AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गनफायर होताच आम्ही सुन्न झालो..; अभिनेत्याने सांगितलेला किस्सा चर्चेत

तारिणी ही मालिका येत्या 11 ऑगस्टपासून सोमवार ते शुक्रवार रात्री 9.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत अभिनेता स्वराज नागरगोजेची मुख्य भूमिका आहे. शर्मिष्ठा राऊत या मालिकेची निर्माती आहे.

गनफायर होताच आम्ही सुन्न झालो..; अभिनेत्याने सांगितलेला किस्सा चर्चेत
स्वराज नागरगोजेImage Credit source: Instagram
| Updated on: Aug 10, 2025 | 11:01 AM
Share

‘तारिणी’ मालिकेमधून अभिनेता स्वराज नागरगोजे पहिल्यांदा ॲक्शन हिरोच्या भूमिकेत दिसणार आहे. तो मालिकेत केदारची भूमिका साकारत आहे जो एक अंडरकव्हर पोलीस आहे. त्याला समाजामध्ये वाढणारी गुन्हेगारी कमी करायची आहे आणि आपल्या बाबांना शोधायचं आहे. स्वराजने पहिल्या प्रोमोशूटपासून ते शूटिंगपर्यंतचे किस्से सांगितले आहेत. “मी आयुष्यात पहिल्यांदा ॲक्शन सीन केला आहे आणि पहिल्यांदाच गनफायर केली. मला माहीत नव्हतं की गनफायर करताना इतका मोठ्या प्रमाणात आवाज होतो. मी आणि शिवानीने जशी गनफायर केली तसं आम्ही दोघंही 10-15 सेकंदांसाठी सुन्न झालो. आमच्या कानठळ्या बसल्या आणि आम्ही दोघंही हसायला लागलो,” असं तो म्हणाला.

याविषयी त्याने पुढे सांगितलं, “तो पहिला प्रोमो शूट करण्याचा अनुभव आणि त्यात पहिल्यांदा ॲक्शन आणि गनफायर करणं हा खूप छान अनुभव होता. तारिणी मालिकेचे जे कास्टिंग डायरेक्टर आहेत, विश्वास नवरे.. त्यांचा मला ऑडिशनसाठी फोन आला होता. पण एका दुसऱ्या कामात व्यस्त असल्यामुळे मला ऑडिशनला जाणं शक्य नव्हतं. असं जवळपास दोनदा झालं होतं. पण मग मी त्यांना विनंती केली की घरून व्हिडीओ बनवून ऑडिशन पाठवली तर चालेल का?”

पोलीस अधिकाऱ्याची भूमिका असल्याने स्वराजने त्याच्या फिटनेसकडे खूप लक्ष दिलं. “जेव्हा सिलेक्शनचा कॉल आला, तेव्हा माझी लूकटेस्ट सुरू होती आणि मला परत ऑडिशन द्यायची होती. लूकटेस्टनंतर ऑडिशनसाठी तयारी करत होतो, तेवढ्यात झी मराठीमधून शर्मिष्ठा मॅमना कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की स्वराज भूमिकेसाठी लॉक झालाय. मला कळलंच नाही की मी कशी प्रतिक्रिया देऊ. सगळ्यात आधी आई-बाबांना सांगितलं. त्यांना खूप आनंद झाला आणि माझी खूप जवळची मैत्रीण आहे तिलाही कॉल करून सांगितलं. मला इथे सांगावंसं वाटतं की माझे बाबा माझ्यासाठी खूप लकी आहेत. ते आधीच बोलले होते की तुझंच सिलेक्शन होणार. तू काळजी करू नकोस आणि तसंच झालं,” अशा शब्दांत स्वराजने भावना व्यक्त केल्या.

यावेळी त्याने प्रोमो शूटिंगचा भन्नाट किस्साही सांगितला. “गुरुपौर्णिमेच्या संध्याकाळी प्रोमो प्रदर्शित झाला आणि लोकांना तो खूप आवडला. मला माझ्या परिवार आणि मित्रांकडून खूप कॉल्स आले आणि 24 तासांत प्रोमोला दहा लाख व्ह्यूज मिळाले. कमेंट्समध्ये लोकांचा उत्साह कळत होता. सेटवर माझी शिवानीबरोबर मैत्री झालीच आहे. माझ्या भूमिकेचं नाव केदार आहे आणि तो एकटाच राहतो. त्याला आई नाहीये, बाबा आहेत. पण बाबा कोण आहे हे त्याला माहिती नाही. तो त्यांच्या शोधात आहे, कारण ते त्याला आणि त्याचा आईला लहान असतानाच सोडून जातात. त्यासोबत त्याचं एकच ध्येय आहे, ते म्हणजे समजातील वाढती गुन्हेगारी कमी करायची आहे. खूप रंजक विषय घेऊन आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला येतोय, ज्यामध्ये त्यांना फॅमिली ड्रामा आणि ॲक्शन असं एकत्र बघयला मिळणार आहे,” असं तो पुढे म्हणाला.

भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.