AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“आपल्याकडे फॅमिली स्ट्रक्चरमधून बाहेर पडलेली बाई ही लोकांना झेपतच नाही”; अरुंधतीपुढे नवं संकट

Aai Kuthe Kay Karte: घरादाराला धुडकावून बाहेर पडलेली बाई पुरुषांना संधी तर बायकांना धोकादायक वाटतात?

आपल्याकडे फॅमिली स्ट्रक्चरमधून बाहेर पडलेली बाई ही लोकांना झेपतच नाही; अरुंधतीपुढे नवं संकट
Madhurani PrabhulkarImage Credit source: Instagram
| Edited By: | Updated on: Feb 25, 2022 | 2:57 PM
Share

आपल्या चारित्र्यावर चिखलफेक करणाऱ्यांच्या घरातून अरुंधती (Arundhati) कायमस्वरुपी बाहेर पडली आहे. मात्र बाहेरचं जग तिला मोकळ्या मनाने स्वीकारायला अजूनही तयार नाही. एकट्या बाईला भाड्याने घर द्यायला, जागा द्यायला लोकं फार खळखळ करत असल्याची तक्रार आशुतोष (Ashutosh) त्याच्या आईकडे करतो. हे ऐकून आशुतोषची आई त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग सांगते. त्याचप्रमाणे आपल्या समाजात एकट्या बाईने राहणं सोपं का नाही, हे सांगते. स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत या घडामोडी घडत असतानाच एका महत्त्वाच्या मुद्द्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. “आपल्याकडे फॅमिली स्ट्रक्चरमधून बाहेर पडलेली बाई ही लोकांना झेपतच नाही,” हा आशुतोषच्या आईच्या तोंडी असलेला संवाद म्हणजे सणसणीत चपराकच आहे. आता अरुंधतीपुढे असलेल्या या नव्या समस्यांचा सामना ती कशी करते, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

“आपल्याकडे फॅमिली स्ट्रक्चरमधून बाहेर पडलेली बाई ही लोकांना झेपतच नाही. एकवेळ तिचा नवरा गेलेला असला तर ठीक आहे, पण नवरा सोडून आलेली बाई म्हणजे तिच्याच काहीतरी भयंकर प्रॉब्लेम असणार असं गृहितच धरतात. यालाच घाबरून अनेक बायका मनाविरुद्ध संसार करतात, वर्षानुवर्षं सोसत राहतात. एकटीनं राहण्यासाठी वेगळी शक्ती लागते आणि कुठल्याच अर्थाने ते सोपं नाहीये,” अशा शब्दांत आशुतोषची आई त्याला अरुंधतीची बाजू समजावून सांगते. हे सांगत असताना एखाद्या बाईला सहानुभूती किंवा दया नाही तर तिच्याकडे नॉर्मल व्यक्ती म्हणून समाजाने बघावं, एवढीच तिची अपेक्षा असते, हे त्या अधोरेखित करतात.

View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

‘आई कुठे काय करते’ या मालिकेचं कथानक आता उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. अरुंधती तिच्यासमोर आलेल्या अडचणींचा सामना कसा करेल, त्यात आशुतोष तिची काही मदत करू शकेल का, अनिरुद्ध आणि कांचन देशमुख यांना त्यांची चूक समजेल का, अशा सर्व प्रश्नांची उत्तरं या मालिकेच्या पुढील भागांत प्रेक्षकांना मिळतील.

संबंधित बातम्या: ‘आपण बरं अन् आपलं काम बरं’ अशी मंडळी घातक ठरतात? अनघामुळे देशमुखांचं घर पुन्हा फुटीच्या उंबरठ्यावर?

संबंधित बातम्या: गालावर खळी, डोळ्यांत धुंदी.. ‘आई कुठे काय करते’मधल्या ‘अरुंधती’चा मोहक अंदाज

संबंधित बातम्या: एकटी बाई म्हणजे जोखिम; बुरसटलेल्या विचारांचा सामना ‘अरुंधती’ कसा करणार?

Follow Us
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून...
बापरे! NEET पेपरफुटीत हे काय घडलं? मॅडमने भलतंच केलं, ॲडमिशन करून....
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
सरकार संवादात अपयशी मराठा आंदोलनावर पवारांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न.
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट...
तटकरे-पटेलांबाबत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची पत्रकार परिषद, स्पष्ट....
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत
NEET घोटाळ्यात राज्यातील आणखी एक बायोलॉजी प्राध्यापक अटकेत.
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र...
NCPच्या दिल्ली कार्यालयात तटकरे-पटेल यांच्या नावाच्या पाट्या, मात्र....
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.