AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘रामायणा’तील ‘कैकयी’ने अमिताभ बच्चन यांच्यासोबत केलेय काम, जाणून घ्या आता काय करते अभिनेत्री…

रामानंद सागर (Ramanand Sagar) यांची लोकप्रिय मालिका ‘रामायण’ (Ramayana) आणि त्यातील प्रत्येक पात्र इतके लोकप्रिय झाले होते की, लॉकडाऊन दरम्यान पुन्हा एकदा शो परत आणण्यात आला. लॉकडाऊन दरम्यान पुन्हा एकदा हा कार्यक्रम टीव्हीवर प्रक्षेपित झाला होता, तेव्हा त्याने टीआरपीच्या बाबतीत 'गेम ऑफ थ्रोन्स'चाही विक्रम मोडला होता.

‘रामायणा’तील ‘कैकयी’ने अमिताभ बच्चन यांच्यासोबत केलेय काम, जाणून घ्या आता काय करते अभिनेत्री...
अमिताभ बच्चन आणि पद्मा खन्ना
| Edited By: | Updated on: Jun 26, 2021 | 7:52 AM
Share

मुंबई : रामानंद सागर (Ramanand Sagar) यांची लोकप्रिय मालिका ‘रामायण’ (Ramayana) आणि त्यातील प्रत्येक पात्र इतके लोकप्रिय झाले होते की, लॉकडाऊन दरम्यान पुन्हा एकदा शो परत आणण्यात आला. लॉकडाऊन दरम्यान पुन्हा एकदा हा कार्यक्रम टीव्हीवर प्रक्षेपित झाला होता, तेव्हा त्याने टीआरपीच्या बाबतीत ‘गेम ऑफ थ्रोन्स’चाही विक्रम मोडला होता. या कार्यक्रमात ‘कौशल्या’च्या व्यक्तिरेखेला खूप पसंती मिळाली असतानाच, ‘कैकयी’च्या व्यक्तिरेखेनेही एक वेगळी छाप सोडली (Ramayan Fame Kaikeyi aka Actress Padma Khanna Know where is she now).

खऱ्या आयुष्यातही द्वेष करू लागले लोक

असे म्हणतात की, कैकेयीच्या व्यक्तिरेखेत पद्मा खन्ना (Padma Khanna) यांनी अशी जादू केली होती की, त्या काळात लोक तिला वास्तविक जीवनातही नावं ठेवत असत. तथापि, अभिनेत्री म्हणून तिचा हा सर्वात मोठा विजय होता. रामानंद सागर यांच्या रामायणात ‘कैकेयी’ची भूमिका साकारणाऱ्या कैकेयीने बॉलिवूड सुपरस्टारबरोबरही पडद्यावर रोमान्स केला आहे, हे फार कमी लोकांना ठाऊक आहे.

कैकेयीची भूमिका साकारण्यास दिला नकार

1961मध्ये पद्मा खन्ना यांनी ‘भैय्या’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात हेलन, अचला सचदेव आणि शुभा खोटे यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. रामानंद सागर यांना पद्मा यांनी कैकेयीची भूमिका करण्यास नकार दिला होता आणि ही एक नकारात्मक भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. तथापि, नंतर रामानंद सागर यांनी तिला काहीतरी सांगितले, ज्यानंतर त्या भूमिकेसाठी तयार झाल्या.

रामानंद सागर म्हणाले…

रामानंद सागर म्हणाले की, लोक रामायणातील कोणतेही पात्र विसरतील, पण कैकेयीचे पात्र मात्र कधीही विसरू शकत नाहीत. रुपेरी पडद्याबद्दल बोलायचे झाले, तर भोजपुरी सिनेमापासून करिअरची सुरूवात करणाऱ्या पद्मा अमिताभ बच्चन यांच्याबरोबर ‘सौदागर’ या चित्रपटात झळकल्या होत्या. या चित्रपटाने त्यांना ओळख मिळाली. या चित्रपटातील गाणे ‘सजना है मुझे’ खूप लोकप्रिय झाले आणि दोघेही चित्रपटात रोमांस करताना दिसले होते.

रामायणातील ‘कैकयी’ सध्या कुठे गायब आहेत?

पण इतकी लोकप्रियता मिळवणाऱ्या पद्मा खन्ना सध्या कुठे आहेत आणि अचानक त्या रुपेरी पडद्यावरुन कुठे गायब झाल्या?, हा प्रश्न त्यांच्या सगळ्याच चाहत्यांना पडला आहे.  80च्या दशकात पद्मा खन्ना यांनी दिग्दर्शक जगदीश एल सिडाना यांच्याशी लग्न केले. ‘सौदागर’ चित्रपटाच्या सेटवर सिडाना आणि पद्मा खन्ना यांची भेट झाली होती. लग्नानंतर पद्मा खन्ना यांनी सिनेमा जगताला निरोप दिला आणि त्या अमेरिकेत शिफ्ट झाल्या. तिथे त्यांनी मुलांना शास्त्रीय नृत्य शिकवायला सुरुवात केली.

(Ramayan Fame Kaikeyi aka Actress Padma Khanna Know where is she now)

हेही वाचा :

Devmanus | सरू आजी अंध नाही?, अजितकुमार आणणार सरू आजीचं सत्य सगळ्यांसमोर!

Shah Rukh Khan | बॉलिवूड कारकिर्दीला 30 वर्ष पूर्ण, शाहरुख खान चाहत्यांसाठी शेअर केली भावूक पोस्ट!

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.