AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अक्षया देवधर पुन्हा दिसणार मराठी मालिकेत; ‘या’ कलाकारांसोबत दिसणार छोट्या पडद्यावर

Actress Akshaya Deodhar New Serial : अभिनेत्री अक्षया देवधर पुन्हा एकदा मराठी मालिकेत दिसणार आहे. लवकरच ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्गज कलाकारांसोबत ती पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करणार आहे. कोणती आहे ही मालिका? कधी येणार आहे प्रेक्षकांच्या भेटीला? वाचा सविस्तर...

अक्षया देवधर पुन्हा दिसणार मराठी मालिकेत; 'या' कलाकारांसोबत दिसणार छोट्या पडद्यावर
अक्षया देवधर, अभिनेत्रीImage Credit source: Instagram
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Oct 27, 2024 | 12:53 PM
Share

झी मराठीवरच्या ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील पाठकबाई अर्थात अभिनेत्री अक्षया देवधर… या मालिकेनंतर बऱ्या मोठ्या ब्रेकनंतर अक्षया आता पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. झी मराठीवर ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत अक्षया पुन्हा एकदा झळकणार आहे. या टिझर प्रसारित झाला आहे. या मालिकेत अभिनेत्री हर्षदा खानविलकर आणि अभिनेता तुषार दळवी हे दोन दिग्गज कलाकार दिसणार आहेत. या मालिकेच्या टिझरने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वेगळी कथा असणारी ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

अक्षया देवधरचं दमदार कमबॅक

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील अभिनेत्री अक्षया देवधर हिची भूमिका प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. अक्षयाने साकारलेली अंजली पाठक ही भूमिका प्रेक्षकांना भावली होती. 2016 ते 2021 तब्बल पाच वर्षे ही मालिका सुरु होती. तीन वर्षांच्या ब्रेकनंतर अक्षया पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर दिसणार आहे. ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत अक्षयाची भूमिका काय असेल? याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

‘लक्ष्मी निवास’ मालिकेची गोष्ट काय?

‘लक्ष्मी निवास’ ही कथा आहे, स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न बघणा-या एका मध्यमवर्गीय जोडप्याची…. लक्ष्मी एका श्रीमंत घरात वाढलेली मुलगी. श्रीनिवासवर असलेल्या अतोनात प्रेमामुळे तिनं त्याच्याशी पळून जाऊन लग्न केलं आणि माहेरशी असलेले सगळे संबंध तिला तोडावे लागले. श्रीनिवासकडे स्वतःच्या हक्काचं घर नाही यावरुन झालेला अपमान असह्य झाल्याने तिने स्वतःचं घर होईपर्यंत माहेरी पाऊल न ठेवण्याचा निर्णय घेतला.

लक्ष्मी आणि श्रीनिवासचा संसार उत्तम फुलला. 3 मुलं, 3 मुली आणि श्रीनिवासची आई इतकं मोठं कुटुंब झालं. आता दोन मुलींची लग्न बाकी आहेत. लक्ष्मी आणि श्रीनिवास समोर अनेक आव्हानं आहेत. एवढ्या मोठ्या कुटुंबाचा महिन्याचा खर्च, पत्रिकेत दोष असलेल्या मुलीचं लग्न जुळवणं, मुली योग्य घरी पडतायेत ना याची काळजी असणं, घरातल्या वेगवेगळ्या स्वभावाच्या माणसांची मोट बांधून त्यांना एकत्र धरुन ठेवणं अशा एक ना अनेक आव्हानांचा सामना या जोडप्याला करावा लागत आहे. कुटुंबासाठी झटताना स्वतःच्या इच्छा मागे सारत लक्ष्मी आणि श्रीनिवासला आपल्या स्वतःच्या घराचं स्वप्न साकारायचं आहे. या मालिकेचं लेखन सायली केदारने केलं आहे. तर मालिकेचे निर्माते सोमिल क्रिएशनचे सुनील भोसले आहेत.

Follow Us
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा