AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bigg Boss 16 | अर्चना गौतम आणि विकास मानकतला यांच्यामध्ये या कारणामुळे जोरदार भांडणे

तीन दिवसांनंतर परत सलमान खान हा अर्चना गाैतमला घरामध्ये घेतो.

Bigg Boss 16 | अर्चना गौतम आणि विकास मानकतला यांच्यामध्ये या कारणामुळे जोरदार भांडणे
| Updated on: Dec 27, 2022 | 3:38 PM
Share

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बिग बाॅसच्या घरामधील वादग्रस्त स्पर्धेक म्हणून अर्चना गाैतम हिचे नाव पुढे येतंय. विषय नसताना देखील अर्चना ही अनेकदा घरातील इतर सदस्यांना भांडताना दिसते. शिव ठाकरे आणि अर्चना गाैतम यांच्यामध्ये काही दिवसांपूर्वी भांडणे सुरू असताना भांडणामध्ये अर्चना थेट शिव ठाकरेचा गळा पकडते. त्यानंतर घरातील इतर सदस्य हे भांडणे मिटवतात. मात्र, यानंतर बिग बाॅस अर्चनाला घराबाहेर काढतात. तीन दिवसांनंतर परत सलमान खान हा अर्चना गाैतमला घरामध्ये घेतो.

भांडणामध्ये शिव ठाकरेचा गळा पकडल्यामुळे एकदा बिग बाॅसच्या घराबाहेर पडलेल्या अर्चनाने परत एकदा जोरदार भांडणे केली आहेत. मात्र, यावेळी अर्चनाच्या निशाण्यावर शिव ठाकरे नसून विकास मानकतला आहे.

विकास मानकतला याने बिग बाॅसच्या घरामध्ये वाइल्डकार्ड म्हणून प्रवेश केला. विकास याने घरामध्ये आल्यापासूनच अर्चना गाैतम हिच्यासोबत पंगा घेण्यास सुरूवात केली होती.

इतकेच नाहीतर पहिल्याच दिवशी विकासने अर्चनाचा आवाज काढून तिची नक्कल केली होती. आतातर किचनमध्ये या दोघांमध्ये मोठे भांडण झाले आहे. अर्चना किचनमध्ये जेवण तयार करत होती.

विकास किचनमध्ये जातो आणि चहा करण्यासाठी पाणी ठेवतो. यावर अर्चना म्हणते की, इथे चहा नको करू मी जेवण तयार करत आहे. यावेळी दोघांमध्ये वाद होतो आणि दोघे भांडण करतात. यांच्या भांडणामध्ये अर्चना गॅसवरील गरम पाणी फेकते.

आता अर्चना आणि विकास यांच्या भांडणाचा हाच प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या भांडमामध्ये नेमकी चुक कोणाची हे आजच्या एपिसोडमध्ये कळेल. मात्र, एकदा बिग बाॅसच्या घराबाहेर पडूनही अर्चना सुधारली नसल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.

Follow Us
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.