AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहशतवादी हल्ल्यातून बचावलेला अभिनेता म्हणतो, ‘धक्क्यातून सावरलो, पण ते सगळं पाहिलं आणि…’

Bus Terror Attack : 'धक्क्यातून सावरलो, पण ते सगळं पाहिलं आणि...', जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यामध्ये झालेला हल्ला, प्रसिद्ध अभिनेता थोडक्यात बचावला, अनुभव सांगत म्हणाला..., सध्या सर्वत्र अभिनेत्याने सांगितलेल्या 'त्या' भयावह घटनेची चर्चा...

दहशतवादी हल्ल्यातून  बचावलेला अभिनेता म्हणतो, 'धक्क्यातून सावरलो, पण ते सगळं पाहिलं आणि...'
| Updated on: Jun 15, 2024 | 12:53 PM
Share

जम्मूमध्ये शिवखोरी येथे दर्शन घेऊन परतणाऱ्या यात्रेकरुंच्या बसवर रविवारी म्हणजे 9 जून रोजी भीषण हल्ला झाला. जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यामध्ये झालेला हल्ला प्रचंड भयानक होता. यात 10 निष्पाप यात्रेकरुंचा मृत्यू झाला असून, 33 जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. अभिनेता पंकित ठक्कर जम्मू- काश्मीरमधील रियासी याठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून थोडक्यात बचावल्याची माहिती देखील समोर येत आहे. नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्याने मोठं वक्तव्य केलं आहे.

अभिनेता पंकित ठक्कर कटरा येथील माता वैष्णो देवी मंदिराकडे चालत जाणार होता. पण त्याआधीच जवळपासच्या जंगलात दबा धरुन बसलेले दहशतवादी अचानक समोर आले व त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केल्याची माहिती अभिनेत्याला मिळाली. त्यामुळे पंकित याला यात्रा पूर्ण करता आली नाही.

अभिनेता म्हणाला, ‘झालेल्या हल्ला प्रचंड भयानक होता. त्या धक्क्यातून स्वतःला सावरण्यासाठी मला इतक्या दिवसांचा कालावधी लागला. मी लोकांना गर्दीत, मोठ्या दुःखात पाहिलं आहे. तेव्हाचं चित्र फार भयानक होतं. मला पाहून दुःख देखील झाली आणि माझा संताप देखील अनावर झाला. गेल्या काही दिवसांपासून जम्मू – काश्मीरमध्ये परिस्थिती गंभीर आहे.’

‘सतत सुरु असलेले दहशतवादी हल्ले… हल्ल्यात निष्पाप लोकांनी त्यांचे प्राण गमावणं. प्रदेशात वाढलेल्या तणाव… या गोष्टी प्रचंड निराशाजनक आहेत. हल्ल्यात ज्यांनी प्राण गमावले आहे. त्यांच्या कुटुंबियांचा विचार करून मन दुःखी होतं. अशा हिंसक घटनांमुळे लोकांचे प्राण जात आहेत..’

‘जम्मू-काश्मीर एक सुंदर आणि प्रेक्षणीय स्थळ आहे. पण अशा घटनांमुळे शहराचं सौंदर्य कमी होत आहे. सतत होणाऱ्या अशा भ्याड आणि वाईट हल्ल्यांविरुद्ध एकजुटीने उभं राहिलं पाहिजे… अशी आवण रियासी याठिकाणी झालेला हल्ला करून देत आहे.’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्याने सांगितलेल्या अनुभवाची चर्चा रंगली आहे.

दरम्यान, अभिनेत्याने झालेल्या हल्ल्यानंतर प्रशासनाला सुरक्षा वाढवण्याचं आवाहन केलं आहे. हल्ल्यानंतर सेलिब्रिटींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विरोध आणि संताप व्यक्त केला. कपिल शर्मा, हिना खान, रुपाली गांगुली आणि अली गोनी यांच्यासह अनेक सेलिब्रिटींना हल्ल्याचा निषेध व्यक्त केला.

अभिनेता पंकित ठक्कर याच्याबद्दल सांगायचं झालं तर, अभिनेता ‘बरसाते’ मालिकेतून चाहत्यांच्या भेटीस आला. अभिनेत्याने अनेक मालिकांमध्ये काम केलं. पंकित सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असतो. सोशल मीडियावर देखील अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.