AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दोन मुलं झाल्यानंतरही तो तुला सोडून जाईल..; पंकज कपूर यांच्याविषयी सुप्रिया पाठक यांच्या आईने दिलेला इशारा

अनेकांनी मला पंकज कपूर यांच्याशी लग्न न करण्याचा सल्ला दिला होता, पण मी फक्त माझ्या मनाचंच ऐकलं.. असा खुलासा अभिनेत्री सुप्रिया पाठक यांनी एका मुलाखतीत केला होता. पंकज कपूर यांचं हे दुसरं लग्न होतं.

दोन मुलं झाल्यानंतरही तो तुला सोडून जाईल..; पंकज कपूर यांच्याविषयी सुप्रिया पाठक यांच्या आईने दिलेला इशारा
Supriya Pathak and Pankaj KapurImage Credit source: Instagram
| Updated on: Jan 07, 2026 | 10:02 AM
Share

प्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पाठक आणि अभिनेते पंकज कपूर यांनी 1988 मध्ये लग्नगाठ बांधली. सुप्रिया या पंकज कपूर यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. पंकज आणि सुप्रिया यांची जोडी ही बॉलिवूडमधील सर्वांत मजबूत आणि दीर्घकाळ टिकलेल्या जोड्यांपैकी एक आहे. त्यांच्या लग्नाला 37 वर्षे झाली आहेत. परंतु इथवरचा त्यांचा प्रवास सहजसोपा नव्हता. एका मुलाखतीत सुप्रिया यांनी सांगितलं होतं की लग्नानंतर जवळपास दहा वर्षांपर्यंत त्यांच्या आईला भीती वाटत होती की, पंकज कपूर त्यांच्या मुलीला सोडून जातील. सुप्रिया आणि पंकज यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. दोन मुलांच्या जन्मानंतरही ते तुला सोडून जातील, अशी भीती सुप्रिया पाठक यांच्या आईने त्यांच्याकडे व्यक्त केली होती.

सुप्रिया यांनी 1993 मध्ये मुलगी सनाला आणि 1997 मध्ये मुलगा रुहानला जन्म दिला. ‘बीबीसी न्यूज हिंदी’ला दिलेल्या मुलाखतीत सुप्रिया यांनी त्यांच्या लग्नाबद्दल आईला वाटणाऱ्या भीतीविषयी सांगितलं होतं. “दोन मुलांच्या जन्मानंतरही तो तुला सोडून जाईल, असं आई सतत म्हणायची. परंतु त्याबद्दल मी फार चिंता केली नाही. परिस्थितीचा मी स्वीकार केला आणि पुढे चालत राहिले. पंकज कपूर यांचं हे पहिलं लग्न नव्हतं. त्याआधी त्यांनी नीलिमा अझीम यांच्याशी लग्न केलं होतं. कदाचित यामुळे आईला सतत माझ्या लग्नाविषयी चिंता वाटायची.”

पंकज आणि सुप्रिया यांची पहिली भेट दिग्दर्शक सागर सरहदी यांच्या एका चित्रपटादरम्यान झाली होती. जेव्हा सुप्रिया यांना समजलं की त्यात पंकज भूमिका साकारणार आहेत, तेव्हा त्यांनी लगेच होकार दिला. पंकज यांच्यासोबत स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळेल, अशी त्यांना अपेक्षा होती. परंतु नंतर त्यांना समजलं की चित्रपटातील या दोन्ही भूमिकांचं एकमेकांशी काही संबंधच नव्हता. त्यामुळे त्यांचे पंकज यांच्यासोबत सीनच नव्हते. त्यानंतर पंजाबमधल्या गिद्दरबाहामध्ये एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये जवळीक वाढली. परंतु हा चित्रपट कधी प्रदर्शित होऊ शकला नव्हता. तरीही हा चित्रपट कदाचित आम्ही दोघं एकमेकांच्या जवळ यावं यासाठी बनला होता, असं सुप्रिया मानतात.

पंकज कपूर यांच्याशी लग्नाबद्दलची गोष्ट जेव्हा सुप्रिया यांनी त्यांच्या घरी सांगितली तेव्हा त्यांची आई आणि दिग्गज अभिनेत्री दीना पाठक या लग्नाविरोधात होत्या. दीना पाठक यांना नेहमी असा संशय असायचा की पंकज कपूर हे एके दिवशी सुप्रिया यांना सोडून जातील. दीना पाठक त्यांच्या मुलीला म्हणायच्या की, “तू चूक केलीस. पंकज तुला सोडून जाईल.” त्याकडे सुप्रिया पाठक नेहमी दुर्लक्ष करायच्या.

Follow Us
पुणे महापालिकेची अतिक्रमणांवर कारवाई; रामेश्वरम कॅफेवरही हातोडा
पुणे महापालिकेची अतिक्रमणांवर कारवाई; रामेश्वरम कॅफेवरही हातोडा.
ठरलं! मुंबईत मनसे, ठाकरे गट पुन्हा एकत्र, तणाव संपला, मनसेला मोठं पद
ठरलं! मुंबईत मनसे, ठाकरे गट पुन्हा एकत्र, तणाव संपला, मनसेला मोठं पद.
अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा द्राक्ष निर्यातीवर परिणाम नाही
अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा द्राक्ष निर्यातीवर परिणाम नाही.
युद्धामुळे अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी उपाययोजना सुरू
युद्धामुळे अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी उपाययोजना सुरू.
महाविकास आघाडीचा राज्यसभा उमेदवार आज ठरवणार – विजय वडेट्टीवार
महाविकास आघाडीचा राज्यसभा उमेदवार आज ठरवणार – विजय वडेट्टीवार.
दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण नाहीच?; नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?
दोन्ही राष्ट्रवादीचे विलिनीकरण नाहीच?; नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?.
शरद पवार यांची प्रकृती सुधारली; ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज
शरद पवार यांची प्रकृती सुधारली; ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्ज.
अमेरिका-इराण तणावाचा फटका; जळगावची केळी निर्यात ठप्प, शेतकरी संकटात
अमेरिका-इराण तणावाचा फटका; जळगावची केळी निर्यात ठप्प, शेतकरी संकटात.
ठाकरे बंधूंच्या युतीतील तणावानंतर संजय राऊत 'शिवतीर्थ'वर!
ठाकरे बंधूंच्या युतीतील तणावानंतर संजय राऊत 'शिवतीर्थ'वर!.
...तर शिंदेंचं विमान इराणने पाडलं असतं! रोहित पवारांचा मोठा दावा
...तर शिंदेंचं विमान इराणने पाडलं असतं! रोहित पवारांचा मोठा दावा.