हिंदू मंदिरांच्या पैशातून नाही बनणार मॉल आणि हॉल.. मुख्यमंत्री थलपती विजय यांचा मोठा निर्णय, थेट 46 प्रकल्प..
तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून थलपती विजय यांनी सूत्रे आपल्या हातात घेतल्यापासून ते एका मागून एक मोठे निर्णय घेताना दिसत आहेत. त्यामध्येच त्यांनी मागील सरकारला मोठा दणका देत त्यांच्या आदेशाला स्थगिती दिली आहे. ज्यानंतर थलपती विजय यांचे काैतुक केले जातंय.

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत थलपती विजय यांच्या पक्षाने धमाका केला. अभिनेत्याने काही दिवसांपूर्वीच या पक्षाची स्थापन केली होती. विशेष म्हणजे लोकांनी थलपती विजय यांच्या पक्षाला इतके जास्त प्रेम दिले की, त्याला थेट सत्तेत बसवले. थलपती विजय यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. थलपती विजय यांच्याकडून मोठे निर्णय घेतली जात आहेत. विशेष म्हणजे थलपती विजय यांनी या निवडणुकीत अत्यंत साध्या साध्या लोकांना उमेदवारी दिली आणि त्यांना निवडून आणले. थलपती विजय यांची देशभरात मोठी क्रेझ बघायला मिळतंय. भल्या भल्या राजकारणांना जे जमले नाही ते थलपती विजय यांनी करून दाखवले. माजी मुख्यमंत्री विजय यांनी एम. के. स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील मागील द्रमुक सरकारने घेतलेला एक निर्णय थलपती विजय यांनी फिरवला आहे. मागील सरकारने मंदिरांच्या निधीतून 46 प्रकल्प राबवण्यास मंजुरी दिली होती.
मुख्यमंत्री थलपती विजय यांच्या नेतृत्वाखालील टीव्हीके सरकारने हे सर्व प्रकल्प रद्द केले आहेत. मंदिरांची सर्व जंगम व स्थावर मालमत्ता केवळ पवित्र कार्यांसाठीच वापरली जाईल, असे जाहीर केले आहे. हा एक अत्यंत मोठा निर्णय नक्कीच म्हणावा लागणार आहे. थेट यांनी हे सर्व प्रकल्प रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता मंदिरांची मालमत्ता कुठेही जाणार नाही.
सरकारने हिंदू धार्मिक आणि धर्मादाय बंदोबस्त विभागाला या सुधारणा करण्याचे आदेश दिले. मागील सरकारने मंजूर केलेले 46 प्रकल्प रद्द करण्यात आलीत. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री विजय यांचे कौतुक केले जात आहे. मुख्यमंत्रिपदाची सुत्रे आपल्या हातात घेतल्यापासून थलपती विजय एका मागून एक मोठे निर्णय घेत आहेत.
डीएमके सरकारने मंदिराच्या निधीचा वापर करून 246 कोटी रुपये खर्चाच्या 29 विवाहमंडप आणि 17 व्यावसायिक संकुलांच्या बांधकामाला मंजुरी दिली होती. या आदेशात नमूद करण्यात आले आहे की, या 46 प्रकल्पांचे काम अद्याप सुरू झालेले नाही. हे आदेश रद्द करण्याचे आदेश विजय यांनी दिली. हा त्यांचा अत्यंत मोठा निर्णय म्हणावा लागणार आहे.
