AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुरुंचा आशीर्वीद घेवून विराट – अनुष्का करणार ‘हे’ काम

विराट कोहली - अनुष्का शर्मा यांच्या गुरुंचा आशीर्वाद घेण्यासाठी पोहोचले 'या' ठिकाणी; यापूर्वी अनेक सेलिब्रिटी आणि राजकारणातल्या व्यक्तींनी घेतले मोदी यांच्या गुरुंचे आशीर्वाद...

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुरुंचा आशीर्वीद घेवून विराट - अनुष्का करणार 'हे' काम
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुरुंचा आशीर्वीद घेवून विराट - अनुष्का करणार 'हे' काम
| Updated on: Jan 31, 2023 | 8:13 AM
Share

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा (anushka sharma) आणि क्रिकेटर विराट कोहली (virat kohali) पुन्हा एकदा अध्यात्म करताना दिसले आहेत. विराट – अनुष्का सोमवारी ऋषिकेश याठिकाणी पोहोचले आणि शिशमझाडी येथे असणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांचे गुरु स्वामी दयानंद सरस्वती यांच्या आश्रमात गेले. याठिकाणी दोघांनी गुरु स्वामी दयानंद सरस्वती यांचे आशीर्वाद घेतले. महत्त्वाचं म्हणजे यावेळी विराटची आई सरोज कोहली देखील विराटसोबत आहे. कोहली कुटुंब आज ऋषिकेश याठिकाणी मु्क्काम करणार आहे. (pm narendra modi guru)

काही दिवसांपूर्वी देखील विराट, अनुष्का लेकीसोबत देवदर्शनासाठी गेले होते. श्रीलंका विरुद्ध वनडे सीरिजपूर्वी विराट – अनुष्का वृंदावन याठिकाणी गेले होते. त्याआधी दोघे नैनीताल येथे असणाऱ्या एका मंदिरात देखील गेले होते. दरम्यान दोघांचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. (guru swami dayanand saraswati)

आता आई सरोज कोहली यांच्यासोबत विराट आणि अनुष्का यांनी ब्रह्मलीन दयानंद सरस्वती यांच्या समाधीचं दर्शन केलं. यावेळी विराटने समाधी स्थळावर २० मिनिटं ध्यान देखील केलं. स्वामी दयानंद सरस्वती यांच्या आश्रमात यापूर्वी सुपरस्टार रजनीकांत यांच्यासह अनेक सेलिब्रिटी आणि राजकारणी व्यक्ती दर्शनासाठी गेल्या आहेत.

विराट कोहली – अनुष्का शर्मा

२०१५ मध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आश्रमात आले होते, त्यानंतर अनेक जण स्वामी दयानंद सरस्वती यांच्या आश्रमात आशीर्वीद घेण्यासाठी पोहोचले. आता विराट आणि अनुष्का स्वामी दयानंद सरस्वती यांच्या आश्रमात दर्शन घेण्यासाठी गेल्यामुळे सर्वत्र आश्रमाची पुन्हा चर्चा होत आहे.

आश्रमात दर्शन घेतल्यानंतर विराट – अनुष्का गंगा नदीकाठी पोहोचले. त्याठिकाणी त्यांनी संत आणि पंडितांसोबत गंगेची आरती केली आणि आशीर्वाद घेतले. तर संध्याकाळी विराटने कुटुंबासोबत भोजन केलं. मिळालेल्या माहितीनुसार कोहली कुटुंब मंगळवारी देखील ऋषिकेशमध्ये राहणार आहे. (virat kohli and anushka sharma love story)

मंगळावरी कोहली कुटुंब हवन-यज्ञामध्ये सहभागी राहणार असून त्यांच्याकडून भंडाऱ्याचं आयोजन करण्यात येणार आहे आणि प्रसाद देखील वाटण्यात येणार आहे. सध्या सर्वत्र विराट आणि अनुष्का यांची चर्चा रंगत आहे. (virat kohli and anushka sharma)

Follow Us
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप
पुण्यातील भोंदू बाबाचा व्हिडिओ व्हायरल: शिष्य पाय धुऊन पाणी पितात
उमेश तागुंदेचा वादग्रस्त व्हिडिओ: शिष्यांकडून पाय धुऊन पाणी पिण्याचा धक्कादायक प्रकार.
बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
Supriya Sule | बाळासाहेबांची शिवसेना ही ठाकरेंचीच; सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य
राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क साधण्याचे दिले निर्देश
राज ठाकरे यांचे पदाधिकाऱ्यांना जन-झीशी संपर्क वाढवण्याचे निर्देश, पुण्यातील बैठकीत स्पष्टीकरण
पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली...
Pune | पुण्यात भोंदूबाबाचा धक्कादायक प्रकार! दैवी शक्तीच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचं शोषण; आरोपी फरार
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल
चाकण एमआयडीसीतून २० उद्योगांच्या स्थलांतरावर शरद पवारांचा सरकारला सवाल, रोजगार टिकवण्यासाठी उपाययोजनांची मागणी
भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या...
Pune | भाविकांची गर्दी वाढतेय, वाहतूक कोंडी कायम! दगडूशेठ गणपती मंदिराच्या विस्तारावर हिंदू महासभेचे आनंद दवे आक्रमक
फडणवीसांचे उत्तर: चाकण MIDC मधील ७६% बंद कंपन्या ‘डिफंक्ट’ होत्या
चाकण एमआयडीसीतील कंपन्या बंद: फडणवीसांनी पवारांना दिले उत्तर
MNS शहराध्यक्षांच्या गाडीची तोडफोड: मनसेचा भाजपवर आरोप
अंबरनाथमधील भाजप-मनसे राड्यावरुन मनसे नेते आक्रमक, गाडी तोडफोड करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न
Sharad Pawar | चाकणच्या 20 कंपन्या स्थलांतराच्या तयारीत? 2 हजार रोजगारांचा प्रश्न; शरद पवार यांचा दावा