AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TMKOC: नव्या टप्पूची फी ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का! भव्य गांधीपेक्षा दुप्पट मानधन

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत राज अनाडकतनंतर नितीश भालुनी या कलाकाराची टप्पूच्या भूमिकेसाठी निवड झाली. या भूमिकेसाठी नितीशला भव्य गांधीपेक्षाही अधिक मानधन मिळतंय. भव्यने या मालिकेच्या सुरुवातीला टप्पूची भूमिका साकारली होती.

TMKOC: नव्या टप्पूची फी ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का! भव्य गांधीपेक्षा दुप्पट मानधन
नितीश भालुनी, राज अनाडकत आणि भव्य गांधीImage Credit source: Instagram
| Updated on: Jul 02, 2024 | 10:47 AM
Share

गेल्या 15 वर्षांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेनं प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलंय. इतक्या वर्षांत या मालिकेतील बऱ्याच कलाकारांची जागा नव्या कलाकारांनी घेतली आहे. मात्र तरीसुद्धा त्याची लोकप्रियता कमी झाली नाही. प्रत्येक नव्या कलाकाराचा प्रेक्षकांनी खुल्या मनाने स्वीकार केला. म्हणूनच 15 वर्षांपासून ही मालिका चांगली टीआरपी मिळतेय. काही दिवसांपूर्वीच टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता भव्य गांधीने या मालिकेचा निरोप घेतला होता. त्याच्या जागी नितीश भालुनी आता मालिकेत टप्पूची भूमिका साकारतोय. या भूमिकेसाठी त्याला तगडं मानधन मिळाल्याचं कळतंय. त्याची फी ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. भव्य गांधीपेक्षाही अधिक मानधन नितीशला मिळतंय.

‘तारक मेहता..’ ही मालिका जेव्हापासून सुरू झाली, तेव्हापासून भव्य गांधी यामध्ये टप्पूची भूमिका साकारत होता. भव्यने 2008 पासून 2017 पर्यंत या मालिकेत काम केलं. त्यानंतर त्याने ही मालिका सोडली आणि चित्रपटांमध्ये नशीब आजमावण्याचं ठरवलं. मिळालेल्या माहितीनुसार, भव्यला एका एपिसोडसाठी 10 हजार रुपये मानधन मिळायचं. भव्यने मालिका सोडल्यानंतर त्याची जागा राज अनाडकतने घेतली. राजला प्रत्येक एपिसोडसाठी 20 हजार रुपये मानधन मिळत होतं. भव्यपेक्षा राजची फी दुप्पट करण्यात आली होती. पाच वर्षांपर्यंत या मालिकेत काम केल्यानंतर त्यानेसुद्धा निरोप घेतला.

आता राज अनाडकतनंतर नितीश भालुनी मालिकेत टप्पूची भूमिका साकारतोय. नितीशलाही प्रत्येक एपिसोडसाठी 20 हजार रुपये मानधन मिळतंय. भव्य आणि राजप्रमाणेच नितीशलाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय. टप्पूच्या भूमिकेत ज्या ज्या कलाकाराने मालिकेत एण्ट्री केली, त्याला नेहमीच प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळालं. त्यामुळे भव्य आणि राजनंतर आता नितीशचीही लोकप्रियता वाढू लागली आहे. आतापर्यंत या मालिकेतून दहापेक्षा अधिक कलाकारांनी निरोप घेतला आहे. मालिका सोडल्यानंतर काहीजण त्यांच्या संसारात रमले आहेत, तर काहीजण दुसऱ्या क्षेत्रात नाव कमवत आहेत. मालिकेत दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी अद्याप परतली नाही. तिच्या जागी दुसऱ्या अभिनेत्रीची वर्णी लागली नाही. यावरून अनेकदा प्रेक्षकांकडून प्रश्न विचारला जातो.

Follow Us
सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त
सावधान! दूधात तब्बल 997 किलो तेल, धाड टाकताच भेसळयुक्त दूध जप्त.
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या...
नीट प्रकरणी 19 व्या दिवशीही CBI चा मुक्काम लातूरमध्येच, चौथ्या....
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी...
संघ कार्यालय जाळपोळ प्रकरणात कोर्टाचा मोठा निकाल, 16 वर्षांनी....
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;
केंद्रात मंत्रिपद देतो, 20 कोटी द्या, भाजपाच्या नेत्यावरच टाकलं जाळं;.
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे
एकच खळबळ! 700 कर्मचारी असलेल्या पुण्यातील IT कंपनीला रातोरात टाळे.
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह
लाडकी बहीण योजनेबाबत स्वतः एकनाथ शिंदे यांनीच केली मोठी घोषणा, थेट म्ह.
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत...
मद्यधुंद नशेतील महिलेचा पोलिस ठाण्यातच धिंगाणा, थेट शिवीगाळ करत....
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग
मुंबईत खळबळ, वर्दळीच्या ठिकाणी आढळली बेवारस बॅग.
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर
बीड पुन्हा हादरलं! सासरच्यांनी आधी तिला उपाशी ठेवलं नंतर...पाच जणांवर.
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,
ज्याची भीती तेच घडलं! या करणामुळे पुन्हा 80 लाख लाडक्या बहिणी अपात्र,.