मुली?
मुंबईचा सर्वात मोठा रेड लाईट एरिया, जिथे अडकलेल्या 456 मुलींची सुनील शेट्टीने केली सुटका..., फार कमी लोकांना माहितीये तेव्हा नेमकं काय घडलेलं?

अभिनेता सुनील शेट्टी (Suniel Shetty) याने रेड लाईट एरियामध्ये अडकलेल्या मुलींसाठी असं काही केलं, ज्यामुळे मुली त्यांच्या घरी सुखरुप पोहचू शकल्याा… तेव्हा अभिनेत्याने नक्की काय केलं? हे जाणून घेतल्यानंतर तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल… सांगायचं झालं तर, सेलिब्रिटी कायम समाजसेवा करतात, ज्याची चर्चा देखील सर्वत्र रंगत असते. पण सुनील शेट्टी याने वेश्याव्यवसायात बळजबरी अडकलेल्या मुलींसाठी असं काही केलं, ज्यामुळे त्यांची सुखरुप सुटका झाली आणि त्याबद्दल कोणाला काही कळलं देखील नाही. तेव्हा अभिनेत्याने तब्बल 456 मुलींची सुटका केली होती…
सुनील शेट्टी याने 456 महिलांना त्या नरकातून बाहेर काढलं. पण 128 मुलींसाठी तर त्याने मोठं पाऊल उचललं. अभिनेत्याने मुलींना त्या नरकातून काढून सुखरुप त्यांच्या घरी पोहोचवं. मीडिया रिपोर्टनुसार, 1996 मध्ये मुंबई येथील सर्वात मोठा रेड लाईट एरिया कामाठीपुरा येथे पोलीस आणि सामाजीक कार्यकर्त्यांनी छापा टाकला आणि वेश्याव्यवसायात अडकलेल्या तब्बल 456 मुलांची सुटका केली. त्यामध्ये 128 मुली तर, नेपाळ येथील होत्या… पण मोठी अडचण तेव्हा आली, जेव्हा नेपाळ सरकारने त्यामुळे पुन्हा देशात प्रवेश देण्यास नकार दिला.
तेव्हा नेपाळ सरकारचं म्हणणं होतं की, त्या मुलींकडे कोणता जन्माचा दाखला नाही आणि नेपाळचं नागरिकत्व देखील नाही… अशात त्या 128 मुलींसाठी सुनील देवदूत म्हणून आला. रिपोर्टनुसार, अभिनेत्याने स्वखर्चाने त्या मुलींसाठी विमानाची तिकिटं बूक केली. एवढंच नाही तर, अभिनेत्याने सर्व मुली आपापल्या घरी सुखरूप पोहोचतील याचीही खात्री केली.
रिपोर्टनुसार, अने वर्ष सुनील या विषयावर बोलला देखील नव्हता कारण त्याला भीती होती की जर त्याची माहिती उघड झाली तर मुलींचं आयुष्य धोक्यात येतील. दरम्यान, सुनील शेट्टीने एका मुलाखतीत सांगितले की, ज्या महिलांची सुटका करण्यात आली, त्यांना कदाचित त्याचं नाव आठवत असेल कारण तो एक अभिनेता आहे. त्या घटनेची आठवण करून देताना सुनील म्हणाला की, त्यावर एक सिनेमा बनवता येईल.
सांगायचं झालं तर, सुनीलने 128 मुलींच्या परतीची व्यवस्था करण्याचं संपूर्ण श्रेय घेण्यास नकार दिला आणि सांगितलं, की या प्रकल्पावर अनेक लोकांनी खूप मेहनत घेतली होती. याचं श्रेय अभिनेत्याने त्याच्या सासूला हिला, कारण त्यांनी एनजीओ आहे. ज्याची फार मदत झाली.
