AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पाकिस्तानचा झेंडा पाहिला अन्…; सुनील शेट्टीने सांगितला ‘बॉर्डर’चा क्लायमॅक्स कसा शूट झाला?

सध्या ‘बॉर्डर २’ चित्रपटाची चांगली चर्चा रंगली आहे. हा चित्रपट २३ जानेवारी २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे. त्याच्या रिलीजआधी सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’च्या लोकप्रिय क्लायमॅक्स सीनबाबत अनेक खुलासे केले आहेत.

पाकिस्तानचा झेंडा पाहिला अन्...; सुनील शेट्टीने सांगितला ‘बॉर्डर’चा क्लायमॅक्स कसा शूट झाला?
Border Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Dec 16, 2025 | 5:05 PM
Share

जे. पी. दत्ता यांचा आयकॉनिक वॉर चित्रपट ‘बॉर्डर’ १९९७ मध्ये प्रदर्शित झाला होता. भारतीय सिनेमातील सर्वांत अविस्मरणीय देशभक्तीपर चित्रपटांपैकी हा एक मानला जाते. या चित्रपटामध्ये सुनील शेट्टीने बीएसएफ जवान भैरों सिंहची दमदार भूमिका साकारली होती. या चित्रपटाच्या यशात सुनील शेट्टीच्या या भूमिकेचा मोठा वाटा आहे. या चित्रपटाची गाणी आणि संवाद सोडाच, पण त्याचा क्लायमॅक्स सीन आजही प्रेक्षक तितक्याच उत्साहाने आनंद देतात जितका चित्रपटाच्या रिलीज वेळी झाला होता. आता चित्रपटाला जवळपास २८ वर्षे झाल्यानंतर सुनील शेट्टीने ‘बॉर्डर’च्या लोकप्रिय क्लायमॅक्स सीनबाबत अनेक रंजक खुलासे केले आहेत.

खरी भावना आणि जोश

‘लल्लनटॉप’शी बोलताना सुनील शेट्टी म्हणाला, “जेव्हा आम्ही क्लायमॅक्स शूट करत होतो, विशेषतः तो रात्रीचा सीन – जिथे सनी पाजी म्हणतात, ‘ज्याला थांबायचे आहे त्याने थांबावे, बाकीचे जाऊ शकतात.’ तो क्षण मनापासून आला होता. क्लायमॅक्समध्ये जेव्हा मी टँकवर पाकिस्तानचा झेंडा पाहिला, तेव्हा जी भावना आली, जे एक्सप्रेशन आपोआप आले, ते कोणत्या अभिनेत्याचे नव्हते, तर एका शिपायाचे होते. हो, पडद्यावर तो रील होता… पण भावना आणि जोश पूर्णपणे खरा होता.”

आजही हृदयाला भिडतो हा क्लायमॅक्स

आजही तो सीन सर्वांना आठवतो – जेव्हा शिपाई बॉम्ब घेऊन टँकखाली जातो आणि सर्व काही उडवून देतो. पुढे सुनील शेट्टीने हेही सांगितले की या फिल्मबाबत प्रश्नही उपस्थित केले गेले होते. ते म्हणाले, “लोकांनी तेव्हा प्रश्न उपस्थित केले होते की माइन घेऊन पुढे जाईल तर टँक मागे कशी जाईल?” पण जे. पी. दत्ता साहेब पूर्णपणे खात्रीशीर होते. त्यांचे मत होते, “टँक मागे जाईल, कारण हा आमचा शिपाई आहे. हीच त्याची ताकद होती, त्याची ऊर्जा होती, त्याचा भावना आणि तोच ‘बॉर्डर’चा एक डिफायनिंग मोमेंट बनला.”

जे. पी. दत्ता यांनीही सांगितला रंजक किस्सा

सुनील शेट्टी व्यतिरिक्त फिल्मचे दिग्दर्शक जे. पी. दत्ता यांनी ‘बॉलिवूड हंगामा’शी बोलताना एक रंजक गोष्ट सांगितली. ते म्हणाले, “कोणतेही कारण असो, फिल्म इंडस्ट्रीने कधीच हे म्हणले नाही की शत्रू पाकिस्तान आहे. मी त्याचे नाव घेतले. इंडस्ट्री फिल्ममध्ये नेहमी ‘पडोसी देश’ म्हणत राहिली, पण मी नाव घेतले. मीच तो होतो ज्याने म्हटले – पाकिस्तान हा आमचा शत्रू आहे.”

सत्ता असताना नाशिकसाठी काय केलं?, अविनाश जाधवांचा फडणवीसांना सवाल
सत्ता असताना नाशिकसाठी काय केलं?, अविनाश जाधवांचा फडणवीसांना सवाल.
2 पक्ष नाही तर 2 परिवार एकत्र आले, अमित ठाकरे
2 पक्ष नाही तर 2 परिवार एकत्र आले, अमित ठाकरे.
50 टक्क्यांचा आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका!
50 टक्क्यांचा आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका!.
जिल्हा परिषद निवडणुका कधी? निवडणूक आयोगाकडून तारीख जाहीर
जिल्हा परिषद निवडणुका कधी? निवडणूक आयोगाकडून तारीख जाहीर.
अदानी 10 वर्षांत एवढे मोठे कसे झाले?, ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल
अदानी 10 वर्षांत एवढे मोठे कसे झाले?, ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल.
जागे रहा! ... तर कानाखाली वाजवा! उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य
जागे रहा! ... तर कानाखाली वाजवा! उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य.
12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित
12 जिल्हा परिषद, 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम घोषित.
अर्लामवाल्याचं घड्याळ बंद करुन...; भाषणातून फडणवीसांची टोलेबाजी
अर्लामवाल्याचं घड्याळ बंद करुन...; भाषणातून फडणवीसांची टोलेबाजी.
धर्माच्या नावावर लढत आहेत; नितेश राणेंची विरोधकांवर टीका
धर्माच्या नावावर लढत आहेत; नितेश राणेंची विरोधकांवर टीका.
हिंदी सक्तीचा मुद्दा पुन्हा पेटला, मनसे आक्रमक, भाजपला गंभीर इशारा
हिंदी सक्तीचा मुद्दा पुन्हा पेटला, मनसे आक्रमक, भाजपला गंभीर इशारा.