AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नातं बिघडलं की ते पूर्वीसारखं व्हायला…; अनिरूद्ध साकारणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

Milind Gawali Post About Aai Kuthe Kay karte : अभिनेते मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट लिहिली आहे. 'आई कुठे काय करते' या मालिकेतील पात्रांबाबत मिलिंद गवळी यांनी पोस्ट लिहिली आहे. नाते संबंध आणि अनिरूद्ध हे पात्र साकारतानाचा अनुभव त्यांनी शेअर केलाय. वाचा सविस्तर...

नातं बिघडलं की ते पूर्वीसारखं व्हायला...; अनिरूद्ध साकारणाऱ्या अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
'आई कुठे काय करते'Image Credit source: Instagram
| Updated on: Jul 07, 2024 | 8:15 PM
Share

स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. ही मालिका सध्या नव्या वळणावर येऊन ठेपली आहे. अनिरुद्ध आणि संजना हे ‘समृद्धी’ बंगला पाडून त्या जागेवर टॉवर उभा करण्याचं स्वप्न पाहत आहेत. पण त्यांच्या स्वप्नपूर्तीला अरुंधतीचा विरोध आहे. आई आणि अप्पा यांच्या घरावर त्यांचा हक्क आहे, तो कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, असं अरुंधती ठणकावून सांगते. मालिकेत हा असा ट्रॅक सुरु असतानाच अनिरुद्ध ही भूमिका साकारणारे अभिनेते मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर केलीय. यात त्यांनी नातेसंबंधांवर भाष्य केलंय.

मिलिंद गवळी यांची पोस्ट जशीच्या तशी

अनिरुद्ध चा possessiveness अनिरुद्ध आणि अरुंधती चं नातं दिवसान दिवस बिगडत चाललंय, आणि त्यांच्या बिघडलेल्या नात्यामुळे त्या दोघांशी connected असलेल्या लोकांचे म्हणजेच पात्रांचे हाल होताहेत. एकदा एखादं नातं बिघडलं की ते परत पूर्वीसारखं व्हायला फारच मुश्किल असतं, पूर्वी जो प्रेम आपुलकी आदर होता तो परत तसाच येईल याची काही guarantee नाही, एखाद्या धागा जर तुटला तर पुन्हा त्याला एक सारखं करण्यासाठी आपण गाठ मारतो , तो धागा परत पूर्वीसारखा होत नाही त्यामध्ये एक गाठ असते आणि काही नात्यांमध्ये तर अनेक गाठी निर्माण होतात किंवा त्या नात्यांचा अगदी गुंता होऊन जातो, आणि तो गुंता बरेच जणांना आयुष्यभर सोडवताच येत नाही.

“आई कुठे काय करते” या मालिकेमध्ये नात्यांची जी गुंतागुंत आहे ती इतकी भारी आहे की आपण पण त्याच्यामध्ये गुंतत जातो! या मालिकेमध्ये इतक्या घडामोडी घडत असतात की आपल्याला उसंतच मिळत नाही . परत प्रत्येक वेळेला काही ना काही तरी घडतच असतं आणि प्रत्येक वेळेला आपल्याला आश्चर्यच वाटत राहतं की अरे याचाच आपण विचारच केला नव्हता.  हे असं कसं घडलं आणि तेवढ्याच दहा-बारा कॅरेक्टर मध्ये हे सातत्याने घडवायचं असतं सातत्याने उत्सुकता वाढवायची असते हे फारच कठीण काम आहे जे नमिता सतत करत असते ती करत असताना तिची होणारी ओढाताणआम्हाला बघायला मिळते.

खूपसे लोक ही मालिके मधल्या पात्रांशी त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्याशी जोडत असतात आणि मलाही असं वाटतं की थोडं फार साम्य असू शकेल पण एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे ही एक मालिका आहे ही काय सत्य घटनेवर आधारित एखादी गोष्ट किंवा एखाद्याचं खरं खरं आयुष्य नाही.

मालिका म्हणजे दिवसातून एक अर्धा तास एका वेगळ्या विश्वात प्रेक्षकांना घेऊन जाते. जे प्रेक्षकांना आपलंसं वाटेतं आणि खरं वाटतं , याचा अर्थ ते खरं खरं आहे असं होत नाही, अनेक लोक प्रामाणिकपणे ही मालिका दररोज बघत असतात, मला खरंच त्यांचं खूप कौतुक वाटतं, त्यातल्या अनेक लोकांना हे सगळं खरोखर आहे असंच वाटत असतं. कधीतरी या खऱ्या शूटिंगचा अनुभव घ्यायला मिळाला तर लक्षात येईल एकही कलाकारा त्या पात्रच्या मूळ स्वभावाप्रमाणे नाहीहे. प्रत्येक जण अगदीच वेगळा आहे.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.